शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

महागाईतही गोमंतकीयांमध्ये चतुर्थीचा उत्साह 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 12:27 PM

गोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे.

ठळक मुद्देगोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची व्याप्ती गोव्यात गेल्या पंधरा वर्षात वाढली आहे.सध्या बाजारपेठांमध्ये चतुर्थीनिमित्ताने खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत.

पणजी - महागाई वाढली, पुराच्या झळाही बसल्या, शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली, भाजी, दुध व पाण्याच्या तुटवडय़ाने लोक हैराण झाले. मात्र या स्थितीतही गोमंतकीयांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. गोमंतकीयांना अतिशय प्रिय असलेला गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. चतुर्थीनिमित्ताने बाजारपेठा फुलल्या आहेत.

गोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे. घरे सजविली जात आहेत. रंगरंगोटी केली जात आहे. आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नागपंचमी पार पडल्यानंतर गोमंतकीयांनी गणेशमूर्ती तयार होणाऱ्या शाळांमध्ये जाऊन आपली गणेशमूर्ती निवडली व आरक्षित केली. येत्या 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला आरंभ होत आहे. ज्या कुटूंबांमध्ये दुरच्या अंतरावरून गणेशमूर्ती आणावी लागते, अशा कुटुंबाकडून मूर्ती आदल्या दिवशीच सायंकाळी घरी आणून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुरोहितांना बोलावून मूर्तीची पुजा केली जाते व गणोशोत्सवाला आरंभ होतो. अनेक गोमंतकीयांच्या घरांमध्ये दीड व पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या शिवाय सार्वजनिक गणेशोत्सवात गोमंतकीय सहभागी होतात. सार्वजनिक गणेशोत्सवाची व्याप्ती गोव्यात गेल्या पंधरा वर्षात वाढली आहे.

सध्या बाजारपेठांमध्ये चतुर्थीनिमित्ताने खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. बाजारपेठांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती सरकारने करून वाहतूक व्यवस्थेत बदलही घडवून आणले आहेत. चतुर्थीच्या दिवसांत काही भागांमध्ये चतुर्थीचा बाजार स्वतंत्रपणे अन्यत्र भरविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. उत्तर गोव्यात अलिकडेच महाराष्ट्रातील तिळारी धरणाचे पाणी सोडल्याने पूर आला. लोकांना मोठा फटका बसला. कृषी क्षेत्राची दहा कोटींची हानी झाली. तत्पूर्वी बेळगाव व अन्य भागातून येणारा भाजीपाला कमी झाल्याने गोमंतकीयांना अत्यंत महागडी भाजी खावी लागली. दुधाचा तुटवडा निर्माण झाला होता. जलवाहिनी फुटल्याने तिसवाडी व फोंडा तालुक्यातील काही भागांमध्ये आठ ते दहा दिवस नळ कोरडे पडले होते. लोकांनी सरकारच्या नावे बोटे मोडली. मात्र आता नव्या दमाने गोमंतकीय गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ लागला आहे. निदान चतुर्थीच्या काळात तरी सरकारने गोव्यातील पाणी व वीज पुरवठय़ाची नीट काळजी घ्यावी अशी गोमंतकीयांची अपेक्षा आहे. 

टॅग्स :goaगोवाGanesh Mahotsavगणेश महोत्सव