शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

गोव्याच्या नद्या दूषित का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 13:36 IST

गोव्यातील अकरा नद्यांच्या काही पट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आढळून आल्याने राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कानउघाडणी केली आहे.

- किशोर कुबल 

पणजी - गोव्यातील अकरा नद्यांच्या काही पट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आढळून आल्याने राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कानउघाडणी केली आहे. या नद्या पोहण्यासाठी असुरक्षित बनल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे वरिष्ठ शास्रज्ञ तसेच अभ्यासक बबन इंगोले यांनी याबाबत खालीलप्रमाणे प्रकाश टाकला. 

कारखान्यांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी, औद्योगिक तसेच हॉटेलचा कचरा, प्लास्टिक कचरा, जैव वैद्यकीय कचरा, नदी तटांवर आलेली अतिक्रमणे, अमर्याद वाळू उपसा, बार्जमधून खनिज वाहतूक तसेच इंधन गळती ही काही प्राथमिक कारणे मानली जातात. डॉ. बबन इंगोले म्हणाले की, ‘ गोव्यातील नद्या दूषित होण्याची कारणे वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळी आहेत. शेतांमध्ये वापरली जाणारी खते, कीटक नाशके पावसाळ्यात पाण्याबरोबर वाहत नद्यांमध्ये येतात. हे कारण राज्यातील सरसकट सर्वच नद्यांना लागू होते. मांडवी नदीचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास कुं डई औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीत सोडले जाते. शिवाय खोर्ली, करमळी भागात मासळीवर प्रक्रिया करणारे कारखाने आहेत या कारखान्यांचे सांडपाणीही मांडवीत सोडले जाते. राजधानी शहरात नदीपात्रातील कसिनो जहाजांचा कचरा, सांडपाणी यामुळेही नदी प्रदूषित होते.’

साळ नदीच्या बाबतीत ते म्हणाले की, ‘या पट्टयात असलेल्या बड्या तारांकित हॉटेलचे सांडपाणी आणि विशेष म्हणजे मडगांव शहर आणि परिसरातील कचरा साळ नदीत फेकला जात असल्याने ही नदी प्रदूषित झालेली आहे. एनआयओच्या मार्गदर्शनाखाली या नदीतील गाळ उपसण्याचे काम सध्या चालू आहे.’

झुवारी नदीतील प्रदूषणाबाबत इंगोले यांचे असे म्हणणे आहे की, ‘ कुठ्ठाळीपासून वास्कोपर्यंत नदी काठावर बार्जेस दुरुस्त करणारी शिपयार्डे तसेच मुरगांव बंदरातील बोटींमधून सोडले जाणारे इंधन यामुळे नदी दूषित झालेली आहे. शापोरा तसेच अन्य काही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चाललेला वाळू उपसा हेही या नद्या दूषित होण्याचे कारण आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नद्यांचे काळ कोसळून पडतात आणि त्यामुळे पर्यावरणाचीही मोठी हानी होते.’

वरील दूषित पाण्याचा वापर करणाऱ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यात जैवरासायनिक बायोकेमिकल ऑक्सिजनचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहे. लिटरमागे ते ३.0 मिलिग्रॅमपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मांडवी नदी माशेल ते वळवई या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात दूषित झालेली आहे असा अहवाल सांगतो. या शिवाय झुवारी नदी कुडचडें ते मडकई तर साळ नदी खारेबांध ते मोबोर या पट्टयात दूषित झालेली आहे.  

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला दिलेल्या अहवालानुसार मांडवी, झुवारी, साळ, तळपण, अस्नोडा, डिचोली, शापोरा, खांडेपार, सिकेरी, तेरेखोल आणि वाळवंटी या नद्या दूषित झालेल्या आहेत. या नद्यांच्या प्रदूषणाबाबत तीन, चार आणि पाच अशा तीन वेगवेगळ्या वर्गवाऱ्या करण्यात आल्या आहेत. काही नद्यांमध्ये हे प्रमाण लिटरमागे १0 ते २0 मिलिग्रॅम, ६ ते १0 मिलिग्रॅम आणि ३ मिलिग्रॅमपेक्षा जास्त आढळून आलेले आहे. 

त्याचबरोबर अस्नोडा नदी अस्नोडा ते शिरसई या पट्टयात दूषित झालेली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण बार्देस तालुक्याला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या अस्नोडा जलशुध्दीकरण प्रकल्पाला याच नदीचे पाणी घेतले जाते. डिचोली नदी डिचोली ते कुडचिरें, खांडेपार नदी फोंडा ते ओपा या पट्टयात दूषित झालेली आहे. खांडेपार नदीचे पाणी तिसवाडी तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या ओपा जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी घेतले जाते. याशिवाय तेरेखोल, वाळवंटी नदीही काही पट्टयांमध्ये दूषित झालेली आहे.

दरम्यान, मांडवी नदीत कसिनो जहाजांमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी येथील कसिनो कार्यालयांवर धडक देऊन कसिनो मांडवीतून हटविण्याची मागणी केली होती. 

अशा आहेत गोव्याच्या प्रमुख नद्या 

झुआरी : (९२ कि.मी.) या नदीला अघनाशिनी नदी असेही नाव आहे.

मांडवी : (७७ कि.मी) या नदीला म्हादई/महादयी नदी अशीही नावे आहेत.

तेरेखोल (२२ किमी). या नदीला आरोंदा नदी असेही नाव आहे.

शापोरा (२९ किमी). या नदीला कोलवाळ आणि कायसुव अशीही नावे आहेत. ही नदी महाराष्ट्रात उगम पावते. तेथे हिला तिळारी या नावाने ओळखले जाते.

साळ (१६ किमी)

तळपण (११ किमी)

गालजीबाग (४ किमी)

बागा (१० किमी) 

याशिवाय म्हापसा, साळावली, काणकोण अशाही नद्या आहेत. 

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे ज्येष्ठ शास्रज्ञ बबन इंगोले

टॅग्स :pollutionप्रदूषणriverनदीgoaगोवा