शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

सनबर्नविरोधात जनता रस्त्यावर आलीच नाही, म्हणून मी नाही गेलो: प्रवीण आर्लेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 07:40 IST

विरोध करणारे महोत्सवात सहभागी झाल्याने आश्चर्य

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : सनबर्न ईडीएमला स्थानिकांनी विरोध केल्यामुळेच आपण आपण रस्त्यावर येऊन जाहीर सभा घेतली आणि विरोध दर्शवला. मात्र, तीन दिवस झालेल्या महोत्सवावेळी कुणीही विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर आलेच नाहीत. त्यामुळे आपणही रस्त्यावर आलो नाही, असे स्पष्टीकरण आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिले. आता हा महोत्सव यशस्वी झाला, त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे बरोबर नव्हे, असेही ते म्हणाले.

ज्या दिवशी धारगळ पंचायत क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स महोत्सवाचे आयोजन केल्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमांतून प्रसारित झाल्या. त्याची गंभीर दखल घेत आमदार आर्लेकर यांनी पेडणे मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, नागरिक, भाजपचे कार्यकर्ते, समर्थकांची जाहीर सभा धारगळ पंचायत कार्यालयासमोर झाली होती. केवळ पेडणे मतदारसंघातीलच नव्हे, तर माद्रे मतदारसंघातील काही आजी- माजी सरपंच उपसरपंच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवाला आमचाही पूर्णविरोध असल्याचे जाहीर केले होते. तर त्याच दिवशी दुसऱ्या बाजूने धारगळ पंचायत मंडळाची सत्तारूढ गटाची एक बैठक होऊन त्या बैठकीमध्ये या महोत्सवाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचेही जाहीर केले. त्याचवेळी नागरिकांच्या लक्षात आले की, या महोत्सवावरून धारगळ पंचायत क्षेत्रात दोन गटत निर्माण झाले.

मात्र, धारगळ येथे झालेल्या विरोधकांच्या सभेत आमदार आर्लेकर यांनी सनबर्न महोत्सव आपण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. जर महोत्सव सुरू झाला, तर आपण तो उधळून लावू, असा इशारा दिला होता. महोत्सवाला विरोध करणाऱ्यांनी शेवटपर्यंत आपला विरोध दर्शवला नाही किंवा तो उधळूनही लावला नाही. त्यासंदर्भात आता मतदारसंघात चर्चा रंगू लागली आहे.

ग्रामस्थांना पास कुणी दिले?

या महोत्सवाला विरोध करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, पंच, नागरिक सभेला उपस्थित होते. त्यातील अनेकजण महोत्सवात सहभागी झाल्याचे उघड झाले. त्यांना कोणी पास दिले. त्यांनी कोणत्या नेत्यांकडून प्रवेश मिळवला, याची माहिती मात्र उपलब्ध होत नाही.

आमदार आर्लेकर यांच्याकडून होती मोठी अपेक्षा 

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीपासून महोत्सवाला विरोध दर्शवला आणि वेळोवेळी पत्रकारांनी त्यांच्याकडे संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आपण दिलेला शब्द हा शेवटपर्यंत सत्य ठरवणार. परंतु तो शब्द सत्य ठरला नाही. आमदार आर्लेकर यांच्याकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. निदान महोत्सवाच्या दिवशी तरी ते रस्त्यावर येतील आणि महोत्सवाला विरोध करतील, अशी लोकांची अपेक्षा होती. परंतु या महोत्सवाच्या विरोधासाठी लोकच आले नसल्याने आपणही रस्त्यावर उतरलो नाही, असेही आर्लेकर म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाSunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हल