शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

पारंपरिक आकाशदिव्यांनी सजला पर्रीकरांचा पर्रा गाव, पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून साजरा केला दिव्यांचा उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 5:41 PM

आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली.

म्हापसा : आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली. म्हापशापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात बार्देस तालुक्यातील शेकडो लोकांनी यात भाग घेऊन हा उत्सव साजरा केला. 

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पर्रा गावात पारंपरिक पद्धतीने बनवण्यात येणा-या आकाशदिव्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पर्रा हे मूळ गाव. या उत्सवात माडाच्या झावळीपासून तयार केलेले, गवतापासून, पानांपासून तसेच अगदी साधे कागदी आकाशदिवे तयार करून प्रदर्शनाला मांडले होते. या स्पर्धेत तालुक्यातील सातशेहून जास्त लोक सहभागी झाले असल्याचे माहिती आयोजकांनी दिली. रस्ता दुतर्फा आकाशदिव्यांनी सजवण्यात आलेला. त्यामुळे येथील पूर्ण परिसर आकाशदिव्यांनी उजळून गेला होता. या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी लोकांबरोबर पर्यटकसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्वत: अंधारात राहून दुस-याला प्रकाशमय करणे हा दिवाळी सणामागचा मूळ उद्देश असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्रदीप मोरजकर यांनी दिली; पण हल्लीच्या काळात दीपावलीचा अर्थ व त्या मागची भावना युवा पिढीत कमी होत चालली आहे. युवा वर्ग वाममार्गाने जाऊ लागला आहे. दीपावली सणाची भावना त्यांच्या मनात रुजावी व हा उत्सव पुन्हा तेजोमय व्हावा यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मोरजकर यावेळी म्हणाले.   

पूर्वीच्या काळात घराघरातून आकाशकंदील पारंपारिक पद्धतीने बनवून लावले जायचे. आजच्या युवा पिढीत मात्र आकाशकंदील बनवण्याची आवड नष्ट होत चालली आहे. याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होत असलेला सोशल मीडियाचा प्रसार. आज दिवाळीला प्रदूषणाला उत्तेजन देणारे प्लास्टीकपासून बनवलेले रेडिमेड आकाशदिवे विकत घेऊन घरात लावले जातात. त्यामुळे पारंपारिकता लोकांजवळ असलेली कला नष्ट होत चालली आहे. या कलेली पुन्हा उभारी मिळावी व पर्यावरणाचा समतोल संतुलीत रहावा हा सुद्धा उद्देश ही स्पर्धा आयोजित करण्यामागे असल्याचे मोरजकर म्हणाले. 

आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणावर नरकासूराच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धाच्या नावावर काही युवक रात्रभर हिंडून दारूच्या नशेत धिंगाणा घालीत असतात. त्यामुळे युवकांची मानसिकता बिघडत चालली असून गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणावर उत्तेजन मिळत व त्यात बरीच वाढही झाली आहे. लोकांनी पुन्हा पारंपारिक रुढी व त्या मागचा उद्देश समजून घेऊन समाजाला आपले योगदान दिले पाहिजे, असेही मोरजकर यांनी सांगितले.

टॅग्स :diwaliदिवाळीgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर