शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

पंढरपूर वारीतून संस्कृती संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:54 IST

वीस पथके, चार हजार वारकऱ्यांचा सहभाग, राज्यभर भक्तिमय वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : गोव्यातून पंढरपूरला पायी वारीने जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावरूनच गोव्यात विठ्ठलाबद्दलचे प्रेम, भक्ती वाढत आहे. राज्यातून आज वीसपेक्षा अधिक पायी वाऱ्या पंढरपूरला जात आहेत. तसेच तीन ते चार हजार गोमंतकीय वारकरी त्यात सहभागी होतात. यातून आमच्या संस्कृती परंपरेला उभारी मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात केले.

साखळी रवींद्र भवनतर्फे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आयोजित 'अवघाची विठ्ठलू' कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी मधुकर परब, यशवंत राणे, ज्ञानेश्वर नाईक, गुणवंती पिळयेकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राचे संचालक अरुण रेड्डी, रवींद्र भवनचे संचालक श्रीरंग सावळ, श्याम गावस, दिनकर घाडी, रविराज च्यारी यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांकडून सत्कार सोहळा

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते शेतकरी मधुकर परब (आमोणा), यशवंत राणे (कुडणे), ज्ञानेश्वर नाईक (मायणा न्हावेली), गुणवंती शाबलो पिळयेकर (आंबेशी पाळी) यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना शेतकरी मधुकर परब यांनी शेती ही आमच्या गोव्याची ओळख आहे. त्यासाठी सरकार व मुख्यमंत्री सावंत सुविधा उपलब्ध करून देत आहेत. केवळ शेतकऱ्यांनी शेतात उतरण्याची इच्छाशक्ती बाळगावी व शेती बहरावी, असे आवाहन केले. विर्डी व वेळगे येथील दिंडी पथकांनी रवींद्र भवन परिसरातून रवींद्र भवनात दिंडी सादर करून वातावरणात भक्तिमय रंग भरला. अवघे रवींद्र भवन विठुनामाच्या गजरात दणाणून सोडले.

उद्घाटनाचा मान शेतकऱ्यांना

श्री देव विठ्ठल व शेतकरी वारकरी यांच्या जवळच्या नात्याचे साखळी रवींद्र भवनने व्यासपीठावर दर्शन घडविले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. सावंत उपस्थित होते. तरीही कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते करून नवीन पायंडा घालून दिला. मुख्यमंत्र्यांनीही स्वतः हातात पाण्याचा कलश घेऊन तो शेतकऱ्यांच्या हातात दिला व त्यांना सर्वप्रथम तुळशीच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याची विनंती केली. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक व स्वागतही केले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५