शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी आमदार विचारणार जाब; अधिवेशन कालावधी घटवल्याने वाढली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:01 IST

कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक उद्या मंगळवारी सायं. ४.३० वा. बोलावली आहे. अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरू होऊन ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

कामकाज सल्लागार समितीची ही बैठक आज, सोमवारी दुपारी १२ वाजता होणार होती. परंतु, अचानक वेळ बदलून सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आली. नंतर आमदारांना आणखी एक मेसेज पाठवण्यात आला. त्यानुसार ही बैठक पुढे ढकलून उद्या, मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चा होईल व तो मंजूर करून घेतला जाईल. तसेच विविध खात्यांच्या अनुदान मागण्याही संमत केल्या जातील. शुक्रवार खासगी दिवस असल्याने आमदारांना खासगी ठराव, खासगी विधेयके मांडता येतील. अद्याप सरकारकडून सादर होणार असलेली विधेयके निश्चित झालेली नाहीत. काही विधेयके कायदा खात्याकडे सल्ल्यासाठी आहेत. आमदारांकडून १५ जुलैपर्यंत प्रश्न स्वीकारले जातील.

वीरेश यांची नाराजी

सभापतींनी विरोधकांना सभागृहात बोलण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप, आरजी आदी सर्वच विरोधी पक्षांच्या आमदारांनी केली आहे. आता वारंवार बैठक पुढे ढकलली जात असल्याने आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी नाराजी व्यक्त केली. अधिवेशनाचे गांभीर्यच नसल्याचे यावरून स्पष्ट होते, असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. आमदार बोरकर म्हणाले की, गेल्यावर्षी पावसाळी अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज १८ दिवसांचे होते. यंदा तीन दिवस कमी करून प्रत्यक्ष कामकाज १५ दिवसांचे ठेवले आहे.

विजय सरदेसाईंकडून हल्लाबोल

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्या प्रश्नावर कडक समाचार घेताना संविधानाची खरी हत्या विधानसभेतच होत असल्याचे म्हटले आहे. 'आधी कामकाज कमी करायचे आणि नंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलवायची त्याला काय म्हणावे?' असा प्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले की 'विरोधी आमदार प्रश्न पाठवतात ते चर्चेला येतच नाहीत. सभापतींनी एक प्रश्न सत्ताधारी आमदाराचा व एक प्रश्न विरोधी आमदाराचा अशा पद्धतीने लॉटद्वारे प्रश्न काढण्याची व्यवस्था सुरू केली होती; परंतु आता ती बंद केली.

खरे तर विरोधकांना प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास मिळायला हवा; परंतु तसे होत नाही. सरदेसाई म्हणाले की, 'विरोधी पक्षनेते युरी आलेमाव काँग्रेसच्या संविधान बचाव अभियानांमध्ये भाषणे देतात. त्यांनी विधानसभा अधिवेशनात संविधानाची हत्या होते, त्यावर आवाज उठवावा.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला कोणताही अर्थ राहिलेला नाही. सार्वजनिक लेखा समितीच्या बैठका होत नाहीत. विरोधी पक्षाने आपला धर्म म्हणून तरी यावर आवाज उठवावा. याबाबतीत 'मॅच फिक्सिंग' होऊ नये. लोकशाही म्हणजे 'मॅक्स फिक्सिंग' असे लोकांना वाटू नये.'

एल्टन यांचीही नाराजी

काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता म्हणाले, पूर्वी प्रत्यक्ष कामकाज २१ दिवससुद्धा चालत होते. गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशन १८ दिवस चालले. आता ते कमी करून १५ दिवसांवर आणले आहे. ही विरोधकांची गळचेपी आहे. शिवाय पूर्वी लॉट पद्धतीने प्रश्न काढले जात होते. नंतर ती पद्धतही बंद केली. ती पूर्ववत व्हायला हवी, असे एल्टन म्हणाले. दरम्यान, विरोधी आमदारांकडून अधिवेशनाचा कालावधी याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण