शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मुंबई-गोवा पदयात्रा, अनेकांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 18:28 IST

अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘दि फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन’ आणि स्नेहबंधन या संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेली मुंबई-गोवा पदयात्रा मंगळवारी पनवेल येथे पोचली. येत्या १५ एप्रिल रोजी मडगांव येथे या पदयात्रेची सांगता होणार आहे. 

पणजी : अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘दि फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन’ आणि स्नेहबंधन या संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेली मुंबई-गोवा पदयात्रा मंगळवारी पनवेल येथे पोचली. येत्या १५ एप्रिल रोजी मडगांव येथे या पदयात्रेची सांगता होणार आहे. 

पदयात्रेचे गोवा समन्वयक एम. एस. राव यांनी दिलेल्या माहितीनुसार परेल येथील केईएम रुग्णालयाजवळ २३ रोजी या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. अवयवदान कार्यकर्ता सुनील देशपांडे यांच्यासह १५ ते २0 ज्येष्ठ नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले असून वाटेत त्या त्या ठिकाणचे डॉक्टर्स अवयवदानाबाबत लोकांना मार्गदर्शन करतील. या मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा व ग्रामीण रुग्णालये, खाजगी रुग्णालये यांना सदर उपक्रमास सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. 

मुंबई-गोवा मार्गावरील किनारपट्टीतील गावांमध्येही ही पदयात्रा जाणार असून एकूण ८६0 किलोमिटरचा पायी प्रवास करणार आहे. एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या किंवा शाळेच्या आवारात लोकांना सीडी, व्हिडियो चित्रफिती दाखवून अवयवदानाबाबत जागृती केली जाईल. इंडियन मेडिकल असोसिएशन, केईएम इस्पितळाचे डीन, ‘रोटो’ आदी संघटनांनी पदयात्रेला पाठिंबा दिलेला आहे. 

राव म्हणाले की, लोकांना केवळ मरणोत्तर नेत्रदानाबद्दलच माहीत आहे. हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड एवढेच नव्हे तर त्वचाही दान करता येते याबाबत तेवढी जागृती लोकांमध्ये झालेली नाही. ऐरोलीसारख्या ठिकाणी डॉ. केशवानी यांच्या इस्पितळात अनेक रुग्ण येतात जे आगित होरपळल्याने गंभीर जखमी झालेले असतात. अशा रुग्णांना त्त्वचेची गरज असते. डोळे व त्त्वचा दोन ते तीन वर्षे प्रयोगशाळेमध्ये संवर्धित करुन ठेवता येते परंतु मूत्रपिंड, हृदय यांच्या रोपणाबाबत मर्यादा आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही तासांच्या आतच ते काढून गरजू रुग्णावर रोपण करावे लागते. मध्यंतरी चेन्नई येथून हृदय आणून मुंबईतील एका गरजू रुग्णावर त्याचे यशस्वीरित्या रोपण करण्यात आले त्यामुळे त्याला जीवदान मिळाले. 

राव म्हणाले की, गोव्यात दरवर्षी सुमारे ३ हजार रस्ता अपघात घडतात. गेल्या वर्षी ३८0 जण अपघातात ठार झाले. अशा व्यक्तींच्या अवयवांचे गरुजू रुग्णांवर रोपण झाल्यास गरजूंचे प्राण वाचतील. अवयवदानाबाबत लोकांमध्ये अनेक चुकीचे समज आहेत. मात्र ७0 वर्षे वयापर्यंत कोणीही व्यक्ती अवयवदान करु शकते. 

गोव्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर काही विषय आपण ठेवणार आहे, असे राव यांनी सांगितले. गोव्यात पदयात्रेच्यावेळी मणिपाल इस्पितळाचे तसेच गोमेकॉचे डॉक्टर्सही लोकांना अवयवदानाबाबत मार्गदर्शन करतील, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :goaगोवा