शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

सामान्य कार्यकर्त्यांशी भावबंध जपणारा नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 14:33 IST

ज्या काळात गोव्यात भाजपचे काहीच बळ नव्हते व केवळ दोन किंवा तीन पंचायतींमध्येच भाजपचे सरपंच व पंच असायचे

- सद्गुरू पाटीलज्या काळात गोव्यात भाजपचे काहीच बळ नव्हते व केवळ दोन किंवा तीन पंचायतींमध्येच भाजपचे सरपंच व पंच असायचे, त्या काळात मनोहर पर्रीकर यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविण्याचे काम सुरू केले होते. पंच म्हणून किंवा सरपंच म्हणून एखादा कार्यकर्ता जर निवडून आला तर, पर्रीकर त्याच्याकडे जाऊन त्या कार्यकर्त्याचे अभिनंदन करत असत. खूप प्रारंभी श्रीपाद नाईक हे एकटेच आडपईमध्ये भाजपचे सरपंच होते. नंतरच्या काळात सदानंद शेट तानावडे वगैरे भाजप कार्यकर्ते सरपंच बनले. तानावडे हे पीर्ण पंचायतीवर निवडून यायचे. तिथे ते सरपंचही झाले होते, त्या वेळी पर्रीकर यांच्याविषयी आलेला अनुभव तानावडे अनेकदा सांगतात. पर्रीकरांनी प्रारंभीच्या काळात कायम सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला व तो संपर्क वाढवत नेला. म्हणून ते पूर्ण गोव्याचे नेते बनले. पायाला चक्रे लावल्याप्रमाणे पर्रीकर कायम गोवाभर खेड्यापाड्यांत फिरले. काणकोण किंवा सांगेच्या टोकाला सकाळी कधीही भाजपचा किंवा सरकारी कार्यक्रम असो. पर्रीकर त्या कार्यक्रमाला पोहचायचेच व दिवसभर कामासाठी वेळ देऊन रात्री उशिरा घरी पोहचले तरी, दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी लवकर त्यांचे काम पुन्हा सुरू व्हायचे. फार दुर्मिळ असे हे गुण आहेत, असे तानावडे नमूद करतात.पर्रीकर त्या वेळी म्हणजे ९० च्या दशकात अनेकदा आमच्या घरी येत होते. आपले अभिनंदन करत असत. मी पंचायतीवर निवडून येतो, सरपंच होतो, याचे त्यांना त्या वेळी कौतुक वाटायचे. पर्रीकर यांनी भाजपमध्ये त्याकाळी मला प्रोत्साहन दिले. पर्रीकर एरव्ही कठोर दिसत असले तरी, ते काहीवेळा भावूकही व्हायचे व मी स्वत: तसा अनुभव घेतलेला आहे. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अचानक मला रात्रीच्यावेळी तिकीट जाहीर केले गेले होते. ती निवडणूक मी हरलो. मात्र, नंतरची निवडणूक मी जिंकलो व आमदार झालो. पर्रीकर यांचे मार्गदर्शन मला कायम लाभले. भाजपचा एखादा सोहळा जर आयोजित करायचा झाला तर, पर्रीकर छोट्या छोट्या व्यवस्थापनातही बारकाईने लक्ष घालतात व सोहळा यशस्वी व्हावा म्हणून प्रचंड कष्ट घेतात, असा अनुभव मला मी राज्यस्तरीय पदाधिकारी बनल्यानंतरही कायम आला. ते मुख्यमंत्री म्हणून काम करताना खूप व्यस्त असायचे; पण पक्षाचा एखादा कार्यक्रम, सभा, मेळावा आयोजित करत असताना ते अनेकदा आम्हाला फोन लावून तयारी कुठवर पोहचली आहे याची माहिती घ्यायचे. ते कामय पक्षाचाच विचार करायचे, असे तानावडे सांगतात.माझे लग्न ठरले तेव्हा बेळगावला लग्नाचे साहित्य आणण्यासाठी मला जायचे होते. मी तेव्हा साधा कार्यकर्ता होतो. तेव्हा भाजपमध्ये पर्रीकरांकडेच चारचाकी वाहन होते. मी बेळगावला जात असल्याचे पर्रीकरांना सांगितले व पर्रीकरांनी वाहन दिले. ते घेऊन मी लग्नाचे साहित्य घेऊन आलो होतो. त्याकाळी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशा प्रकारे पर्रीकर यांचा आधार वाटायचा, असे तानावडे यांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा