शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Maharashtra Bandh : महाराष्ट्रातील विविध भागात जाणार्‍या कदंब महामंडळाच्या 36 बस फेऱ्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:08 IST

Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदमुळे गोव्यातून मिरज, कोल्हापूर सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण तसेच अन्य ठिकाणी जाणाऱ्या कदंब बसगाड्यांच्या 36 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. 

पणजी : महाराष्ट्र बंदमुळे गोव्यातून मिरज, कोल्हापूर सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण तसेच अन्य ठिकाणी जाणाऱ्या कदंब बसगाड्यांच्या 36 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. गाड्या पत्रादेवी दोडामार्ग सातार्डा हद्दीपर्यंतच जात आहेत. कदंब नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात जाणाऱ्या कदंबच्या काही बसगाड्या सकाळी गेल्या परंतु हद्दीपर्यंतच प्रवाशांची सोय करण्यात आली. महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या एसटी बस गाड्याही येऊ शकलेल्या नाहीत.सकाळी पुणे मिरज कोल्हापूर मालवण वेंगुर्ले सावंतवाडी या ठिकाणी जाण्यासाठी कदंबच्या बसगाड्या निघतात. महाराष्ट्र बंदमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा गाड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी या फेऱ्या रद्द करण्यात  आल्या आहेत.

(Maharashtra Bandh Live Updates: पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड)

मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आंदोलनात याआधी झालेल्या गाड्यांच्या जाळपोळीची दखल घेऊन कदंबच्या बसगाड्यांना हानी पोहोचू नये यासाठी वरील निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात हा बंद कडकडीत पाळला जाण्याची शक्यता आहे  त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून हद्दीपर्यंत गाड्या जात आहेत. सायंकाळी परिस्थिती निवडल्यास पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या निघतील असे सांगण्यात आले. खासगी ट्रॅव्हल्स गाड्या मात्र नेहमीप्रमाणे चालू आहेत आणि कोल्हापूरकडे तसेच अन्य भागातही खासगी बसगाड्या रवाना झालेल्या आहेत.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Reservationमराठा आरक्षणgoaगोवाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा