शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

चला, हरित गोवा संकल्प करूया; पर्यावरण संवर्धनासाठी एक होऊया!; मुख्यमंत्र्यांची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 07:14 IST

खारफुटी, खाजन जमिनीच्या अहवालासोबत किनाऱ्यांचाही अभ्यास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील पर्यावरणाचे संवर्धन कसे करता येईल, पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार आम्ही राज्य पर्यावरण अहवाल जाहीर केला आहे. या व्यतिरिक्त खारफुटी बाबतचा अहवाल देखील तयार केला आहे. सध्या किनाऱ्याची होणारी धूप नियंत्रणात आणण्याचा अभ्यास सुरू असून हरित गोवा साकारण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पर्यावरण खात्यातर्फे आयोजित पर्यावरण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, पर्यावरण खात्याचे सचिव अरुण कुमार मिश्रा व संचालक सचिन देसाई उपस्थिती होते.

खाजन जमिनींचे व्यवस्थापन आम्ही पहिल्यांदाच लोकांसमोर ठेवू शकलो. यातून खाजन जमिनी संदर्भातील समस्या जाणून घेण्यास मदत होईल व उपाययोजनाही करता येतील. म्हणून हा आराखडा देखील आम्ही लोकांसमोर ठेवला. खारफुटी वाचविण्याचे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे ध्येय ठेऊनच हा अहवाल आम्ही तयार केला, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले. प्लास्टिकचा जेव्हा शोध लागला होता तेव्हा सर्वांना आनंद झाला होता. पण त्याची विल्हेवाट करण्याबाबत जास्त विचार झाला नाही. आता प्लास्टिक नष्ट करण्यासाठी उपाय शोधणे सुरू आहे. प्लास्टिकच्या वापरात गोवा देशातील इतर राज्यांमध्ये खालून तिसऱ्या क्रमांकावर आहे, ही चांगली गोष्ट आहे. प्लास्टिक मुक्त गोवा है आतापर्यंत कागदावरच असून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी लोकांची साथ आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

गोवा हे नितळ राज्य आहे, हरित क्रांती आणण्यावर दिला भर. साळगाव आणि काकोडा येथील बायोमेट्रिक कचरा प्रकल्प अनेकांसाठी प्रेरणादायी. किनारी भागात आणि महत्त्वांच्या शहरात सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट प्रस्थापित केले. आम्ही नदीत टाकलेले प्लास्टिक मासे खातात आणि ते मासे आम्ही खातो म्हणजे अप्रत्यक्ष आम्ही प्लास्टिक खातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत ते फिट इंडिया मोहीम चालवून भविष्यातील भारताची निव ठेवली. राज्यात या मोहिमंतर्गत आम्ही पर्यावरण रक्षणासाठी काम केले.

प्लास्टिक बंदी स्वतः पासून सुरू करा

सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, घरातले प्लास्टिक काढून रस्त्यावर टाकणे जोपर्यंत आपण बंद करत नाही तोपर्यंत आपले राज्य प्लास्टिक मुक्त होणार नाही. प्लास्टिक मुक्त गोवा हे आपल्याच हातात आहे. आपण आपला विचार बदलणे आवश्यक आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची धास्ती

राज्याला प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळची स्थापना करण्यात आली आहे. पण अनेक उद्योजकांना वाटते की प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांच्या मागेच लागले आहे. त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत आहे, पण असे काहीच नसून ते केवळ प्रदूषण मुक्त राज्य या ध्येयाच्च्या मागे आहे. या मंडळाच्या मदतीने राज्य प्लास्टिक व प्रदुषण मुक्त होण्याचा वाटेवर आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतWorld Environment DayWorld Environment Dayenvironmentपर्यावरण