शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

कर्नाटकचे म्हादईसाठी आणखी एक पाऊल पुढे; ९.२७ एकर जमीन संपादनासाठी अधिसूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 07:39 IST

खानापूरच्या चार गावांमधील ९.२७ एकर जमीन संपादनासाठी अधिसूचना जारी.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कर्नाटकने म्हादईसाठी एक पाऊल पुढे टाकत भंडुरा प्रकल्पासाठी खानापूरच्या चार गावांमधील ९.२७ एकर जमीन संपादित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध डावलून कर्नाटकच्या राज्यपालांच्या सहीने ही अधिसूचना करण्यात आली आहे. यावरून म्हादईचे आणखी पाणी वळवण्यासाठी कर्नाटक ठाम असल्याचे दिसून येत आहे.

हुबळी - धारवाड, कुंडगोल आणि इतर भागांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भंडुरा प्रकल्प आवश्यक असल्याचे नमूद करीत शेतकऱ्यांचा विरोध धुडकावून लावण्यात आला आहे. खानापूरच्या करंबळ, रूमेवाडी, शेडेगाळी, आसोगा आदी गावांमध्ये हे भूसंपादन होणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने म्हादई जल तंटा लवादाचा कार्यकाळ आणखी वर्षभराने वाढवला आहे. १६ ऑगस्ट रोजी कार्यकाळ संपला होता. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र यांच्यात म्हादईच्या पाण्यावरून असलेल्या तंट्याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी आता लवादाला एक वर्षाची मुदत मिळाली आहे.म्हादईबाबत गोवा विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला होता. विरोधकांनी सरकार गंभीर नसल्याचा आरोपही केला होता.

खानापूरवासीयांचा विरोध

खानापूरमध्ये शेतकऱ्यांचा कळसा -भंडुरा प्रकल्प आणि भूसंपादन प्रक्रियेला विरोध आहे. बाधित शेतकऱ्यांनी नेरसा येथे सुरू असलेली कामे थांबवण्याची मागणी करून जोरदार निदर्शने केली होती. असोगा, मंतुरगा, रुमेवाडी आणि करंबळ येथील शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले होते. हा विरोध डावलून आता अधिसूचना काढण्यात आली आहे.

...तर कर्नाटकविरोधात अवमान याचिका

नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात म्हादईचा विषय आला होता, तेव्हा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कर्नाटकविरोधात पुन्हा अवमान याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. 

टॅग्स :goaगोवाriverनदीState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारणKarnatakकर्नाटक