शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

धबधब्यावर लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:47 IST

पावसाळा म्हटला की निसर्गामुळे, काही प्रमाणात बेजबाबदार माणसांमुळे, पर्यटकांमुळे दुर्घटना या घडतच असतातच. अशा काही घटना टाळता येतात.

अ‍ॅड. शिवाजी देसाई, ब्रह्माकरमळी

गोवा राज्यात नदी, समुद्र, आणि धबधब्यावर वारंवार मुले, तरुणांचे मृत्यू होताना दिसत आहे. नेत्रावळी सांगे येथील मैनापी धबधब्यावर यंदाच्या पावसाळ्यात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने सरकार खडबडून जागे झाले आणि वनक्षेत्रातील धबधब्यावर जाण्यास बंदी घालणारे परिपत्रक काढले. कोणती तरी विपरीत घटना घडते आणि मग आपल्याला झोपेतून जाग येते अशातला हा प्रकार वास्तविक विपरीत गोष्टी रोखण्यासाठी सरकारकडे दूरदृष्टी असणे आवश्यक असते. पण ती दिसून येत नाही. अनेकवेळा सामाजिक कार्यकर्ते ओरडून ओरडून सरकारला सांगत असतात, सरकारला जागे करत असतात. पण, सरकारला त्यांचे ऐकून घेण्यात अजिबात स्वारस्य नसते. सरकारला वाटते की जर त्या सामाजिक कार्यकर्त्यांचे ऐकून घेतले तर त्याला श्रेय मिळेल आणि तो कदाचित उद्या राजकीयदृष्ट्या मोठा झाला तर?

धबधब्यावर जे पर्यटक धुडगूस घालतात ते रोखण्यासाठी उपाययोजना करा, असे मी स्वतः अनेक माध्यमांतून सरकारला सांगितलेले आहे. निवेदनेदेखील दिली आहेत. एवढेच नव्हे तर सत्तरी मामलेदार कार्यालयात एक याचिका घालून माझ्या गावातील ब्रह्माकरमळी धबधब्यावर प्लास्टिक आणि दारू बंदी देखील केली. पण उपयोग काय? या याचिकेच्या निकालानंतर काही काळ पोलिस आणि अबकारी खात्याचे, वनखात्याचे कर्मचारी दर रविवारी धबधब्याच्या ठिकाणी येऊन उभे असायचे. पण आता कुठे काय, आता कुणीही पोलिस तिथे दिसत नाहीत. आज प्रत्येक सामाजिक विषयाकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहिले जाते. त्यामुळे लोक सुचवत असलेल्या अनेक गोष्टींकडे सरकार दुर्लक्ष करते. जर सरकारमधील राजकीय पक्षाचा माणूस असेल किंवा मंत्र्याचा माणूस असेल आणि तो जर काही सुचवत असेल तरच सरकारचे लक्ष जाते. किंवा एखादे मोठे आंदोलन होते, त्या आंदोलनामुळे सरकार धोक्यात येते, तेव्हा मग सरकार विचार करायला लागते, असे अनेकदा झाले आहे.

वास्तविक पावसाळा म्हटला की, काही प्रमाणात निसर्गामुळे व बेजबाबदार माणसांमुळे, पर्यटकांमुळे दुर्घटना या घडतच असतातच. अशा काही घटना टाळता येतात. पण काही दुर्घटना अशा काही घडतात की, आपण हतबल ठरतो. त्या टाळता येत नाहीत. मात्र दुर्घटना घडू नये म्हणून अगोदरच पावसाळ्यापूर्वी सरकारने नियोजन करणे आवश्यक असते. त्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा आपत्कालीन यंत्रणेस बरोबर घेऊन कार्य करू शकतात. त्यासाठी सरकारमध्ये इच्छाशक्ती असायला हवी. जनतेचे जीवन सुरक्षित ठेवणे ही जबाबदारी सरकारची आहे.

ग्रामीण भागात नवीन दारूच्या दुकानांना परवानगी नको, हे धोरण माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या सरकारने राबविले. पण आज अनेक दारूच्या दुकानांचा आणि बारचा अनेक गावात सुळसुळाट झाला आहे. धबधब्यावर, नदी, समुद्राच्या ठिकाणी कोणीही दारू प्यायलेला आढळल्यास त्याला कडक शिक्षा करण्याची तरतूद असायला हवी. धबधब्यावर कोण कोण कधी जातो, याची नोंद सरकारकडे असायला हवी. 

प्रत्येक धबधब्यावर सुरक्षा रक्षक, सुरक्षा फलक, नीट वाटा, रस्ते, कचरा कुंडी हवी. निसर्गाचा आस्वाद सर्वांनी जरूर घ्यावा. पण तो निसर्ग सांभाळून. वास्तविक पावसाळी पर्यटनाच्या माध्यमातून सरकार आपली गंगाजळीदेखील वाढवू शकते. पण सरकारने त्याकरिता सुनियोजित धोरण आखायला हवे. जनतेकडून त्यासाठी सूचना मागवायला हव्यात. सामाजिक कार्यकर्ते काय सांगतात, याकडे दुर्लक्ष करून काय उपयोग? शेवटी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे हे लक्षात असू द्या. धबधब्यांच्या ठिकाणी लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे, याची जाणीव सरकारला आणि सर्वसामान्य माणसाला असायला हवी.

 

टॅग्स :goaगोवा