शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

धबधब्यावर लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:47 IST

पावसाळा म्हटला की निसर्गामुळे, काही प्रमाणात बेजबाबदार माणसांमुळे, पर्यटकांमुळे दुर्घटना या घडतच असतातच. अशा काही घटना टाळता येतात.

अ‍ॅड. शिवाजी देसाई, ब्रह्माकरमळी

गोवा राज्यात नदी, समुद्र, आणि धबधब्यावर वारंवार मुले, तरुणांचे मृत्यू होताना दिसत आहे. नेत्रावळी सांगे येथील मैनापी धबधब्यावर यंदाच्या पावसाळ्यात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने सरकार खडबडून जागे झाले आणि वनक्षेत्रातील धबधब्यावर जाण्यास बंदी घालणारे परिपत्रक काढले. कोणती तरी विपरीत घटना घडते आणि मग आपल्याला झोपेतून जाग येते अशातला हा प्रकार वास्तविक विपरीत गोष्टी रोखण्यासाठी सरकारकडे दूरदृष्टी असणे आवश्यक असते. पण ती दिसून येत नाही. अनेकवेळा सामाजिक कार्यकर्ते ओरडून ओरडून सरकारला सांगत असतात, सरकारला जागे करत असतात. पण, सरकारला त्यांचे ऐकून घेण्यात अजिबात स्वारस्य नसते. सरकारला वाटते की जर त्या सामाजिक कार्यकर्त्यांचे ऐकून घेतले तर त्याला श्रेय मिळेल आणि तो कदाचित उद्या राजकीयदृष्ट्या मोठा झाला तर?

धबधब्यावर जे पर्यटक धुडगूस घालतात ते रोखण्यासाठी उपाययोजना करा, असे मी स्वतः अनेक माध्यमांतून सरकारला सांगितलेले आहे. निवेदनेदेखील दिली आहेत. एवढेच नव्हे तर सत्तरी मामलेदार कार्यालयात एक याचिका घालून माझ्या गावातील ब्रह्माकरमळी धबधब्यावर प्लास्टिक आणि दारू बंदी देखील केली. पण उपयोग काय? या याचिकेच्या निकालानंतर काही काळ पोलिस आणि अबकारी खात्याचे, वनखात्याचे कर्मचारी दर रविवारी धबधब्याच्या ठिकाणी येऊन उभे असायचे. पण आता कुठे काय, आता कुणीही पोलिस तिथे दिसत नाहीत. आज प्रत्येक सामाजिक विषयाकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहिले जाते. त्यामुळे लोक सुचवत असलेल्या अनेक गोष्टींकडे सरकार दुर्लक्ष करते. जर सरकारमधील राजकीय पक्षाचा माणूस असेल किंवा मंत्र्याचा माणूस असेल आणि तो जर काही सुचवत असेल तरच सरकारचे लक्ष जाते. किंवा एखादे मोठे आंदोलन होते, त्या आंदोलनामुळे सरकार धोक्यात येते, तेव्हा मग सरकार विचार करायला लागते, असे अनेकदा झाले आहे.

वास्तविक पावसाळा म्हटला की, काही प्रमाणात निसर्गामुळे व बेजबाबदार माणसांमुळे, पर्यटकांमुळे दुर्घटना या घडतच असतातच. अशा काही घटना टाळता येतात. पण काही दुर्घटना अशा काही घडतात की, आपण हतबल ठरतो. त्या टाळता येत नाहीत. मात्र दुर्घटना घडू नये म्हणून अगोदरच पावसाळ्यापूर्वी सरकारने नियोजन करणे आवश्यक असते. त्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा आपत्कालीन यंत्रणेस बरोबर घेऊन कार्य करू शकतात. त्यासाठी सरकारमध्ये इच्छाशक्ती असायला हवी. जनतेचे जीवन सुरक्षित ठेवणे ही जबाबदारी सरकारची आहे.

ग्रामीण भागात नवीन दारूच्या दुकानांना परवानगी नको, हे धोरण माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या सरकारने राबविले. पण आज अनेक दारूच्या दुकानांचा आणि बारचा अनेक गावात सुळसुळाट झाला आहे. धबधब्यावर, नदी, समुद्राच्या ठिकाणी कोणीही दारू प्यायलेला आढळल्यास त्याला कडक शिक्षा करण्याची तरतूद असायला हवी. धबधब्यावर कोण कोण कधी जातो, याची नोंद सरकारकडे असायला हवी. 

प्रत्येक धबधब्यावर सुरक्षा रक्षक, सुरक्षा फलक, नीट वाटा, रस्ते, कचरा कुंडी हवी. निसर्गाचा आस्वाद सर्वांनी जरूर घ्यावा. पण तो निसर्ग सांभाळून. वास्तविक पावसाळी पर्यटनाच्या माध्यमातून सरकार आपली गंगाजळीदेखील वाढवू शकते. पण सरकारने त्याकरिता सुनियोजित धोरण आखायला हवे. जनतेकडून त्यासाठी सूचना मागवायला हव्यात. सामाजिक कार्यकर्ते काय सांगतात, याकडे दुर्लक्ष करून काय उपयोग? शेवटी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे हे लक्षात असू द्या. धबधब्यांच्या ठिकाणी लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे, याची जाणीव सरकारला आणि सर्वसामान्य माणसाला असायला हवी.

 

टॅग्स :goaगोवा