शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

भारतीय उद्योग महासंघाचा राष्ट्रीय जलमार्गांना पाठिंबा; दळण-वळणाचे गोवा बनेल हब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 7:03 PM

राज्यात सहा नद्यांना केंद्र सरकारकडून राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला गेला असून, ते स्वागतार्ह आहे. या जलमार्गाचा वापर सुरू झाल्यास इतर वाहतुकीचा खर्च वाचणार असून, या सेवेची अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर राज्याने आपले पुरवठा धोरणही लवकर निश्चित करावे, अशी मागणी भारतीय उद्योग महासंघाने(सीआयआय) शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. 

पणजी : राज्यात सहा नद्यांना केंद्र सरकारकडून राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला गेला असून, ते स्वागतार्ह आहे. या जलमार्गाचा वापर सुरू झाल्यास इतर वाहतुकीचा खर्च वाचणार असून, या सेवेची अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर राज्याने आपले पुरवठा धोरणही लवकर निश्चित करावे, अशी मागणी भारतीय उद्योग महासंघाने(सीआयआय) शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. या परिषदेस सीआयआयचे राज्य आयुक्त अत्रेय सावंत, संयोजक अँथनी गास्केल, सदस्य अतुल जाधव आणि रोशन कुमार हे उपस्थित होते. याप्रसंगी गास्केल म्हणाले की, जुलै महिन्यात सीआयआयने उद्योगांना पुरक सुविधा (लॉजिस्टिक्स) धोरणावर परिषद घेतली होती. त्यात पुरवठय़ासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विचारमंथन झाले होते. त्यावेळी या परिषदेत सहभागी झालेल्या लोकांनी पायाभूत विकास तथा सुविधा निर्माण करण्याच्या विषयावर एकमत दर्शविले होते. पायाभूत सुविधा निर्माण करताना रस्ते, रेल्वे वाहतुकीबरोबरच राष्ट्रीय जलमार्गाचा वापर होणो आवश्यक असल्याचे परिषदेला वाटते. त्यामुळे राष्ट्रीय जलमार्ग झाल्यास समुद्राकाठी आणि नदीकाठी उभारल्या जाणा:या जेटींमुळे त्या परिसराचा विकास होणार मोठी गुंतवणूक त्यात होणार आहे. तसेच समुद्र पर्यटन वाढ होण्याबरोबरच हॉटेल व्यवसायांनाही ते पूरक ठरणार आहे. या मार्गामुळे रोजगार निर्मितीही होणार असल्याने ग्रामपंचायतींनी त्याला विरोध करू नये. 

राज्य दळण-वळणाचे हब बनेल!राष्ट्रीय जलमार्गाची सुविधा निर्माण झाली तर गोवा हे दळण-वळणाचे हब बनेल. नद्यांवर सरकारचा हक्क असून, ती काही खासगी मालमत्ता नाही. त्यामुळे जलमार्गाना विरोध करणो चुकीचे आहे. सागरमाला ही योजनासुद्धा राष्ट्रीय जलमार्गासाठी उपयुक्त ठरणार आहे. केंद्र सरकार या कामासाठी संपूर्ण निधीची तरतूद करीत असल्याने राज्य सरकारचे केवळ त्यावर लक्ष राहणार आहे. कार्गोसाठी (मालवाहू जहाज) लागणारी सर्व सुविधा जलमार्गासाठी उभारण्यात येणा:या जेटीवर असणार आहे. त्याचबरोबर या जेटींचा बाज्रेसनाही उपयोग करता येऊ शकतो. 

टॅग्स :goaगोवा