शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

इटीपी प्रकल्प नसल्यास कारखाने कंपनी बंद करणार, पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचा उद्योजकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 16:32 IST

राज्याचे पर्यावरणाचे संर्वधन करणे फक्त सरकारची जबाबदारी नसून सर्वांची आहे. त्यामुळे कंपनी कारखान्यांनी पर्यावरणाच्या जतनाचा पुढाकार घ्यावा.

नारायण गावस -

पणजी: राज्यातील कारखाने कंपन्यांनी दुषित पाणी आपल्या इटीपी प्रकल्पामध्ये ट्रीट करावे इटीपी प्रकल्प नसल्यास कारखाने कंपनी बंद करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील कारखाने कंपन्यांना दिला आहे. पर्यावरण खाते, गोवा प्रदूषण मंडळ व गोवा जैवविविधता मंडळ यांनी आयोजित केलेल्या जागितक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी त्यांच्या सोबत पर्यावरण मंत्री ॲलेक्स सिक्वेरा, आमदार ॲलेक्स रेजिनाल्ड मुख्य सचिव पुनीत गाेयल तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे पर्यावरणाचे संर्वधन करणे फक्त सरकारची जबाबदारी नसून सर्वांची आहे. त्यामुळे कंपनी कारखान्यांनी पर्यावरणाच्या जतनाचा पुढाकार घ्यावा. त्यांनी दुषित पाणी नदी नाल्यात सोडू नये. तसेच हॉटेल व्यवसायिकांनी रस्त्यावर कचरा फेकू नये. लोकांनी आपल्या घरातील कचरा रस्त्यावर किंवा नदीत फेकू नयेे. कचरा व्यवस्थापनासाठी सरकार कराेडो रुपये खर्च करत आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

पंचायतींना फंड वाढवून देणारमुख्यमंत्री म्हणाले, ज्या पंचायती आपल्या भागातील कचऱ्याचे नियाेजन करतात त्यांना सरकारकडून फंड वाढवून दिला जाणार आहे. तसेच त्यांना सरकार हरित प्रमाणत पत्र दिले जाणार आहे. यंदा ठाणे आणि मेणकुरे पंचायतीला दिले आहे. तसेच पुढे शाळांनाही असे हरित प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बांबूची लागवड वाढविणारमुख्यमंत्री म्हणाले, जमिनीची झीज हाेऊ नये यासाठी सरकार या वर्षापासून बांबू लागवडीवर भर देणार आहे. यासाठी ९ प्रजातीचे बांबू सरकारकडून मोफत दिले जाणार आहे. तसेच ५ वर्षांनी ते परत विकत घेण्याची सोयही केली जाणार आहे. लोकांनी आपल्या जमिनीत बांबू लागवड करावी जेणेकरुन जमिनीची झीज हाेणे कमी होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणाचे जतन करतात अशा कंपनी तसेच पंचायतींना हरित प्रमाणपत्र देण्यात आले.

पर्यावरण मंत्री ॲलेक्स सिक्वेरा म्हणाले, पर्यावरणाच्या जतनासाठी सर्वांनी सहकार्य करावे सरकार विविध उपक्रम राबवित आहे. लाेकांनी सेंद्रीय खताचा वापर करावा, पणी वाया न घालवता याेग्य वापर करावा. वीज वाया न घालवता त्याचाही याेग्य वापर करावा. अशा काही सोप्या गोष्टी आम्ही केल्या तर पर्यावरणाचे जतन होऊ शकते. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा