शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इटीपी प्रकल्प नसल्यास कारखाने कंपनी बंद करणार, पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचा उद्योजकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 16:32 IST

राज्याचे पर्यावरणाचे संर्वधन करणे फक्त सरकारची जबाबदारी नसून सर्वांची आहे. त्यामुळे कंपनी कारखान्यांनी पर्यावरणाच्या जतनाचा पुढाकार घ्यावा.

नारायण गावस -

पणजी: राज्यातील कारखाने कंपन्यांनी दुषित पाणी आपल्या इटीपी प्रकल्पामध्ये ट्रीट करावे इटीपी प्रकल्प नसल्यास कारखाने कंपनी बंद करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील कारखाने कंपन्यांना दिला आहे. पर्यावरण खाते, गोवा प्रदूषण मंडळ व गोवा जैवविविधता मंडळ यांनी आयोजित केलेल्या जागितक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी त्यांच्या सोबत पर्यावरण मंत्री ॲलेक्स सिक्वेरा, आमदार ॲलेक्स रेजिनाल्ड मुख्य सचिव पुनीत गाेयल तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे पर्यावरणाचे संर्वधन करणे फक्त सरकारची जबाबदारी नसून सर्वांची आहे. त्यामुळे कंपनी कारखान्यांनी पर्यावरणाच्या जतनाचा पुढाकार घ्यावा. त्यांनी दुषित पाणी नदी नाल्यात सोडू नये. तसेच हॉटेल व्यवसायिकांनी रस्त्यावर कचरा फेकू नये. लोकांनी आपल्या घरातील कचरा रस्त्यावर किंवा नदीत फेकू नयेे. कचरा व्यवस्थापनासाठी सरकार कराेडो रुपये खर्च करत आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

पंचायतींना फंड वाढवून देणारमुख्यमंत्री म्हणाले, ज्या पंचायती आपल्या भागातील कचऱ्याचे नियाेजन करतात त्यांना सरकारकडून फंड वाढवून दिला जाणार आहे. तसेच त्यांना सरकार हरित प्रमाणत पत्र दिले जाणार आहे. यंदा ठाणे आणि मेणकुरे पंचायतीला दिले आहे. तसेच पुढे शाळांनाही असे हरित प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बांबूची लागवड वाढविणारमुख्यमंत्री म्हणाले, जमिनीची झीज हाेऊ नये यासाठी सरकार या वर्षापासून बांबू लागवडीवर भर देणार आहे. यासाठी ९ प्रजातीचे बांबू सरकारकडून मोफत दिले जाणार आहे. तसेच ५ वर्षांनी ते परत विकत घेण्याची सोयही केली जाणार आहे. लोकांनी आपल्या जमिनीत बांबू लागवड करावी जेणेकरुन जमिनीची झीज हाेणे कमी होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणाचे जतन करतात अशा कंपनी तसेच पंचायतींना हरित प्रमाणपत्र देण्यात आले.

पर्यावरण मंत्री ॲलेक्स सिक्वेरा म्हणाले, पर्यावरणाच्या जतनासाठी सर्वांनी सहकार्य करावे सरकार विविध उपक्रम राबवित आहे. लाेकांनी सेंद्रीय खताचा वापर करावा, पणी वाया न घालवता याेग्य वापर करावा. वीज वाया न घालवता त्याचाही याेग्य वापर करावा. अशा काही सोप्या गोष्टी आम्ही केल्या तर पर्यावरणाचे जतन होऊ शकते. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा