शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
5
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
6
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
7
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
8
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
9
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
10
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
11
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
12
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
13
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
14
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
15
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
16
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
17
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
18
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
19
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
Daily Top 2Weekly Top 5

'आयसीजीएस अचल' देशसेवेत दाखल; भारताच्या सागरी सुरक्षेला मिळणार बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:46 IST

गोवा शिपयार्डमध्ये अत्याधुनिक गस्ती जहाजाचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : भारताच्या सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल म्हणून भारतीय तटरक्षक दलात नवीन पिढीतील जलदगती गस्ती जहाज 'आयसीजीएस अचल' अधिकृतपणे सेवेत दाखल झाले. या जहाजाचे अनावरण शनिवारी गोवा शिपयार्डमध्ये आयोजित विशेष समारंभात करण्यात आले.

अनावरण संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि महासंचालक (अधिग्रहण) ए. अन्बारासू (आयएएस) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय तटरक्षक दलाचे उत्तर पश्चिम विभागाचे इन्स्पेक्टर जनरल टेकूर सशी कुमार, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष आणि प्रमुख व्यवस्थापकीय संचालक ब्रजेशकुमार उपाध्याय, केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

'अचल' या नावाचा अर्थ 'दृढ' किंवा 'अविचल' असा असून, समुद्रातील सुरक्षा आणि जीवसृष्टीचे रक्षण करण्याच्या तटरक्षक दलाच्या ठाम बांधीलकीचे ते प्रतीक मानले जात आहे.

जहाजाची वैशिष्ट्ये

हे जहाज पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, सुमारे ५१ मीटर लांबीचे आहे. त्यात ५० टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा समावेश असून, 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' उपक्रमांना चालना देणारे ठरले आहे. 'आयसीजीएस अचल'मध्ये प्रत्येकी ३००० किलोवॅट क्षमतेची दोन डिझेल इंजिने असून, ते २७ नॉट्स वेगाने प्रवास करू शकते.

तसेच १५०० नॉटिकल मैलांपर्यंत कार्यक्षमतेने कार्य करण्याची क्षमता त्यात आहे. जहाजात ३० मिमी सीआरएन-९१ तोफ, १२.७ मिमी स्थिरित रिमोट कंट्रोल्ड गन्स, तसेच अत्याधुनिक लक्ष्य ओळख व फायर-कंट्रोल प्रणाली बसवण्यात आली आहे. इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टम आणि ऑटोमेटेड पॉवर मॅनेजमेंट सिस्टममुळे जहाजाची कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढली आहे.

अनावरण होऊन देशसेवेत दाखल झालेले 'आयसीजीएस अचल' हे जहाज गुजरातमधील वाडीनार येथे तैनात करण्यात येणार असून, ते किनारी गस्त, शोथ व बचाव, तस्करीविरोधी कारवाई आणि प्रदूषण नियंत्रण मोहिमांमध्ये कार्यरत राहील.

याचे नेतृत्व कमांडंट (जेजी) नवीन कुमार करणार असून, पाच अधिकारी आणि ३४ जवान त्यावर कार्यरत असतील. या जहाजाच्या समावेशनामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार असून तटरक्षक दलाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ICGS Achal Commissioned: Boost to India's Maritime Security

Web Summary : ICGS Achal, a new generation fast patrol vessel, was commissioned into the Indian Coast Guard, enhancing maritime security. Built with indigenous technology, the ship will be deployed in Gujarat for coastal patrol and security operations.
टॅग्स :goaगोवाindian navyभारतीय नौदल