शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

अपघात रोखणार कसे? सरकारी यंत्रणाच सक्रिय व्हायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 10:21 IST

राज्यात वाहन अपघातांचे सत्र अजूनही थांबत नाही.

राज्यात वाहन अपघातांचे सत्र अजूनही थांबत नाही. केवळ सरकारी यंत्रणाच सक्रिय व्हायला हवी असे नाही तर समस्त वाहन चालकांनीही भानावर येण्याची गरज आहे. दर ४८ तासांत एकाचा रस्त्यावर बळी जात आहे. अगदी गणेश चतुर्थीच्या दिवसांतही अपघात झाले. बुधवारी तर चोवीस तासांत दोघांचा जीव गेला. बार्देश तालुक्यातील पर्रा साळगाव येथे स्वयंअपघातात ताहीर खान हा टॅक्सी चालक ठार झाला. दक्षिण गोव्यातील पांझरखण-कुंकळ्ळीतील महामार्गावरही त्याचदिवशी एक दुचाकीस्वार मरण पावला. तोही स्वयंअपघाताचाच बळी ठरला. ब्रँडन वाझ हा दुचाकीवरून येत असता महामार्गावरील रंबल्सवर त्याची दुचाकी घसरली. वेगात येणाऱ्या चालकाचे नियंत्रण राहत नाही, तेव्हा रबल्सवर किंवा गतिरोधकांवर तोल जातोच. बँडन त्याच पद्धतीने दुचाकीसह कोसळला व जखमी होऊन मरण पावला. 

अनेकदा वाहने वाट्टेल तशी चालविली जातात. कार, बस, ट्रक, जीप, पिकअप, टैंकर अशी वाहने चालविताना काही चालक कसलेच भान ठेवत नाहीत. मध्यरात्री किंवा पहाटे वाहन चालवताना तर विशेष काळजी घ्यावी लागते. अचानक डोळा लागू शकतो. चालक एकटाच असतो, बोलण्यासाठी कुणीच नसतो तेव्हा डुलकी लागण्याची शक्यता असते. अगदी क्षणक्षर जरी डोळे मिटले गेले तरी नियंत्रण जाते. 

प्रत्येकाचा जीव मौल्यवान आहे. काही दिवसांपूर्वीच पर्वरी परिसरात तिघा युवकांचा जीव गेला. भरधाव वाहन झाडावर ठोकले. त्यात तिघे मरण पावले अनेकदा रस्त्यावरून भरधाव जाणारे वाहन दुसऱ्याचा जीव घेते. रस्ता ओलांडणारी व्यक्ती, मॉर्निंग वॉक करणारे, दुचाकीने घरी जाणाऱ्या व्यक्तीला चार चाकी व अन्य वाहने उडवतात. दुचाकी चालवणारेही शिस्त पाळत नाहीत. कुठूनही रस्त्याच्या मध्यभागी घुसतात. गोव्यातील वाहतुकीचे नीट व्यवस्थापन करणारी यंत्रणा नाही. वाहतूक पोलिसांना भलत्याच कामात सरकारने गुंतवून ठेवले आहे. त्यांना परप्रांतीय व अन्य वाहनांना तालाव देण्याचेच टार्गेट ठरवून दिले आहे. जिथे अपघात होतात तिथेही पोलिस नसतात व जिथे वाहतूक कोंडी होते तिथेही पोलिस ड्युटी बजावताना दिसत नाहीत. जेव्हा राज्यपाल व मुख्यमंत्री एखाद्या रस्त्यावरून जायचे असतात, तेव्हाच वाहतूक पोलिसांची फौज रस्त्यांवर सगळीकडे धावताना दिसत असते, अन्यथा वाहतूक पोलिस हे फक्त तालांव वसुली पोलिस झालेले आहेत. खरे म्हणजे सरकारने पोलिस खात्याचा वाहतूक विभाग मोडीत काढून तालांव विभाग स्थापन करावा लागेल.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वाढत्या वाहन अपघातांच्या विषयात गंभीरपणे लक्ष घातले तर बरे होईल. अपघात काही शंभर टक्के थांबणार नाहीत, पण निदान गंभीर अपघातांची मालिका खंडित तरी होऊ शकेल. रस्त्यावरील बळींचे प्रमाण तरी कमी होऊ शकेल. काही ठिकाणी धोकादायक वळणे आहेत, काही तिठ्यांच्या ठिकाणी साईन बोर्डस नाहीत. काही रस्त्यांवर गतिरोधक नाहीत, तर काही ठिकाणी रस्त्यांना अगदी टेकून वीज खांब व मोठी झाडे आहेत. सार्वजनिक बांधकाम, वीज खाते, आरटीओ, पोलिसांचा वाहतूक विभाग यांनी मिळून एकत्र उपाययोजना केली तर अपघातांची संख्या खूप कमी होईल. अनेक युवकांचे प्राण वाचतील. पण सरकारकडे अपघातांविरुद्ध उपाययोजना करायला वेळ आहे की नाही?

सध्या अनेक वाहन चालकांचे परवाने निलंबित होत आहेत. मात्र यातून अपघात थांबतील असे वाटत नाही. मद्यपी चालकांचा विषय तर गंभीर आहे. बाणस्तारी येथे झालेल्या अपघाताला आता दीड महिना होत आहे. दारुड्या चालकाने तिघांचा जीव घेतला. त्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग आली होती. मद्यपी चालकांविरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली होती. ती मोहीम लगेच थंडावली. वास्तविक अशा प्रकारची मोहीम सातत्याने राज्यभर राबवायला हवी. मुख्यमंत्री सावंत यांनी त्यासाठी वाहतूक पोलिसांना व आरटीओंनाही सूचना करावी. मुख्यमंत्र्यांनी सातत्याने निदान बांधकाम खाते, वाहतूक व पोलिस खाते यांच्या बैठका घेतल्या व अपघातविरोधी उपाययोजना कुठवर पोहोचल्या हे अधिकाऱ्यांना विचारले, तर अपघातांचे प्रमाण खूप कमी होईल.

 

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात