शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

म्हापशात काँग्रेसला सुवर्ण संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 12:40 PM

गोव्याच्या मुक्तीनंतर एकदाही म्हापसा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यास अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे गोव्याच्या मुक्तीनंतर एकदाही म्हापसा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यास अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला लाभलेल्या या संधीचा फायदा उठवण्याची गरज सध्या आहे. मतदारसंघात काँग्रेस पक्ष म्हणावा तसा सक्षम नसल्याचे दिसून आले असले तरी मागील काही महिन्यांपासून या पक्षाने आपल्या कार्याला बरीच गती दिली होती.

म्हापसा - गोव्याच्या मुक्तीनंतर एकदाही म्हापसा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यास अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला लाभलेल्या या संधीचा फायदा उठवण्याची गरज सध्या आहे. त्या ताकदीचा उमेदवार रिंगणात उतरवणे पक्षाला गरजेचे आहे. 

१९६३ ते २०१७ पर्यंत १३ विधानसभेच्या निवडणुका म्हापसा मतदारसंघातून घेण्यात आल्या. त्यात सातवेळा मगोचे, चार वेळा भाजपाचे तर दर एकावेळी काँग्रेस (अर्स) व राजीव काँग्रेसचे उमेदवार येथून निवडून आले आहेत. यात एकदा राजीव काँग्रेसचे आमदार म्हणून फ्रान्सिस डिसोझा पहिल्यांदाच निवडून आले होते. या दोन निवडणुका सोडल्यास या मतदारसंघावर मगो व भाजपाने अधिकार गाजवला आहे. एकूण १३ निवडणुकांतील पाच वेळा फ्रान्सिस डिसोझा यांनी तर तीनवेळा प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र एकदाही या मतदारसंघाने काँग्रेसला हात दिला नाही. 

सध्या बाबूशनंतर काँग्रेसला त्यांचा उमेदवार निवडून आणण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. मात्र उमेदवारी कोणाला लाभणार यावरुन सर्व काही अवलंबून राहणार आहे.  सध्या पक्षाकडून तीन उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांची नावेही चर्चेत आहेत. यात उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, पक्षाचे जेष्ठ उपाध्यक्ष डॉ. गुरुदास नाटेकर तसेच आर्मिन ब्रागांझा यांचा समावेश आहे. अलिकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री अडॅ. रमाकांत खलप यांचे पूत्र आश्वीन खलप व स्नुषा श्रद्धा खलप यांच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष लागून राहिलेले आहे. या इच्छुकातील सर्वांनी यापूर्वी म्हापसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; पण प्रत्येकवेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ब्रागांझा यानी फक्त एकदाच निवडणूक लढवली होती तर भिके व नाटेकर यांनी प्रत्येकी दोन वेळा निवडणूक लढवलेली. २०१७ च्या निवडणुकीत भिके हे बाबूश यांचे प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात होते. त्यांनी अंदाजीत ३०१३  मते प्राप्त झाली होती. 

मतदारसंघात काँग्रेस पक्ष म्हणावा तसा सक्षम नसल्याचे दिसून आले असले तरी मागील काही महिन्यांपासून या पक्षाने आपल्या कार्याला बरीच गती दिली होती. भाजपा तसेच सरकाराच्या विरोधातील नेत्यांना एकत्रित आणण्याचे काम काँग्रेसने हाती घेतले आहे. यात माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. दयानंद नार्वेकर यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांनी आपण म्हापशातून निवडणूक लढवणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मतदारसंघातील नेते सुद्धा जोमाने कामाला लागले आहेत. फक्त पक्ष कोणाला उमेदवारी देतो यावर सर्व काही अवलंबून आहे. 

म्हापशातून उमेदवारी कोणाला देण्यात यावी यावर पक्ष पातळीवर निर्णय घेतला जाईल असे विजय भिके म्हणाले. मात्र उमेदवारी फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच देण्यात येणार असून आयात उमेदवाराला स्थान दिले जाणार नाही. मागील निवडणुका पासून या मतदारसंघात पक्षाने केलेल्या कार्याचा निवडणुकीत नक्कीच लाभदायी ठरणार असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवाPoliticsराजकारण