शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

समुद्रकिनारी पर्यटनाला जाताय, सावधान! आनंदयात्रा शोकयात्रा बनू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 00:59 IST

पर्यटन हंगाम सुरू असल्यामुळे गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.

- वासुदेव पागीपणजी : सहल किंवा ज्याला आपण इंग्रजीत टूर असे म्हणतो ती एक आनंदयात्रा असते आणि ती तशीच व्हावी. काही शुल्लक चुकांमुळे जेव्हा ही आनंदयात्रा शोकयात्रा बनते, तेव्हा आयुष्यात कधी पुन्हा सहलीला जाण्याचा विचारही मनाला शिवणार नाही. गोव्यासह कोकण भागात पर्यटक म्हणून येणाऱ्या अनेक लोकांच्या वाट्याला ही शोकयात्रा आलेली आहे. गोव्यात गेल्या ३ वर्षांत १०८ पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे, तर ११६६ जणांना बुडताना वाचविण्यात आले आहे.पर्यटन हंगाम सुरू असल्यामुळे गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सिंधुदूर्ग किल्ला, तारकर्ली, वेंगुर्ला, रत्नागिरी, गणपती पुळे, मुरुड-जंजिरा, अलिबाग येथील समुद्रकिनारे पर्यटनास प्रसिद्ध आहेत़ दिवाळीच्या सुटीनंतर आता पर्यटकांचे मोठ्या प्रमाणावर लोंढे येणार आहेत, ते ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागतासाठी. गोव्यात येणारे बहुतेक ८५ टक्क्यांहून अधिक पर्यटक हे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटायला येत असतात. त्यात देशी, तसेच विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात असतात.मागील ५ वर्षांत देशी पर्यटकांचा ओघ प्रचंढ वाढला आहे. त्यात महाराष्ट्र व दिल्लीतील पर्यटक मोठ्या प्रमाणावर असतात. या पर्यटकांची सुरक्षा हा दर वर्षी चिंतेचा विषय बनून जातो. सुरक्षा ही काही अतिरेकी धोक्याची नाही, तर पर्यटक स्वत: करीत असलेल्या चुकांमुळे व बेजबाबदार वर्तनामुळे असते.‘दृष्टी’ची सुरक्षा : गोव्यातील सर्व समुद्रकिनाºयांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘दृष्टी’ या खासगी संस्थेचे जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. एक उंच टॉवर उभारून तेथून हे जीवरक्षक समुद्रात उतरलेल्या पर्यटकांवर लक्ष ठेवून असतात आणि कुणी संकटात सापडला तर धावून जातात. शीघ्रगतीने धाव घेण्यासाठी त्यांना वाहनही पुरविण्यात आले आहे. शिवाय, संपूर्ण किनारपट्टी क्षेत्र एक एका जीवरक्षकाला लक्ष ठेवण्यासाठी निश्चित करून दिलेले असते. समुद्रात पोहण्यासाठी हे जीवरक्षक तरबेज असतात व त्यांना विशेष साधनेही दिलेली असतात. आतापर्यंत मागील ११ वर्षांत ४ हजार ३८ लोकांचा जीव त्यांनी वाचविला आहे. चालू वर्षातच आतापर्यंत ११ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर ४३५ जणांना बुडताना वाचविण्यात आले आहे. नशा करून पाण्यात जाऊ नका, असे वारंवार सांगूनही लोक ऐकत नाहीत आणि नशेत ते कुठे वाहून जातात ते त्यांनाच कळत नाही, अशी माहिती कलंगुट येथील एका जीवरक्षकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.काय काळजी घ्याल?झेंड्यांचे संकेत ओळखागोव्यातील किनाºयांवर अनेक ठिकाणी लाल, पिवळे आणि पिवळे अधिक लाल, असे झेंडे लावलेले दिसतील. दोन लाल झेंड्यांमधील जागा ही पोहण्यासाठी धोकादायक आहे. त्या जागेत अंडरकरंट असू शकतो किंवा धोकादायक दगडही असू शकतात किंवा इतर धोके असू शकतात. दोन पिवळ्या झेंड्यांमधील जागा ही कमी धोक्याची आहे, तर दोन अर्धे लाल आणि अर्धे पिवळ्या झेंड्यांमधील जागा ही पोहण्यासाठी अधिक सुरक्षित आहे, असा त्याचा अर्थ असतो. दृष्टी जीवरक्षकांकडून समुद्राची पाहणी करून ते झेंडे लावलेले असतात.धोकादायक अंडरकरंटसमुद्राला जशी भरती-ओहोटी असते; तसेच धोकादायक अंडरकरंटही असतात. पाण्याच्या वरच्या पातळीवर पाणी संथ दिसते; परंतु खालून पाण्याचा जोरदार प्रवाह समुद्राकडे ओढून नेणारा असतो.सततच्या लाटांमुळे वाळूची विशिष्ट्य अशी रचना झाली, तर असे करंट तयार होतात व ते सहजासहजीओळखणेही कठीण असतात.देशी पर्यटक अधिक बुडालेपर्यटक म्हणून आले व समुद्रात बुडून ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशा पर्यटकांत देशी व विदेशीही पर्यटक आहेत. विदेशी पर्यटक हे बहुतेक समुद्रात पोहण्यात तरबेज असतात. त्यामुळे विदेशी पर्यटकांची बुडून मरण्याची संख्या अगदीच कमी आहे. समुद्र हा ज्या लोकांना नवीन आहे आणि समुद्राच्या लाटांचा व किनाºयाचा ज्यांना अनुभव नाही, अशा पर्यटकांसाठी किनारे धोकादायक ठरले आहेत. ८० टक्क्याहून अधिक हे देशी पर्यटक बुडालेले आहेत. त्यातही दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून आलेल्यांची संख्या अधिक आहे. अनेक ठिकाणी आवश्यक पर्यटन सुविधा अजूनही नाही़ त्यामुळे पर्यटकांना सूचना असलेले फलक फक्त लावलेले असतात़ आता शाळा, महाविद्यालयांच्या सहली सुरू होतील़अनेक सहली या समुद्रकिनारी नेल्या जातात़ एकाचवेळी ५० हून अधिक विद्यार्थी असताना सर्वांवर लक्ष ठेवणे शक्य होतेच असे नाही़ जलतरण तलावात पोहणारे काहीजण अतिआत्मविश्वासाने समुद्रात आतवर जातात व दुर्दैवाने ते लाटांच्या माºयात सापडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत़ पुण्यातील एका शाळेतील काही मुलांबाबत दुर्दैवी दुर्घटना घडली होती़ त्यात काही मुलांना जीव गमवावा लागला होता़ समुद्रकिनारी असे प्रसंग दर वर्षी होत असतात़पर्यटकांनी समुद्रात पोहण्याची जागा अशाच ठिकाणी निवडायला हवी की, जेथून जीवरक्षकाची नजर असेल. जीवरक्षकांच्या सूचनेचे पालन व्हावे. ते जे सांगतात ते आपल्या सुरक्षेचे आहे हे लक्षात घ्यावे, असे आम्ही पर्यटकांना आवाहन करतो़ - रवी शंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, दृष्टी

टॅग्स :goaगोवा