शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
2
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
3
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
4
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
5
VIDEO: "हा काय भारत नाही"; चाहत्याला मारण्यासाठी धावला हारिस रौफ; रस्त्यातच मोठा गोंधळ
6
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
7
इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'
8
₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."
9
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
10
९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
11
"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
12
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
13
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
14
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
15
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
16
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा समाजाची फसवणूक, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा आरोप
18
गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा
19
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
20
Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा!

गोव्याच्या खाण भागात उद्या बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 2:15 PM

राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू करण्याच्या बाबतीत राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ खाणपट्ट्यात खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक यांनी बंदची हाक दिली आहे.

ठळक मुद्देराज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू करण्याच्या बाबतीत राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ खाणपट्ट्यात खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक यांनी बंदची हाक दिली आहे. खाणबंदीमुळे लोकांवर आर्थिक संकट ओढवले असून खाणपट्ट्यातील छोटे हॉटेलवाले तसेच अन्य दुकानदारही संकटात आहेत. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खाण पट्ट्यात सर्वत्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे.

पणजी : राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू करण्याच्या बाबतीत राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (26 फेब्रुवारी) रोजी थिवीपासून सांगेपर्यंत संपूर्ण खाणपट्ट्यात खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक यांनी बंदची हाक दिली आहे.

मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी या बंदची सर्व तयारी झाली असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की वरील खाणपट्ट्यात सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात याव्यात असे आमचे आवाहन आहे. सार्वजनिक वाहतूक, शाळा, महाविद्यालये मात्र नेहमीप्रमाणे चालू असतील. उद्याचा बंद बाजारपेठा बंद ठेवून कडकडीत पाळला जावा यासाठी धारबांदोडा,सांगे, डिचोली, साखळी, पाळी, होंडा आदी भागात बैठका घेतलेल्या आहेत. खाणबंदीमुळे लोकांवर आर्थिक संकट ओढवले असून खाणपट्ट्यातील छोटे हॉटेलवाले तसेच अन्य दुकानदारही संकटात आहेत. या सर्वांनी बंदसाठी एकी दाखवावी असे आवाहन करण्यात आले आहे. गावकर म्हणाले की आम्ही बंदसाठी कुणावरही सक्ती करणार नाही. सध्या परीक्षांचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेतलेली आहे. बंदचा उपद्रव सर्वसामान्य जनतेला होऊ नये हीच आमची इच्छा आहे परंतु त्याचबरोबर खाणबंदीमुळे जी संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे तो प्रकारही तेवढाच गंभीर आहे. त्यामुळे सरकारच्या निदर्शनास त्या परिणामांची तीव्रता आणून देण्यासाठी  बाजारपेठा तरी बंद ठेवाव्यात.

दरम्यान, बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खाण पट्ट्यात सर्वत्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था केली असून सांगेपर्यंत तसेच डिचोली सत्तरी भागातही पोलीस रात्रीपासूनच तैनात करण्यात येणार आहे. खाणी सुरू करण्यासाठी संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करावी किंवा वटहुकूम काढला जावा अशी अवलंबितांच्या मागणी होती परंतु या दोन्ही गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत. तसेच तिसरा मार्गही सरकारने काढला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी अवलंबितांचे शिष्टमंडळ गेले असता केवळ मै देखता हू एवढेच म्हणाले यामुळे केंद्र सरकारचे काहीच केले नाही तसेच खासदार केंद्राकडे हा विषय सोडविण्यात अपयशी ठरले आहेत अशी अवलंबितांची भावना बनली आहे. खाणबंदीनंतर गोव्यात अनेक कंपन्यांनी कामगारांना सेवेतून काढून टाकले आहे त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली आहे  तसेच खनिजवाहू ट्रक, बार्जेस  यांना कोणतेही काम राहिलेले नाही. त्यामुळे या व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.

टॅग्स :goaगोवाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिस