शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

खवळलेल्या समुद्रात मध्य प्रदेशचा युवक बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 2:13 PM

लुबान चक्रीवादळाचा प्रभाव गोव्यातून कमी झालेला असला तरी भरतीच्या पाण्यामुळे गोव्यातील बहुतेक किनारे तिस-या दिवशीही पाण्याखालीच होते.

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: लुबान चक्रीवादळाचा प्रभाव गोव्यातून कमी झालेला असला तरी भरतीच्या पाण्यामुळे गोव्यातील बहुतेक किनारे तिस-या दिवशीही पाण्याखालीच होते. दरम्यान, कळंगूटच्या खवळलेल्या दर्यात उतरलेल्या विश्वास नाईक या 19 वर्षीय मध्य प्रदेशच्या युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात कोणीही जाऊ नये,असा इशारा दिलेला असतानाच तो इशारा धुडकावून मध्य प्रदेशहून आलेला आठ मित्रांचा गट पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. कळंगूटचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गुरुवारी (11 ऑक्टोबर) सायंकाळी 6.30 वाजता मध्य प्रदेशहून आलेला आठ मित्रांचा गट पाण्यात उतरला होता.

त्यावेळी दर्या खवळलेला होता. जोरदार लाटांनी त्यापैकी तिघांना खेचून आत नेले. दोघांनी पाण्याशी झुंज देऊन आपला जीव वाचविला. मात्र विश्वास आनंद नाईक (इंदूर-मध्य प्रदेश) हा पाण्यात खेचला गेला. पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम चालवल्यावर  शुक्रवारी(12 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता बागा बीचवरील समुद्रात त्याचा मृतदेह सापडला. शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा भरती आल्यामुळे उत्तर गोव्यातील मोरजी, मांद्रे, कळंगूट,कांदोळी, बागा तसेच दक्षिण गोव्यातील कोलवा, बाणावली, माजोर्डा, कांसावली या प्रसिद्ध किना-यांसह बाकीचे सर्व किनारे पाण्याखालीच होते.

दुपारी भरतीनंतर पाण्याची पातळी अधिकच वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. पर्यटकांनी या खवळलेल्या समुद्रात उतरू नये यासाठी किना-यावरील जीवरक्षकांकडून प्रयत्न चालू होते. मात्र कित्येकजण त्यांना न जुमानता पाण्यात उतरताना दिसत होते. 14 ऑक्टोबरपर्यंत  समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे धोका वाढला असून पाण्यात कुणी उतरु नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.

टॅग्स :goaगोवाDeathमृत्यू