शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

गोव्यासाठी दहा कृषी ड्रोन मिळणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 07:11 IST

राय येथे खरीप हंगाम कार्यक्रम, बचत गटांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राय डॉन बॉस्को येथे खरीप हंगामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी घोषणा केली की नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत राज्याला सुमारे दहा ड्रोन मिळतील, ज्यामुळे शेती आणि बचत गटांना फायदा होईल. १ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या मदत करेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी राय येथील खरीप हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात घोषणा केली की नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत गोव्याला सुमारे १० ड्रोन मिळतील ज्यामुळे कृषी उपक्रम राबवणाऱ्या बचत गटांना फायदा होईल. "फादर जॉर्ज क्वोड्रोस यांनी मला या कृषी कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे आणि मी या कार्यक्रमाचा भाग असल्याने भाग्यवान समजतो. काही पाद्रीनी कृषी क्षेत्रात खरोखरच कठोर परिश्रम केले आहेत. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात काम केलेल्या काही तरुणांनी आम्हाला दाखवून दिले आहे की आपण कृषी उपक्रमांमध्ये तंत्रज्ञानाचा किती छान समावेश करू शकतो.

गेल्या दहा वर्षांपासून, कृषी संचालनालय गोव्यातील शेतकऱ्यांना मदत करत आहे. मला खात्री आहे की आता यांत्रिक पद्धतीने ४०० हेक्टर शेतजमीन लागवड केली गेली आहे, तर आम्हाला आशा आहे की नजीकच्या भविष्यात यांत्रिक पद्धतीने सुमारे ४००० हेक्टर जमीन लागवड केली जाईल. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास तयार आहे आणि म्हणूनच तरुणांनी पडिक शेतजमिनीची लागवड करण्यासाठी पुढे यावे.

साखळी येथे कृषी क्लिनिक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. हा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम असेल आणि जुलै २०२५ पर्यंत तरुण त्यात प्रवेश घेऊ शकतात. यामुळे जमिनीच्या सुपीकतेचे विश्लेषण करण्यास आणि पिकांच्या रोगांवर अभ्यास करण्यास मदत होईल. १ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत करण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कृषी मंत्री रवी नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "राज्यातील तरुण कृषी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत आणि रोजगार शोधत आहेत हे पाहून खूप आनंद होतो. फादर जॉर्ज यांनी कृषी क्षेत्रात प्रचंड काम केले आहे. आपल्याला कृषी उत्पादनांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे."

कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोवा कृषी विभाग शेतकऱ्यांना विविध अनुदान देत असून, आतापर्यंत भात लागवडीच्या योजनांवर ८० कोटी रुपये खर्च केले आहेत. कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती