शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

गोव्यात साळावली, पंचवाडी, आमठाणे धरणे तुडुंब भरली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 9:25 PM

Goa News: धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. साळावली, आमठाणे व पंचवाडी ही तीन धरणे तुडुंब भरली आहेत. अंजुणे, चापोली व गावणे धरणांमध्येही पाणी भरलेले आहे.

पणजी : धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. साळावली, आमठाणे व पंचवाडी ही तीन धरणे तुडुंब भरली आहेत. अंजुणे, चापोली व गावणे धरणांमध्येही पाणी भरलेले आहे.

जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी यास दुजोरा दिला. कुठेही पाण्याचा विसर्ग करावा लागलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अंजुणे धरण ३८ टक्के, चापोली ६६ टक्के व गावणे धरण ७६ टक्के भरलेले आहे.

गेले दोन ४८ तास अहोरात्र पाऊस कोसळत असल्याने नद्या, नाले तुडुंब भरलेले आहेत. शेजारी महाराष्ट्रातील तिळारी धरणातील पाण्याची पातळी सध्या १0७.२२ मिटर आहे. या धरणाची क्षमता ११३.२0 मिटर आहे. बदामी म्हणाले की, गेल्या दोन दिवसात पावसाने धरण क्षेत्रात तडाखा दिल्याने धरणे तुडुंब भरली परंतु कुठल्याही धरणातून दरवाजे उघडून विसर्ग केलेला नाही.

हवामान वेधशाळेने पावसाच्या बाबतीत आरेंज अ‍ॅलर्ट दिला होता. राज्यात सर्वच भागांमध्ये गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाला. दोन तीन दिवस सलग पाऊस कोसळला तर एरव्ही वाळवंटी नदीला पूर येऊन साखळी, डिचोली बाजारपेठेत पाणी शिरते. गेले दोन दिवस पावसाने हाहा:कार माजविला त्यामुळे वाळवंटीला उधाण आल्यास डिचोलीही जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

दोन वर्षांपूर्वी तिळारी धरणाचे पाणी सोडल्याने पुरात दोघांचे बळी गेले होते. डिचोली, पेडणे, बार्देस तालुक्यातील गावामध्ये लोकांच्या घरांची हानी झाली होती तसेच केळीच्या बागायती शेती यांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली होती. महसूल खात्याने सर्वेक्षण केल्यानंतर ५५३ घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे आढळून आले होते. 

टॅग्स :goaगोवाDamधरणWaterपाणी