शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

गोवा : पावसाचा धुमाकूळ सुरुच, घरांत शिरले पुराचे पाणी, शेतीबागायतींचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 15:02 IST

राज्यात गेला आठवडाभर धुवाधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मुसळधार पडत असलेल्या पावसाने  करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे.

नारायण गावस :

पणजी: राज्यात गेला आठवडाभर धुवाधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मुसळधार पडत असलेल्या पावसाने  करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे. लाेकांच्या  घरांच्या भिंती  कोसळल्या तसेच शेतीबागायतींचे नुकसात झाले. राज्यातील बहुतांश सर्व तालुक्यांना या  मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. 

पावसाचा धुमाकुळ सुरुच असून दीड महिन्यांत पाऊस शंभर पर्यंत पाेहचत आला आहे. आतापर्यंत एकूण ४१ टक्के पाऊस झाला. गेल्या २४ तासांत राज्यात ६.४ इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आजही रेड अलर्ट जारी केला असल्याने नर्सरी ते १२ वी पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 

राज्यातील धरणे ओव्हरफ्लो

मुसळधार पडत असलेल्या पावसाने राज्यातील बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तिळारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. तसेच अंजूणे धरण  ८९.४ मीटरपर्यंत भरले असल्याने  ९० मीटरची पातळी भरल्यावर  या धरणातूनही आज  पाणी  सोडण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे साळावली, चापोली आमठाणे  ही धरणेही १०० टक्के भरली आहेत.

पडझडीमुळे मोठे नुकसान 

राज्यात मुसळधार पावसामुळे माेठी पडझड झाली आहे. या वित्त हानीप्रमाणे जीवितहानीही झाली आहे.  काही लोकांच्या घरच्या भिंती पावसाने कोसळल्या. त्यामुळे लाखो रुपयाची हानी  झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या घरावर झाडे पडून मोठे नुकसान  झाले आहे. तसेच  रस्त्यावरील गाड्यावर झाडे पडून मोठे नुकसान झाले. काही लाेकांच्या  घरावर वीज खांब पाडल्याने वीज खंडित होण्याच्या मोठ्या घटना घडल्या. 

शेतीबागायतींची मोठी हानी

राज्यात पडत असलेल्या  मुसळधार पवसाचा जास्त फटका हा शेती बागायीतना बसला आहे. अनेक लोकांच्या शेती बागायती पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतीची मोठ्या प्रमाणात  नाशाडी झाली आहे. सत्तरी, बार्देश, पेडणे, काणकोण बहतांश सर्व  तालुक्यांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी  कृषी खात्याने याकडे लक्ष घालून नुकसान भरपाई देण्याची मागी केली आहे.

टॅग्स :goaगोवा