शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गोवा : पावसाचा धुमाकूळ सुरुच, घरांत शिरले पुराचे पाणी, शेतीबागायतींचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 15:02 IST

राज्यात गेला आठवडाभर धुवाधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मुसळधार पडत असलेल्या पावसाने  करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे.

नारायण गावस :

पणजी: राज्यात गेला आठवडाभर धुवाधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मुसळधार पडत असलेल्या पावसाने  करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे. लाेकांच्या  घरांच्या भिंती  कोसळल्या तसेच शेतीबागायतींचे नुकसात झाले. राज्यातील बहुतांश सर्व तालुक्यांना या  मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. 

पावसाचा धुमाकुळ सुरुच असून दीड महिन्यांत पाऊस शंभर पर्यंत पाेहचत आला आहे. आतापर्यंत एकूण ४१ टक्के पाऊस झाला. गेल्या २४ तासांत राज्यात ६.४ इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आजही रेड अलर्ट जारी केला असल्याने नर्सरी ते १२ वी पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 

राज्यातील धरणे ओव्हरफ्लो

मुसळधार पडत असलेल्या पावसाने राज्यातील बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तिळारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. तसेच अंजूणे धरण  ८९.४ मीटरपर्यंत भरले असल्याने  ९० मीटरची पातळी भरल्यावर  या धरणातूनही आज  पाणी  सोडण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे साळावली, चापोली आमठाणे  ही धरणेही १०० टक्के भरली आहेत.

पडझडीमुळे मोठे नुकसान 

राज्यात मुसळधार पावसामुळे माेठी पडझड झाली आहे. या वित्त हानीप्रमाणे जीवितहानीही झाली आहे.  काही लोकांच्या घरच्या भिंती पावसाने कोसळल्या. त्यामुळे लाखो रुपयाची हानी  झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या घरावर झाडे पडून मोठे नुकसान  झाले आहे. तसेच  रस्त्यावरील गाड्यावर झाडे पडून मोठे नुकसान झाले. काही लाेकांच्या  घरावर वीज खांब पाडल्याने वीज खंडित होण्याच्या मोठ्या घटना घडल्या. 

शेतीबागायतींची मोठी हानी

राज्यात पडत असलेल्या  मुसळधार पवसाचा जास्त फटका हा शेती बागायीतना बसला आहे. अनेक लोकांच्या शेती बागायती पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतीची मोठ्या प्रमाणात  नाशाडी झाली आहे. सत्तरी, बार्देश, पेडणे, काणकोण बहतांश सर्व  तालुक्यांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी  कृषी खात्याने याकडे लक्ष घालून नुकसान भरपाई देण्याची मागी केली आहे.

टॅग्स :goaगोवा