शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कुठं गाऱ्हाणी, तर कुठं नोकऱ्यांची आमिषं; गोव्यात पंचायत मंडळं घडविण्यासाठी घोडेबाजाराला ऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 14:16 IST

भाजप सक्रीय, काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी टाकली नांगी

किशोर कुबल

पणजी : गोव्यात सरपंच, उपसरपंच निवड येत्या सोमवारी २२ रोजी होत असून पंचायत मंडळे घडविण्यासाठी भाजपच अधिक सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. आरजी वगळता प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस तसेच इतर पक्षांच्या कोणत्याही हालचाली दिसत नसून त्यांनी नांगी टाकल्यासारखीच स्थिती आहे.

भाजपने अधिकाधिक पंचायतींमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी १८६ पैकी किमान १४0 पंचायतींवर भाजपची पंचायत मंडळे असतील, असा दावा केला आहे. अनेक पंचायतींमध्ये भाजपने सरपंच, उपसरपंचही निश्चित केले आहेत.

भाजपचे काही माजी आमदार तसेच नेते सक्रीय आहेत. मांद्रे मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत दयानंद सोपटे यांचा पराभव झाला. मात्र पंचायत मंडळे घडविण्यासाठी ते सक्रीय आहेत. सांत आंद्रेतील पंचायतींमध्ये माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा सक्रीय आहेत. आगशी (सेंट लॉरेन्स) पंचायतीत सिल्वेरांचा बंधू बेनी व पुतण्या अ‍ॅलन निवडून आलेले आहे. अ‍ॅलन यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती. या पंचायतीत सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे उपसरपंचपद वरील दोघांपैकी एकाला मिळू शकते. या अकरा सदस्यीय पंचायतीत आरजीचे केवळ चार उमेदवार निवडून आले आहेत.

स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, बांधकाममंत्री निलेश काब्राल, मडकईत वीजमंत्री सुदिन ढवळीकर पंचायत मंडळे घडविण्यासाठी सक्रीय आहेत. साळगांवमध्ये माजी आमदार तथा भाजप नेते जयेश साळगांवकर हेही पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही ठिकाणी पंच सदस्यांना नोकऱ्यांची आमिषे दाखवली जात आहेत. परंतु काही पंचायतींमध्ये पंच सदस्य न फुटण्यावर ठाम आहेत. आमिषे धुडकावली जात आहेत. सांत आंद्रे मतदारसंघात आजोशी मंडूर पंचायत आरजीकडे आलेली आहे. तेथे सरपंचपदी प्रशांत नाईक व उपसरपंचपदी तेजस्वी नाईक यांची नावे निश्चित झालेली आहेत. भाटी व शिरदोण पंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी आरजी प्रयत्नरत असल्याचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.

रुमडामळमधील अपक्ष एकसंध दरम्यान, दक्षिण गोव्यात ९ सदस्यीय रुमडामळ पंचायतीत सत्ता स्थापण्यासाठी भाजपने आटोकाट प्रयत्न चालवले आहेत. मात्र तेथे पाच अपक्ष पंच सदस्यांचा गट एकसंध असून उर्फान पठाण, समिउल्ला फानिबांद, मुस्तफा दोडामणी, मुबीना फानिबांद व झुबेदा आगासी हे पाचही पंच सदस्यांनी आपण एकत्र आहोत आणि भाजपच्या दबावाला बळी पडणार नाही, असे सांगण्यासाठी पत्रकार परिषदही घेतली. मुबीना यांना सरपंचपद देण्याचेही या गटाने ठरविले असून मुस्तफा दोडामणी उपसरपंच असतील. पहिल्या अडीच वर्षांसाठी या गटामध्ये वरीलप्रमाणे समझोता झालेला आहे.

देवस्थानांमध्ये गाऱ्हाणी!काही जणांनी पंचांनी फुटू नयेत म्हणून देवस्थानांमध्ये गाऱ्हाणी घातली आहेत. तर काही जणांनी फुटणार नाही म्हणून आणा-भाकाही घेतलेल्या आहेत. कोणत्याही आमिषांना बळी पडणार नाही, असे पंच सदस्यांनी कबूल केले आहे. आम्ही निवडून आलो त्याच पॅनलमध्ये राहणार, अन्यत्र कुठेही जाणार नाही, अशा शपथा पंचांनी घेतलेल्या आहेत.

राजकारण्यांचे नातलग बनणार सरपंच!पीर्ण पंचायतीत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे बंधू संदीप यांचे सरपंचपद निश्चित झाल्याची माहिती मिळते. मोरजी पंचायतीत राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा भाचा सरपंचपदासाठी शर्यतीत आहे. तेंडुलकर यांनी आपल्या भाच्यासाठी वजन वापरले आहे. सांत आंद्रेतील आगशी (सेंट लॉरेन्स) पंचायतीत माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचे बंधू बेनी यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. या पंचायतीत सरपंचपद महिलांकरिता राखीव आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस