शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Goa Election 2022 : "गृहलक्ष्मी, युवा शक्ती आणि माझे घर, मालकी हक्क योजना तृणमूल प्रभावीपणे राबविणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 6:47 PM

Goa Election : माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांची ग्वाही.

पणजी : गोव्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन होताच ‘गृहलक्ष्मी, युवा शक्ती आणि माझे घर, मालकी हक्क’या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील, अशी ग्वाही माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी दिली. "राज्यात ‘टीएमसी’चे सरकार स्थापन होताच सर्व तिन्ही योजनांची अंमलबजावणी होईल," असं ते यावेळी म्हणाले. तृणमूल प्रवेशानंतर गोव्यात प्रथमच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सिन्हा केवळ या योजनांच्या व्यवहार्यतेबद्दलच बोलले नाहीत तर निधीच्या स्रोताबाबतही स्पष्ट केले आणि करदात्यांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नसल्याचे तसेच या योजना राबविण्यासाठी राज्याला आणखी कर्ज घ्यावे लागणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. सिन्हा म्हणाले, ‘या योजनांची संपूर्ण जबाबदारी मी घेतो आणि त्यांची अंमलबजावणी होईल, याची खात्री करून घेण्यासाठी तृणमूल सरकार सत्तेत आल्यानंतर मला तीन ते सहा महिने गोव्यात बसावे लागले तरी चालेल.’

अर्थमंत्री म्हणून आपला अनुभव मांडताना सिन्हा यांनी या तीन योजनांसाठी निधी कसा उभारला जाईल, हे विषद करून सांगितले. ते म्हणाले, ‘या तीन योजना मिळून सुमारे ३,३३० कोटी रुपये खर्च होतील. वित्त आयोग आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या निकषांच्या संदर्भात गोव्याकडे आधीच २,१०० कोटी रुपयांची अतिरिक्त वित्तीय तरतूद आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या बजेटमधून ही रक्कम या कल्याणकारी योजनांवर खर्च करता येईल.’

या योजनांसाठी पैसे काढू‘आम्ही सध्याच्या अर्थसंकल्पातून या योजनांसाठी पैसे काढू. त्यासाठी करदात्यांवर कोणतेही अतिरिक्त कर लावले जाणार नाहीत किंवा आम्ही या योजनांच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही अतिरिक्त कर्ज घेणार नाही. स्वतःचे घर कोणाला नको असते? तरुणांना २० लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे. जेणेकरून ते स्टार्ट-अप किंवा त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात गुंतवणूक करू शकतील. महिलांना गृहलक्ष्मीच्या माध्यमातून पैसे हातात येतील,’ असंही त्यांनी नमूद केलं.

शाश्वत शेती, खाण यावर लक्ष केंद्रीत करूशाश्वत शेती आणि शाश्वत खाण व्यवसायावरही पक्ष लक्ष केंद्रीत करेल. जे दोन्ही गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे ते म्हणाले. ‘डबल इंजिन’ या शब्दावरून भाजपवर टीका करताना ते म्हणाले, ‘आज मोदी राज्य सरकारसंदर्भात दुहेरी इंजिनबद्दल बोलत आहेत, उद्या ते पंचायतींच्या संदर्भात तिहेरी इंजिनबद्दल बोलतील. हे कसे चालेल?’

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Yashwant Sinhaयशवंत सिन्हाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस