शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

गोव्याला पूर्णवेळ सीएम द्या, बहुमत सिद्ध करा; काँग्रेसची दिल्लीत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 20:25 IST

काँग्रेस आक्रमक झाल्याने भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पणजी : गोव्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री दिला जावा तसेच भाजपाप्रणीत आघाडीने गोवा विधानसभेत बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी काँग्रेसचे केंद्रीय नेते पवन खेरा आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. भाजपाने बहुमत नसताना सरकार स्थापन करून प्रथम लोकशाहीचा खून केला व आता गोव्याच्या प्रशासनाचा गळा आवळला जात आहे, अशी टीका खेरा यांनी केली.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेले नऊ महिने विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी कामाचा आणखी बोजा टाकू नये. त्यांना आजारातून पूर्ण बरे होऊन पुन्हा येऊ द्यावे, असे पवन खेरा म्हणाले. गोवा राज्य सध्या मोठ्या संकटातून जात आहे. घटनात्मक पेचप्रसंग आहे. गोव्यातील मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील रुग्णालयात घ्यावी लागते. गोव्यात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. सरकारला पूर्ण वेळ मुख्यमंत्री नसल्याने सरकारच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली जेव्हा आजारी होते व रुग्णालयात उपचार घेत होते, तेव्हा त्यांच्या खात्याची जबाबदारी पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. संसदीय परंपरा अशीच आहे. पण रुग्णालयात असलेले मुख्यमंत्री पर्रिकर यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले गेले आहे, असे खेरा व चोडणकर म्हणाले. राजकीय संकटात सापडलेल्या गोव्याच्या जनतेला न्याय हवा आहे. जनतेची होरपळ सुरू आहे. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गोमंतकीय जनतेच्या हिताशी काहीच देणेघेणे राहिलेले नाही. भाजपमधील स्थितीवर मायकल लोबो या आमदाराने नुकतेच प्रभावी भाष्य केले आहे. अमित शहा यांनी पर्रिकर यांच्या आरोग्याचा व गोव्यातील जनतेच्याही स्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. मुळात भाजपाला किंवा पर्रिकरांना बहुमत देऊन गोव्याच्या जनतेने खुर्चीवर बसवलेले नाही, असे खेरा म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही भाजपकडे तूर्त बहुमत नाही असे नुकतेच म्हटलेले आहे, याची आठवण खेरा यांनी करुन दिली. 

भाजपासोबत सत्तेत असलेल्या मगो पक्षानेदेखील मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा आता द्यायला हवा असे नुकतेच जाहीरपणे सांगितले आहे. जर पांडुरंग मडकईकर व फ्रान्सिस डिसोझा यांना आरोग्याच्या कारणास्तव हटवले जाते, तर मग पर्रिकर यांना का नाही? पर्रिकर यांच्या आरोग्यावर अमित शहा एवढा बोजा का टाकत आहेत? असे प्रश्न पवनखेरा यांनी उपस्थित केले. पर्रिकर यांना विश्रांतीची गरज आहे. गोव्याच्या राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलवावे. कुणाकडे बहुमत आहे ते तिथे कळून येईल. राजकीय संकटात सापडलेल्या गोव्यातील जनतेला न्याय हवा आहे, असे खेरा व चोडणकर यांनी म्हटले. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकरAmit Shahअमित शाहBJPभाजपा