शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

गोव्यात मोटर वाहन कायदा अंमलात आणणे बंधनकारक - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 7:35 PM

गोव्यात रस्त्यांची थोडी समस्या आहे हे खरे आहे पण रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे.

पणजी : नवा दुरुस्त रुपातील मोटर वाहन कायदा हा केंद्र सरकारचा कायदा असून तो अंमलात आणण्याचे काम हे कोणत्याही राज्याला करावेच लागते. गोव्यातही मोटर वाहन कायदा अंमलात आणावाच लागेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. बस मालक, टेक्सी मालक व अन्य संघटनांशी बोलून कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

केंद्रीय मोटर वाहन कायद्यास आक्षेप घेणारी विविध विधाने सध्या काही मंत्री व विरोधी आमदारांकडूनही येत आहेत. गोव्यात रस्ते ठिक नसल्याने व रस्ता किंवा वाहतूकविषयक अन्य साधनसुविधा ठिक नसल्याने तूर्त कायद्याची अंमलबजावणी करू नये, असे बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनीही म्हटले आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही तशीच मागणी केली आहे. केंद्रीय मोटर वाहन कायद्यातील दंडाची रक्कम ही खूप मोठी आहे. त्यामुळे गोव्याच्या मंत्रिमंडळ बैठकीसमोरही  यापूर्वी कायद्याचा  प्रस्ताव आला तरी,  तो मंजुर  न करता निर्णय पुढे ढकलला गेला.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीवेळी केलेले विधान महत्त्वाचे ठरत आहे. मुख्यमंत्री म्हणाले की,  गोव्यात रस्त्यांची थोडी समस्या आहे हे खरे आहे पण रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. राज्यात खूपच पाऊस पडल्याने रस्ते खराब झाले.  अतिवृष्टीमुळे खड्डे पडले. सध्या खड्डे बुजविले जात आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गांची कामे देखील सुरू आहेत. येत्या तीन-चार महिन्यांत  ती कामे पूर्ण होतील. मुख्यमंत्री म्हणाले की, मोटर वाहन कायदा अंमलात आणावा लागेल, त्याबाबत गोवा सरकारच्या हाती  मोठेसे  काही नाही, कारण तो केंद्राचा कायदा आहे. फक्त वाहतूक क्षेत्रातील विविध घटकांशी  अगोदर या कायद्यातील तरतुदींविषयी आपण  बोलूया असे मी वाहतूक मंत्र्यांना सांगितले आहे. टेक्सी वादाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यात ओला- उबेर आलेले नाहीत. गोव्यातील टेक्सी व्यवसायिकांचे आम्ही हितरक्षण करू पण मीटर लावावे लागतील. गोव्यात मीटरआधारित किंवा अेपआधारित टेक्सी  सेवाही रहायला हवी.

श्रीमंतांनी बीपीएलचा लाभ बंद करावा 

गृह आधार व अन्य काही योजनांचे जे कुणी खरोखर पात्र लाभार्थी नाहीत, अशा लाभार्थींना आम्ही योजनांमधून वगळत आहोत.  लाभार्थींची छाननी सुरू आहे. काही लाभार्थी महाराष्ट्र व कर्नाटकात राहतात व गोव्यातील योजनांचा लाभ घेतात. तसेच काही आर्थिकदृष्ट्या सबल घटक देखील बीपीएल योजनेखाली तांदूळ वगैरे मिळविण्याचा लाभ घेतात. कुणी आजीच्या किंवा आईच्या नावे लाभ घेतो. हे प्रकार लोकांनी बंद करावेत. त्यांनी स्वत:हून अशा पद्धतीने बीपीएल योजनेचा लाभ घेणे बंद करावे, जेणेकरून खऱ्या गरजूंनाच योजनांचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

४० टक्के आश्वासने पूर्ण 

२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही लोकांना जी आश्वासने दिली होती, त्यापैकी चाळीस टक्के आश्वासने आम्ही पाळली. ४० टक्के कामे पूर्ण केली. स्व. मनोहर पर्रीकर दोन वर्षे मुख्यमंत्री होते व त्यातील त्यांचे एक वर्ष त्यांच्या आजारपणामुळे वाया गेले. मला दोन वर्षे मिळाली तरी, एक वर्ष कोविड संकटासोबत लढताना गेले. यापुढील वर्षभरात आम्ही अधिकाधिक कामे करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मानवी विकासावर आपण भर दिला आहे. राज्यात एकाच पक्षाचे सरकार (युतीचे नव्हे) अधिकारावर आहे हे राज्यासाठी हिताचे आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा