शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 08:18 IST

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

संकलन: तुळशीदास गांजेकर, साखळी

मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तजन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होतो. यादिनी दत्ततत्त्व पृथ्वीवर अधिक असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

दत्तजन्माचा इतिहास अत्रीऋषींची पत्नी अनसूया पतिव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले, 'तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल' हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, 'किती मोठी पतिव्रता आहे, ते आपण पाहू.' अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले. अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. अनसूयेने सांगितले, 'ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.' तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, 'ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच भोजन द्या, नाहीतर दुसरीकडे जाऊ. 

आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता असे आम्ही ऐकले आहे; म्हणून आलो आहोत.' अनसूयेने त्यांचे स्वागत करून जेवायला बसण्याची विनंती केली. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, 'तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.' त्यावर 'अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, माझ्या पतीचे तपफळ मला तारील', असा विचार केला. स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन केले. 'अतिथी माझी मुले आहेत' असा विचार करून विवस्त्र होऊन वाढायला आली.. पाहाते तर अतिथींच्या जागी रडणारी तीन बाळे! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. 

इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, 'स्वामिन् देवेन दत्तं।" अर्थात- 'हे स्वामी, देवाने दिलेली ही मुले.' यावरून अत्रींनी त्यांचे नामकरण 'दत्त' असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु, महेश त्यांच्यासमोर उभे राहिले. प्रसन्न होऊन म्हणाले, 'वर मागा.' अत्री आणि अनसूयेने 'बालके आमच्याच घरी राहावीत' असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. 

तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला, 'श्री नृसिंह सरस्वती' दुसरा, 'माणिकप्रभू' तिसरा, तर 'श्री स्वामी समर्थ' चौथा अवतार होत. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्षाची पूजा करतात. दत्तात्रेयांना परमगुरू मानले आहे. 'श्री गुरुदेव दत्त' असा त्यांचा जयघोष करतात. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे. 

टॅग्स :goaगोवाshree datta guruदत्तगुरुshree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्यायdatta jayantiदत्त जयंतीspiritualअध्यात्मिक