शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 08:18 IST

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

संकलन: तुळशीदास गांजेकर, साखळी

मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तजन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होतो. यादिनी दत्ततत्त्व पृथ्वीवर अधिक असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

दत्तजन्माचा इतिहास अत्रीऋषींची पत्नी अनसूया पतिव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले, 'तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल' हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, 'किती मोठी पतिव्रता आहे, ते आपण पाहू.' अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले. अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. अनसूयेने सांगितले, 'ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.' तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, 'ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच भोजन द्या, नाहीतर दुसरीकडे जाऊ. 

आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता असे आम्ही ऐकले आहे; म्हणून आलो आहोत.' अनसूयेने त्यांचे स्वागत करून जेवायला बसण्याची विनंती केली. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, 'तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.' त्यावर 'अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, माझ्या पतीचे तपफळ मला तारील', असा विचार केला. स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन केले. 'अतिथी माझी मुले आहेत' असा विचार करून विवस्त्र होऊन वाढायला आली.. पाहाते तर अतिथींच्या जागी रडणारी तीन बाळे! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. 

इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, 'स्वामिन् देवेन दत्तं।" अर्थात- 'हे स्वामी, देवाने दिलेली ही मुले.' यावरून अत्रींनी त्यांचे नामकरण 'दत्त' असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु, महेश त्यांच्यासमोर उभे राहिले. प्रसन्न होऊन म्हणाले, 'वर मागा.' अत्री आणि अनसूयेने 'बालके आमच्याच घरी राहावीत' असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. 

तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला, 'श्री नृसिंह सरस्वती' दुसरा, 'माणिकप्रभू' तिसरा, तर 'श्री स्वामी समर्थ' चौथा अवतार होत. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्षाची पूजा करतात. दत्तात्रेयांना परमगुरू मानले आहे. 'श्री गुरुदेव दत्त' असा त्यांचा जयघोष करतात. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे. 

टॅग्स :goaगोवाshree datta guruदत्तगुरुshree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्यायdatta jayantiदत्त जयंतीspiritualअध्यात्मिक