शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 08:18 IST

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

संकलन: तुळशीदास गांजेकर, साखळी

मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तजन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होतो. यादिनी दत्ततत्त्व पृथ्वीवर अधिक असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

दत्तजन्माचा इतिहास अत्रीऋषींची पत्नी अनसूया पतिव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले, 'तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल' हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, 'किती मोठी पतिव्रता आहे, ते आपण पाहू.' अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले. अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. अनसूयेने सांगितले, 'ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.' तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, 'ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच भोजन द्या, नाहीतर दुसरीकडे जाऊ. 

आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता असे आम्ही ऐकले आहे; म्हणून आलो आहोत.' अनसूयेने त्यांचे स्वागत करून जेवायला बसण्याची विनंती केली. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, 'तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.' त्यावर 'अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, माझ्या पतीचे तपफळ मला तारील', असा विचार केला. स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन केले. 'अतिथी माझी मुले आहेत' असा विचार करून विवस्त्र होऊन वाढायला आली.. पाहाते तर अतिथींच्या जागी रडणारी तीन बाळे! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. 

इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, 'स्वामिन् देवेन दत्तं।" अर्थात- 'हे स्वामी, देवाने दिलेली ही मुले.' यावरून अत्रींनी त्यांचे नामकरण 'दत्त' असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु, महेश त्यांच्यासमोर उभे राहिले. प्रसन्न होऊन म्हणाले, 'वर मागा.' अत्री आणि अनसूयेने 'बालके आमच्याच घरी राहावीत' असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. 

तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला, 'श्री नृसिंह सरस्वती' दुसरा, 'माणिकप्रभू' तिसरा, तर 'श्री स्वामी समर्थ' चौथा अवतार होत. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्षाची पूजा करतात. दत्तात्रेयांना परमगुरू मानले आहे. 'श्री गुरुदेव दत्त' असा त्यांचा जयघोष करतात. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे. 

टॅग्स :goaगोवाshree datta guruदत्तगुरुshree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्यायdatta jayantiदत्त जयंतीspiritualअध्यात्मिक