शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

राजकारणाचे गुन्हेगारीकरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2024 11:55 IST

मांद्रे मतदारसंघातील एक माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला झाला.

गोव्यात ग्रामपंचायत स्तरावरून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणास पंधरा- वीस वर्षांपूर्वी आरंभ झाला होता. मात्र, आता स्थिती गंभीर वळण घेऊ लागली आहे. मांद्रे मतदारसंघातील एक माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला झाला. पूर्ण गोव्यात त्यामुळे खळबळ उडाली. या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधकांनी केला. कोनाडकर यांच्यावर दिवसाढवळ्या ज्यांनी हल्ला केला, त्यांनी म्हणे मायकल यांचे नाव वापरले. म्हणजे तुला मायकल हवा आहे काय?, असा प्रश्न केला. हल्ला करताना असा प्रश्न करून पोलिस तपास वेगळ्याच दिशेने भरकटवण्याचा कदाचित गुन्हेगारांचा हेतू असावा. 

पोलिस चौकशी सुरू आहे. अजून काही निष्पन्न झालेले नाही. काल गुरुवारी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाय हल्ल्यासाठी क्रमांक पट्टी नसलेली जी कार वापरण्यात आली होती, तीदेखील ताब्यात घेतली. पोलिस त्यांचे काम करतील, पण ग्रामपंचायत स्तरावरील एकूणच राजकारण व आमदारकीच्या स्तरावरील राजकारण याबाबत कधी तरी चर्चा होण्याची गरज होतीच. ती कोनाडकर यांच्यावरील हल्ल्यापासून सुरू झाली आहे. आमदार आरोलकर यांनी या घटनेशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमदारांनी काल घरी जाऊन कोनाडकर यांची विचारपूसही केली. कोनाडकर यांच्यावर लोखंडी सळ्यांनी हल्ला केल्याचे सांगितले गेले होते, मात्र त्यांची प्रकृती तुलनेने आता बरी आहे. अर्थात घटना खूप गंभीर आहे, पोलिसांनी हल्लेखोरांकडून सत्य माहिती मिळविल्यावर हल्ल्यामागील खरे कारण कळून येईल.

मांद्रेच्या किनारपट्टी भागाला व तेथील डोंगराळ पट्टयाला खूप महत्त्व आलेले आहे. दिल्ली, हरयाणाचे बडे बिल्डर आणि दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील काही काळ्या पैसावाल्यांचे लक्ष मांद्रेतील जमिनींवर आहेच. तेथील सरपंच होण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या राजकारण्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा लागलेली असते. ग्रामपंचायत म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी, असे काहींना वाटते. काही तरुण पंच म्हणून निवडून येताच ब्रोकर्सचे काम, जमिनींचे डिलिंग करू लागतात. काहीजण दिल्ली मुंबईच्या बिल्डरना जमिनी दाखवत फिरतात. डोंगर विकण्यासाठी मदत करणे हे काही पंच, उपसरपंच, सरपंच वगैरेंचे कामच झाले आहे. हीच गोष्ट बार्देश तालुक्याच्या किनारपट्टीतही घडते. अर्थात महेश कोनाडकर यांचा अशा व्यवहारांशी संबंध होता किंवा आहे असे कुणी म्हणण्याचे कारण नाही. मात्र, अशा व्यवहारांतूनच बार्देश, मुरगाव किंवा सासष्टी, फोंडा वगैरे काही तालुक्यांमध्ये पूर्वी काही पंच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची उदाहरणे आहेत. 

काही तालुक्यांत खनिजाची कंत्राटे मिळविण्यासाठी सरपंच, पंच यांच्यात स्पर्धा असते. काही आमदारांमध्येही पूर्वी तशी स्पर्धा असायची, हे नीलेश काब्राल, सुभाष फळदेसाई, गणेश गावकर, दीपक प्रभू पाऊसकर, विनय तेंडुलकर वगैरे सांगू शकतील. काही वर्षांपूर्वी कळंगुटच्या एका सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव आला होता, त्यावेळी जोझफ सिक्वेरा यांच्यावर पंचायतीतच दिवसाढवळ्या सुरी हल्ला झाला होता. त्यावेळी काँग्रेसचा एक नेता तिथे आमदार होता. अर्थात त्या हल्ल्याशी काँग्रेसचा संबंध नव्हता. आता कोनाडकर यांच्यावरील हल्ला राजकीय वैमनस्यातूनच झालाय असा दावा काहीजण करतात. मांद्रेतील काही माजी आमदारांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन हल्ल्याचा निषेध केला. निषेध करताना त्यांनी आमदार आरोलकर यांच्याकडेही बोट दाखवले. कारण, भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो मांद्रेतही राजकीय काम करू पाहत आहेत. 

कोनाडकर मायकलचे समर्थक असल्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाला, अशा प्रकारची थिअरी मांडण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. अजून विधानसभा निवडणुका अडीच वर्षे दूर आहेत. अशावेळी मायकलचा कुणी समर्थक बनला म्हणून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करावा लागतोय असे सहसा घडत नाही. आमदार लोबो यांचे समर्थक तसे खूपजण असतील, मग सर्वांवर हल्ले झाले काय? येथे सांगण्याचा हेतू एवढाच की- कोनाडकरांवरील हल्ल्यामागील सत्यस्थिती लवकर जनतेसमोर यायला हवी. पोलिसांनी वस्तुस्थिती शोधून काढली तर बरे होईल. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसPoliticsराजकारण