शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
4
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
5
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
6
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
7
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
8
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
9
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
10
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
11
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
12
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
13
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
14
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
15
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
16
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
17
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
18
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
19
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
20
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी

कोरोना : खबरदारी घ्या, गैरसमज धोकादायक : डॉ. उत्कर्ष बेतोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 20:27 IST

कोरोना वाºयामुळे फैलावतो हे खरे आहे. परंतु चीनमधील वारा भारतात वाहून आला किंवा दिल्लीतून वारा गोव्यात वाहू लागला म्हणून त्याबरोबर कोरोना व्हायरस येणार नाही.

- वासुदेव पागीजगाभोवती कोरोनाचा विळखा आवळताना दिसत असल्यामुळे या संसर्गजन्य रोगाशी सामना करण्यासाठी जागरूकता व खबरदारी अशा दोन गोष्टींची गरज आहे. कोरोनापेक्षा त्याविषयी असलेले गैरसमज व अपसमज अधिक आहेत, असे गोवा आरोग्य खात्याचे साथ रोग विभागाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी ‘दै. लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.प्रश्न : कोरोनाचा विळखा जगाला पडताना दिसतो आहे. किती धोकादायक रोग हा?डॉ. बेतोडकर : हा रोग हवेतूनही पसरणे शक्य असल्यामुळे फैलाव होण्याच्या दृष्टीने धोकादायकच म्हणावा लागेल. हा रोग काही प्रमाणात जीवघेणाही ठरू शकतो. परंतु डेंग्यू व स्वाइन फ्लूपेक्षा या रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. स्वाइन फ्लूने मृत्यू होण्याचे प्रमाण हे २०१५ च्या नोंदीनुसार भारतात ६.३ टक्के तर डेंग्यूने मृत्यू होण्याचे प्रमाण हे ४.१ टक्के एवढे होते. ज्याचा धसका जगाने घेतला आहे त्या करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे २.४ टक्के एवढे आहे.प्रश्न: चिनी वस्तू आॅनलाइन मागविणे किती सुरक्षित?डॉ. बेतोडकर : तशी शक्यता कमीच आहे. खरेदी केलेल्या पार्सलमधून कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आमच्या निदर्शनास आलेले नाही. तसे झालेले असेल असे गृहीत धरले तरी तशी अधिकृत माहिती नाही.प्रश्न : कोरोना वाऱ्यामुळे फैलावतो हे कितपत सत्य?डॉ. बेतोडकर : कोरोना वाºयामुळे फैलावतो हे खरे आहे. परंतु चीनमधील वारा भारतात वाहून आला किंवा दिल्लीतून वारा गोव्यात वाहू लागला म्हणून त्याबरोबर कोरोना व्हायरस येणार नाही. कोरोनाचा संसर्ग हा हवेतून जास्तीत जास्त दोन मीटरपर्यंत होऊ शकतो. त्यापलीकडे हा विषाणू जाऊ शकत नाही.प्रश्न : कोरोना झालेला रुग्ण उपचारांनी किती दिवसांत बरा होतो?डॉ. बेतोडकर : ते रुग्णाच्या शरीरातील प्रतिकार क्षमतेवर अवलंबून आहे. केरळातील रुग्ण १० दिवसांत पूर्ण बरा झाला. या रोगाची लक्षणे दिसून येताच लवकर निदान करून लवकर उपचार सुरू केल्यास अधिक चांगले. रक्ताचे नमुने मुंबईत पाठवून अहवाल येईपर्यंत दोन दिवस लागतात.प्रश्न : तापमानाशी या व्हायरसचा काय संबंध?डॉ. बेतोडकर : खूप काही लिखाण यासंबंधी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ते सर्वच खरे मानून चालू नये. तापमान वाढीबरोबर स्वाइन फ्लू, कोरोना यासारख्या व्हायरसचा संसर्ग कमी होतो. उन्हाळा त्या दृष्टीने दिलासादायक निश्चित असेल. परंतु संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे सर्वात चांगले.प्रश्न : कोणती खबरदारी घ्यावी?डॉ. बेतोडकर : जी खबरदारी आम्ही स्वाइन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी घेतो तीच खबरदारी कोरोना टाळण्यासाठीही घ्यावी. जागतिक परिस्थितीत सुधार होईपर्यंत विदेशात प्रवास करू नका. राज्याबाहेरही प्रवास शक्यतो टाळा. मेळावे, जत्रा अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. वारंवार हात कोपरापासून स्वच्छ धुणे ही सर्वाधिक प्रभावी खबरदारी. आरोग्य खात्यासह सरकारी अन्य यंत्रणांनी जी खबरदारी घ्यायला हवी आहे ती घेतली जात आहे. विदेशातून आलेल्यांची तपासणी होत आहे. खासगी इस्पितळे व हॉटेल्सच्या संपर्कात आरोग्य खाते आहे. अजूनही गोव्यात कुणीच कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाहीप्रश्न : मास्क घालून फिरणे कितपत योग्य?डॉ. बेतोडकर : मास्क हे प्रत्यक्ष कोरोना संसर्गित रुग्णावर उपचार करणाऱ्यांसाठी आहेत, इतर लोकांना वापरण्याची गरज नाही. तसेच मास्क वापरताना घेणाºया खबरदारीची माहिती नसेल तर त्याचे विपरीत परिणामही होण्याची शक्यता असते.