शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

कोरोना : खबरदारी घ्या, गैरसमज धोकादायक : डॉ. उत्कर्ष बेतोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 20:27 IST

कोरोना वाºयामुळे फैलावतो हे खरे आहे. परंतु चीनमधील वारा भारतात वाहून आला किंवा दिल्लीतून वारा गोव्यात वाहू लागला म्हणून त्याबरोबर कोरोना व्हायरस येणार नाही.

- वासुदेव पागीजगाभोवती कोरोनाचा विळखा आवळताना दिसत असल्यामुळे या संसर्गजन्य रोगाशी सामना करण्यासाठी जागरूकता व खबरदारी अशा दोन गोष्टींची गरज आहे. कोरोनापेक्षा त्याविषयी असलेले गैरसमज व अपसमज अधिक आहेत, असे गोवा आरोग्य खात्याचे साथ रोग विभागाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी ‘दै. लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.प्रश्न : कोरोनाचा विळखा जगाला पडताना दिसतो आहे. किती धोकादायक रोग हा?डॉ. बेतोडकर : हा रोग हवेतूनही पसरणे शक्य असल्यामुळे फैलाव होण्याच्या दृष्टीने धोकादायकच म्हणावा लागेल. हा रोग काही प्रमाणात जीवघेणाही ठरू शकतो. परंतु डेंग्यू व स्वाइन फ्लूपेक्षा या रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. स्वाइन फ्लूने मृत्यू होण्याचे प्रमाण हे २०१५ च्या नोंदीनुसार भारतात ६.३ टक्के तर डेंग्यूने मृत्यू होण्याचे प्रमाण हे ४.१ टक्के एवढे होते. ज्याचा धसका जगाने घेतला आहे त्या करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे २.४ टक्के एवढे आहे.प्रश्न: चिनी वस्तू आॅनलाइन मागविणे किती सुरक्षित?डॉ. बेतोडकर : तशी शक्यता कमीच आहे. खरेदी केलेल्या पार्सलमधून कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आमच्या निदर्शनास आलेले नाही. तसे झालेले असेल असे गृहीत धरले तरी तशी अधिकृत माहिती नाही.प्रश्न : कोरोना वाऱ्यामुळे फैलावतो हे कितपत सत्य?डॉ. बेतोडकर : कोरोना वाºयामुळे फैलावतो हे खरे आहे. परंतु चीनमधील वारा भारतात वाहून आला किंवा दिल्लीतून वारा गोव्यात वाहू लागला म्हणून त्याबरोबर कोरोना व्हायरस येणार नाही. कोरोनाचा संसर्ग हा हवेतून जास्तीत जास्त दोन मीटरपर्यंत होऊ शकतो. त्यापलीकडे हा विषाणू जाऊ शकत नाही.प्रश्न : कोरोना झालेला रुग्ण उपचारांनी किती दिवसांत बरा होतो?डॉ. बेतोडकर : ते रुग्णाच्या शरीरातील प्रतिकार क्षमतेवर अवलंबून आहे. केरळातील रुग्ण १० दिवसांत पूर्ण बरा झाला. या रोगाची लक्षणे दिसून येताच लवकर निदान करून लवकर उपचार सुरू केल्यास अधिक चांगले. रक्ताचे नमुने मुंबईत पाठवून अहवाल येईपर्यंत दोन दिवस लागतात.प्रश्न : तापमानाशी या व्हायरसचा काय संबंध?डॉ. बेतोडकर : खूप काही लिखाण यासंबंधी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ते सर्वच खरे मानून चालू नये. तापमान वाढीबरोबर स्वाइन फ्लू, कोरोना यासारख्या व्हायरसचा संसर्ग कमी होतो. उन्हाळा त्या दृष्टीने दिलासादायक निश्चित असेल. परंतु संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे सर्वात चांगले.प्रश्न : कोणती खबरदारी घ्यावी?डॉ. बेतोडकर : जी खबरदारी आम्ही स्वाइन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी घेतो तीच खबरदारी कोरोना टाळण्यासाठीही घ्यावी. जागतिक परिस्थितीत सुधार होईपर्यंत विदेशात प्रवास करू नका. राज्याबाहेरही प्रवास शक्यतो टाळा. मेळावे, जत्रा अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. वारंवार हात कोपरापासून स्वच्छ धुणे ही सर्वाधिक प्रभावी खबरदारी. आरोग्य खात्यासह सरकारी अन्य यंत्रणांनी जी खबरदारी घ्यायला हवी आहे ती घेतली जात आहे. विदेशातून आलेल्यांची तपासणी होत आहे. खासगी इस्पितळे व हॉटेल्सच्या संपर्कात आरोग्य खाते आहे. अजूनही गोव्यात कुणीच कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाहीप्रश्न : मास्क घालून फिरणे कितपत योग्य?डॉ. बेतोडकर : मास्क हे प्रत्यक्ष कोरोना संसर्गित रुग्णावर उपचार करणाऱ्यांसाठी आहेत, इतर लोकांना वापरण्याची गरज नाही. तसेच मास्क वापरताना घेणाºया खबरदारीची माहिती नसेल तर त्याचे विपरीत परिणामही होण्याची शक्यता असते.