शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

म्हादईप्रश्नी गोवा सरकारची सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 21:20 IST

जोपर्यंत न्यायालयात काही निवाडा होणार नाही, तोपर्यंत कर्नाटकला म्हादईशीसंबंधित प्रकल्पांचे काम करण्यास केंद्रीय मंत्रलये कोणतीच परवानगी देणार नाही असे केंद्राने स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांचे म्हणणे आहे.

पणजी - म्हादई नदीचे पाणी वळविण्याच्या कर्नाटकच्या कृतीविरुद्ध गोवा सरकार आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयास अवमान याचिका सादर करणार आहे. ही माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. तसेच जोपर्यंत न्यायालयात काही निवाडा होणार नाही, तोपर्यंत कर्नाटकला म्हादईशीसंबंधित प्रकल्पांचे काम करण्यास केंद्रीय मंत्रलये कोणतीच परवानगी देणार नाही असे केंद्राने स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांचे म्हणणे आहे.म्हादईचे पाणी कुठे व कसे वळविले गेले याविषयी छायाचित्रे, व्हीडीओ व अन्य पुरावे आम्ही गोळा केले आहेत. याचिकेसोबत सर्वोच्च न्यायालयात ते सादर केले जातील. म्हादई पाणीप्रश्नी आता अनेकजण राजकारण करतात. विरोधकांसाठी हा विषय राजकीय भांडवल आहे. आपल्यासाठी मात्र म्हादई हा काळजाचा विषय आहे. कारण मी म्हादई नदीसाठी प्रारंभीपासून चळवळीत आहे. मी स्वत: सभापती असतानाही काही आमदारांना घेऊन म्हादईचे पाणी नेमके कुठे वळविले गेले आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. म्हादई नदीवर मी माङया आईपेक्षाही अधिक प्रेम करतो. केंद्र सरकारचा माङयावर याबाबत कोणताच दबाव नाही. पाण्याबाबत तरी केंद्र सरकार गोव्यावर निश्चितच अन्याय करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.2007 ते 2012 या कालावधीत काहीजण बेकायदा खाण व्यवसायासारख्या भानगडींमध्ये व्यस्त होते. त्यामुळे सत्तेत असूनही त्यावेळी त्यांचे लक्ष म्हादई नदीकडे गेले नाही. कर्नाटकने त्याच कालावधीत म्हादई ते मलप्रभा नदी अशा अंतरामध्ये कालवे खोदले. काँग्रेसच्या सरकारने त्यावेळी ते काम बंद करण्यास कर्नाटकला भाग पाडायला हवे होते. म्हादई नदीच्या पाण्यात गांजे येथे खारटपणा आहे, तो खारटपणा तपासून घेण्याचे काम कोणत्याच सरकारने कधी केले नाही. माङया सरकारनेच अलिकडे ते काम करून घेतले. 2012 साली र्पीकर सरकार अधिकारावर आल्यानंतरच लवादासमोर अत्यंत कडक असा म्हादईप्रश्नी कर्नाटकविरुद्ध आक्षेप घेतला गेला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.विर्डी धरण का अडवले नाही ? विर्डी येथे म्हादई नदीच्या प्रवाहावर धरण बांधण्याची जेव्हा योजना महाराष्ट्राने आणली तेव्हा गोव्यात काँग्रेस पक्षाचे सरकार अधिकारावर होते. त्यावेळी जानेवारी 2006 मध्ये धरण बांधण्यास काँग्रेस सरकारने लेखी परवानगी दिली. म्हादईच्याच खो-यात पाणी वळवून धरण बांधण्यास त्यावेळी मान्यता का दिली गेली अशी विचारणा मुख्यमंत्री सावंत यांनी केली. ती भूमिका चुकीचीच होती, कारण तेच पाणी खाली वाहून गोव्याकडे येते, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच 2क्18 साली जेव्हा म्हादई पाणी तंटा लवादाचा निवाडा आला तेव्हा सर्वच राजकीय पक्ष व अन्य सर्वानीच गोवा म्हादई प्रकरणी जिंकला असे चित्र उभे केले होते. त्याबाबत मोठा गाजावाजा केला होता. त्यावेळी कोणत्या पक्षाचा जलसंसाधन मंत्री गोव्यात होता ते सर्वाना ठाऊक आहे. लवादाचा तो निवाडा गोव्यासाठी घातक आहे. मनोहर र्पीकर मुख्यमंत्रीपदी असताना आजारी होते व त्यामुळे त्यांनी तो निवाडा वाचला नसावा, आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण एजी बदलला व आपल्या सरकारने त्याविरुद्ध अधिकृत भूमिका घेऊन लवादाकडे धाव घेतली, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय