शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

२०० पार होणेही आव्हानात्मक, भाजपने ज्योतिषी बदलावा: शशी थरुर

By पंकज शेट्ये | Updated: May 2, 2024 20:07 IST

गोव्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी प्रचारासाठी आल्याची माहिती त्यांनी दिली.

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप सरकारला मोठा धक्का बसणार आहे. भाजप कडून सांगण्यात येणारे ४०० पार मुळीच शक्य नसून त्यांना ३०० पार सुद्धा होणे अशक्यच आहे, तर २०० पार होणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल. देशात पहिल्या दोन टप्यात झालेल्या निवडणुक मतदानाचा आढावा घेतल्यास कॉंग्रेससाठी चांगली गोष्ट असल्याचे दिसून येत असून पहिल्या दोन टप्यातील आढावा भाजपचा पराभव होणार असल्याचे संकेत देत असल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता शशी थरुर यांनी सांगितले.

गुरूवारी (दि.२) कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता शशी थरूर यांचे गोव्यात निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आगमन झाले. विमानातून दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर तेथे त्यांचे एल्वीस गोंम्स आणि गोव्यातील इतर कॉंग्रेस नेत्यांनी स्वागत केले. एका जाहीर सभेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुढची पन्नास वर्षे गोव्यात आणि भारतात कॉंग्रेसचे सरकार येणार नसल्याचे भाषणातून सांगितले होते. त्याबाबत पत्रकारांनी शशी थरुर यांना विचारले असता भाजपने त्यांचा ज्योतीषी बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. देशात झालेल्या पहिल्या दोन टप्यातील मतदानाचा आढावा घेतल्यास कॉंग्रेस पक्षासाठी चांगले संकेत देत असून निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप सरकारला मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी भारतात कॉंग्रेसचा प्रचार एकदम चांगल्या पद्धतीने होत असून मोठ्या प्रमाणात जनतेचा कॉंग्रेसला पाठिंबा मिळत आहे. भाजप कडून करण्यात येणारे ४०० पार ची घोषणा सत्य होणे शक्य नाही. त्यांना ३०० पार सुद्धा होणे अशक्य असून २०० पार होणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल असे ते म्हणाले. पहिल्या दोन टप्याचा आढावा घेतल्यास भाजपचा पराभव होत असल्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी प्रचारासाठी आल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूर