शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

२०० पार होणेही आव्हानात्मक, भाजपने ज्योतिषी बदलावा: शशी थरुर

By पंकज शेट्ये | Updated: May 2, 2024 20:07 IST

गोव्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी प्रचारासाठी आल्याची माहिती त्यांनी दिली.

पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप सरकारला मोठा धक्का बसणार आहे. भाजप कडून सांगण्यात येणारे ४०० पार मुळीच शक्य नसून त्यांना ३०० पार सुद्धा होणे अशक्यच आहे, तर २०० पार होणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल. देशात पहिल्या दोन टप्यात झालेल्या निवडणुक मतदानाचा आढावा घेतल्यास कॉंग्रेससाठी चांगली गोष्ट असल्याचे दिसून येत असून पहिल्या दोन टप्यातील आढावा भाजपचा पराभव होणार असल्याचे संकेत देत असल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता शशी थरुर यांनी सांगितले.

गुरूवारी (दि.२) कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता शशी थरूर यांचे गोव्यात निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आगमन झाले. विमानातून दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर तेथे त्यांचे एल्वीस गोंम्स आणि गोव्यातील इतर कॉंग्रेस नेत्यांनी स्वागत केले. एका जाहीर सभेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुढची पन्नास वर्षे गोव्यात आणि भारतात कॉंग्रेसचे सरकार येणार नसल्याचे भाषणातून सांगितले होते. त्याबाबत पत्रकारांनी शशी थरुर यांना विचारले असता भाजपने त्यांचा ज्योतीषी बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. देशात झालेल्या पहिल्या दोन टप्यातील मतदानाचा आढावा घेतल्यास कॉंग्रेस पक्षासाठी चांगले संकेत देत असून निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप सरकारला मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी भारतात कॉंग्रेसचा प्रचार एकदम चांगल्या पद्धतीने होत असून मोठ्या प्रमाणात जनतेचा कॉंग्रेसला पाठिंबा मिळत आहे. भाजप कडून करण्यात येणारे ४०० पार ची घोषणा सत्य होणे शक्य नाही. त्यांना ३०० पार सुद्धा होणे अशक्य असून २०० पार होणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल असे ते म्हणाले. पहिल्या दोन टप्याचा आढावा घेतल्यास भाजपचा पराभव होत असल्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी प्रचारासाठी आल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूर