शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

विद्यापीठाला 'क्लीन चीट'; मुख्यमंत्री सावंत यांनी घेतला भरतीचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 09:32 IST

केरळची कॉलनी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा विद्यापीठात मोठ्या संख्येने केरळीयन मनुष्यबळाची भरती गेल्या दोन-तीन वर्षांत केली गेली, अशा प्रकारचा आरोप काही विरोधी पक्षांनी अलीकडे केला, तरी प्रत्यक्षात स्थिती तशी नाही, असे गोवा सरकारने केलेल्या एका पाहणीवेळी आढळून आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः गोवा विद्यापीठातील स्थितीचा आढावा घेतला व विद्यापीठ केरळीयनांची कॉलनी झालेली नाही, असे त्यावेळी आढळून आले.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे मूळचे केरळचे आहेत. ते विद्यापीठाचे कुलपती आहेत. ते गोव्यात नियुक्तीवर आल्यापासून गोवा विद्यापीठात मोठ्या प्रमाणात केरळीयन मनुष्यबळाची भरती झाली, असा आरोप होत होता. यामुळे मुख्यमंत्री सावंत यांनी उच्च शिक्षण खात्याकडून सविस्तर माहिती मागवली. शिक्षण सचिवांकडूनही माहिती घेतली. विद्यापीठात राज्यपाल पिल्लई यांच्या कारकिर्दीत केरळीयनांची भरती झालेली नाही, असे या माहितीतून समोर आले. मुख्यमंत्र्यांनी सगळी आकडेवारी व भरतीविषयी माहिती मागितली होती.

दरम्यान, काँग्रेसच्या काळातील सर्व कर्जे माझ्या सरकारने फेडली असून, राज्याचे आर्थिक व्यवस्थापन उत्तमरीत्या चालले आहे. पत्रकारांशी अनौपचारिक संवादावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील काळात राज्याला कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. कारण खाण व्यवसाय सुरू होईल आणि मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडूनही महसूल मिळण्यास सुरुवात झालेली आहे. डिसेंबरमध्ये पहिल्याच महिन्यात ८ कोटी रुपये सरकारला मिळाले आहेत. राज्याचे जीएसटी तसेच व्हॅट संकलनही वाढलेले आहे.

पुढील काळात राज्याला कर्जाची गरज भासणार नाही. कारण खाण व्यवसाय सुरू होत आहे. तसेच मोपा विमानतळाकडूनही महसूल मिळण्यास सुरुवात झालेली आहे. डिसेंबरमध्ये पहिल्याच महिन्यात ८ कोटी रुपये सरकारला मिळाले आहेत.

अगोदर परीक्षा पास व्हा 

सरकारी कार्यालयांमध्ये यापुढे कर्मचारी निवड आयोगामार्फतच पारदर्शक पद्धतीनेच नोकरभरती करण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये नोकरभरती जाहीर झाली की, अनेकजण माझ्याकडे वशिल्यासाठी येतात. परंतु, मी त्यांना सांगतो की, कर्मचारी निवड आयोगामार्फतच होणार आहे. आधी परीक्षा उत्तीर्ण व्हा, नंतरच बोला.

१२% व्याजदाराची कर्जे आम्ही फेडली 

२००७ ते २०१२ या काळातील कर्जे आम्ही फेडली आहेत. काँग्रेस सरकारने भरमसाठ व्याजदराने कर्जे घेतली होती. माझ्या सरकारने १२ टक्के व्याजदराची कर्जे फेडून केवळ ७ टक्के व्याजदराची सुधारित कर्जे घेतली. आम्ही वेळेत सर्व कर्जाची परतफेड करू. महसूल वसुलीसाठी अधिकाधिक स्रोत शोधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे सर्व करत असताना लोकांना दरमहा १६ हजार लिटर पाणी सरकार मोफत देत आहे. दयानंद सामाजिक सुरक्षा, गृह आधार आदी योजनांचा लाभ अव्याहतपणे दिला जात आहे. मी वैयक्तिकरीत्या सामाजिक योजनांवर लक्ष ठेवतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन करवाढ नाही

राज्य सरकार आगामी अर्थसंकल्पात कोणतीही नवीन करवाढ करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, २००७ ते २०१२ या काळात राज्यात जोरात खाण व्यवसाय चालला. परंतु, या कालावधीत राज्यात आवश्यक तेवढा पायाभूत सुविधा विकास होऊ शकला नाही. या काळात काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. मात्र, विकासाकडे दुर्लक्ष झाले. दक्षिण गोव्यात मडगाव येथे माथानी साल्ढाना इमारत प्रकल्पाची तेवढी सुरुवात झाली. परंतु, रखडलेले हे काम नंतर भाजप सरकारनेच पुढे नेले. गेल्या आठ ते दहा वर्षांच्या काळात राज्यात बहुतांश विकासकामे झालेली आहेत.

गोव्यातील तरुण, तरुणी आयएएस, आयपीएस, आयआरएस आदी स्पर्धात्मक परीक्षा देण्यात मागे राहतात, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली. उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांमधील युवक स्पर्धा परीक्षांमध्ये चमकतात. ते परीक्षेला बसतात. परंतु, गोव्यात मात्र याबाबतीत तरुणांमध्ये उदासिनता दिसून येते. एम. एस्सी. सारखी पदवी घेतलेले युवकही लिपिकाच्या नोकरीसाठी येतात, तेव्हा वाईट वाटते. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत