शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमांतर्गत १४ लाखांचे दावे निकालात; १४६२ हेक्टरवरील पिकांचा विमा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 12:32 IST

२२ लाख २८ हजारांचा भरला हप्ता.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत सात वर्षांत १३ लाख ९१ हजार ९४८ रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले. ६५८ शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.

१४६२ हेक्टर जमिनीतील पिकांचा १५ कोटी २० लाख ८ हजार ५३३ रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. २२ लाख २८ हजार ५९३ रुपयांचा हप्ता भरण्यात आला. यात शेतकऱ्यांचा वाटा १९ लाख २ हजार ७८७ रुपये, राज्य व केंद्र सरकारचा वाटा प्रत्येकी १ लाख ६२ हजार ९०३ रुपये होता. १३ लाख ९१ हजार ९४८ रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले. ६५८ शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.

दरम्यान, पीकविमा तसेच सरकारच्या अन्य योजनांमुळे तरुण शेतीकडे वळत असल्याचे आशादायी चित्र दिसत आहे. सासष्टीत जवळ जवळ दोन हजार हेक्टर जमीन नव्याने लागवडीखाली आल्याची नोंद विभागीय कृषी खात्याने घेतली आहे. बेतालभाटी येथील कोन्स्तान्सियो डिसिल्वा तसेच तेथील शेतकरी क्लबने व सुरावली येथील तानिया रिबेलो तसेच कृषी क्षेत्रामध्ये भरीव अशी प्रगती केली आहे.

कृषी खात्याने पंपसेट, ठिबक सिंचन (ड्रीप) व इतर सामुग्री शेतकऱ्यांना सवलतीत पुरविली. खात्याच्या योजनांचा फायदा घेऊन टिना रिबेलो यांनी सासष्टी व सांगेतही सूर्य फुलांची लागवड केली व निर्यातही केली आहे. गोव्यातही सूर्यफुलाचे पीक घेता येऊ शकते. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

योजनेला प्रतिसाद

कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोंसो म्हणाले, शेतकरी आधार निधी योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची इच्छाशक्ती वाढली पाहिजे तसेच त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न घेता यावे यासाठी कृषी खात्याचे प्रयत्न चालू आहे.

शेतकरी आधार निधी

पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण दिले जात आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना नुकसानभरपाई दिली जाते. दरम्यान, राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी शेतकरी आधार निधी योजनाही • राबवली आहे. योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. सर्वसमावेशक पीकविमा योजना राज्यात राबवली जात आहे.

१२५ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

चालू मोसमात खरिपासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा १२५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. पिकांचा ६ लाख ४७ हजार ४४२ रुपयांचा विमा उतर विण्यात आला. एकूण १९,६४८ रुपयांचा हप्ता भरण्यात आला. यात शेतकऱ्यांचा वाटा १३,९९९ रुपये आणि राज्य व केंद्र सरकारचा वाटा प्रत्येकी ३,२२८ रुपये होता.

पीकविम्याचा पर्याय

शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांमुळे सातत्याने नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, ढगाळ हवामान, कीड लागणे आदी संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. राज्यात तोक्त्ते वादळाच्या वेळी तसेच इतर अनेकदा पिकांची भरपूर हानी झाली. शेतकयांसाठी हा मोठा फटका होता. कित्येकदा तर शेती पिकांसाठी केलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकन्यांना या नैसर्गिक संकटापासून दिलासा देण्यासाठी सरकारने पीकविमा योजना सुरु केली आहे.

 

टॅग्स :goaगोवाCrop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्र