शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

युवा नेत्यांना संधी मिळाल्यास बदल शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:42 IST

एखाद्याची स्तुती करण्याचा उद्देश यामागे नाही, पण नवा चेहरा, नवा नेता म्हणून उत्पल पर्रीकर पुढे आल्यास राज्यातील राजकारणाची दिशा बदलू शकते.

गंगाराम म्हांबरे, ज्येष्ठ पत्रकार

बदल ही काळाची गरज आहे. काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतात. तसे करण्यात आपण मागे राहिलो तर अक्षरशः मागेच पडतो. राजकारणातही देशात असे बदल होताना दिसतात. नवे चेहरे, नवे विचार, नवा दृष्टिकोन यावर भर देणारा राजकीय पक्ष घोडदौड करतो, तर जुन्यांना कवटाळून राहाणारी संघटना नेहमी मागेच पडते. जनतेलाही सतत तेच नेते, तेच चेहरे, तेच विचार ऐकून कंटाळा आलेला असतो. त्यामुळे उत्साही आणि परिपक्व, चौफेर विचार करू शकणारा युवानेता पुढे आला, तर जनता त्याला समर्थन देते. जिल्हा पंचायत निवडणुकांतील उमेदवारांची नावे पाहाता, भाजपने योग्य निर्णय घेतला आहे. हा पक्ष याबाबत नेहमीच पद्धशीरपणे पुढे जात असतो. असे करताना राज्यातील आगामी राजकारणाचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे. 

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे केवळ गोव्यासाठीच नव्हे, तर भाजपला त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. समविचारी सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी भाजपला ज्या उंचीवर नेऊन बसवले, त्याबाबत कोणाचे दुमत असणार नाही. हाच मुद्दा पुढे नेत असे म्हणावेसे वाटते की, सुशिक्षित, संयमी आणि विचारी अशी प्रतिमा असलेला उत्पल पर्रीकर ही खरे तर स्व. मनोहर पर्रीकर यांची राज्याला मिळालेली देण आहे. असंख्य गोमंतकीयांशी उत्पल यांचा संबंध अद्याप आलेला नाही. राज्यातील सर्वच भागांत त्यांचा संपर्क नाही, हे जरी खरे असले तरी एक उदयोन्मुख आणि नव्या पिढीचा नेता म्हणून तो सुपरिचित होईल, यात शंका नाही. 

स्व. मनोहर पर्रीकर यांच्यात काही गुणदोष होते, त्यांचे सर्वांशीच पटत असे, असे म्हणता येणार नाही, कारण आपलेच खरे यावर ते ठाम राहायचे, असा प्रत्यय अनेकांना अनेक वेळा आला असेल. त्यांच्या विचारांना पक्की बैठक होती. त्यांची विचारपद्धत आधुनिक बदलांवर भर देणारी होती. मुख्यमंत्री म्हणून असलेले अमर्याद अधिकार जनतेच्या कल्याणासाठी वापरायचा त्यांना ध्यास होता. ती धडाडी आणि जिद्द हेच त्यांचे वैशिष्ट्य होते. विरोधकांना नामोहरम करण्यापेक्षा त्यांना आपले म्हणणे पटवून ते गळी उतरविण्यात ते वाकबगार होते. त्यामुळे त्यांना क्रॉस करणे इतरांना शक्य होत नसे. एकाधिकारशाही त्यांच्या अंगात मुरली होती, अशी टीका होत असे; कारण त्यांच्या पातळीवर जाणे सहसा कोणाला जमत नसे. यापैकी किती गुण उत्पलमध्ये उतरले आहेत, हे सांगणे तसे अवघडच. तशी अपेक्षा गोमंतकीयांना नसेल किंवा असेल. एक मात्र खरे की उत्पल यांच्यातील तळमळ आणि विचारांची दिशा त्यांच्यात नेत्याचे गुण असल्याचे दाखवून देते. एखाद्याची स्तुती करण्याचा उद्देश यामागे नाही, पण नवा चेहरा, नवा नेता म्हणून उत्पल पर्रीकर पुढे आल्यास राज्यातील राजकारणाची दिशा बदलू शकेल. त्यांचे स्थानिक वृत्तवाहिनीवरील विचार काही वेळा ऐकायला मिळाले, त्यावेळी हे मत पक्के झाले. दुसरा पर्रीकर नको, हा दुराग्रह आहे. त्यामागे कोणतीही ठोस कारणे नाहीत.

पणजी महापालिकेचा कारभार असो किंवा राज्याचे राजकारण असो, उत्पल यांचे मतप्रदर्शन थेट आणि स्पष्ट आहे. पणजीचे किती नगरसेवक संपूर्ण पणजी महापालिका क्षेत्राला ठाऊक आहेत, किती मतदार सर्व नगरसेवकांना ओळखतात, यापासून ते नगरसेवक आपली मते व्यक्त करण्याच्या मानसिक स्थितीत आहेत का, हा गूढ प्रश्न पणजीकरांना सतावतो आहे. नेत्याच्या प्रचंड दडपणाखाली म्हणा किंवा दहशतीखाली म्हणा, नगरसेवक बोलत नाहीत. अल्पमतातील असोत किंवा बहुमतातील असोत, नगरसेवकांनी जनतेशी बोलायला हवे.

पाच वर्षांनी पुन्हा मतदारांकडे जाता येईल एवढी कर्तबगारी त्यांनी दाखवायला हवी. एखाद्या गटात बंदिस्त असल्यासारखे, एकाच नेत्याशी निष्ठा वाहिल्याप्रमाणे लोकप्रतिनिधी वागायला लागले तर जनतेने कोणाकडे पाहायचे? लोकप्रतिनिधी निवडले गेले ते जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोचविण्यासाठी. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पारदर्शकता पाळायला हवी, बोलायला हवे. कोणत्या पद्धतीने पणजी पुढे नेली जात आहे, ते तरी सांगायला हवे. 

स्मार्ट सिटीच्या कामात सर्वांनाच हात धुवून घेता आले नसतील, मोजक्यांनीच संधी साधली अशी चर्चा पणजीवासीयांत चालते. त्यात तथ्य असेल, नसेल पण आपण कोणत्या प्रकारे सावधगिरी बाळगत आहोत, कसा अंकुश ठेवत आहोत, हे सांगण्यासाठी तरी बोला. तेवढेही स्वातंत्र्य नसेल तर ती लोकशाहीची शोकांतिका ठरेल. सरकारचे दडपण आहे का, आमदारांचा धाक वाटतो का, असे प्रश्न विचारले जात आहेत. अखेरच्या क्षणी मतदारांकडे विकासकामांच्या बळावर मते मागण्याऐवजी पैशांची थैली सोडून याचना करण्याची वेळ आपल्यावर का येते? यावर भाजपच्या भाषेत सांगायचे तर चिंतन करा.

सध्या पणजीच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणाला नवे स्वरुप देण्याची गरज निर्माण झाली आहे. नवे नेतृत्व, नवी धोरणे, नवे विचार मांडणारे नेते समोर यायला हवेत. किती दिवस त्याच-त्याच चेहऱ्यांची तीच जुनी कामगिरी पाहाणार आहोत आपण.. सिद्धेश श्रीपाद नाईक, उत्पल पर्रीकर असे नेते विधानसभेत हवेत असे भाजपला का वाटत नाही? हृदयनाथ शिरोडकर, महेश म्हांबरे, डॉ. केतन भाटीकर, अमरनाथ पणजीकर असे युवानेते कधी निवडून येतील? गोव्यातील अन्य भागांतही नवी नावे चर्चेत आहेत, त्यांना राजकीय पक्षांनी पुढे आणायला हवे. युरी आलेमाव यांच्यासारखा विरोधी पक्षनेता चमकतोच आहे ना? विरेश बोरकर धडपडतो आहे ना? मग नवोदितांना संधी देण्याचा विचार राजकीय पक्षांनी आतापासूनच करायला हवा. ते पहिल्या कालावधीत अभ्यासात कमी पडतील, पद्धतीत मागे राहतील पण दुसरा कालावधी मिळाला तर नक्कीच गोव्याच्या कल्याणासाठी मुद्देसूद बोलतील. 

पैशांनी मते विकत घेण्याची वेळ अशा नेत्यांवर येणार नाही. पैशांचा खेळ ज्यावेळी बंद होईल, तेव्हाच सच्चे लोकप्रतिनिधी विधानसभेत दिसतील. चोवीस तास स्वकल्याणाचा विचार ते करणार नाहीत, कारण त्यांना पुन्हा जनतेसमोर जायचे असेल. नव्यांना संधी द्या, तुम्ही केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावा, असे जनतेने मतयंत्रातून सांगण्यापूर्वी ज्येष्ठ नेत्यांनी पावले उचलावीत. सध्या विधानसभेत असलेल्या नेत्यांवर अधिक जबाबदारी द्यायला हवी. पूर्णवेळ राजकारणी, पण राजकारण हा व्यवसाय मानणारे नव्हेत असे लोकप्रतिनिधी हवे आहेत. ती काळाची गरज तर आहेच, राजकीय पक्षांचीही निकड आहे, हे कधी लक्षात घेतले जाईल?

टॅग्स :goaगोवाUtpal Parrikarउत्पल पर्रिकरManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपाPoliticsराजकारण