शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

हे तर महासंकट, कर्नाटकने डाव साधला, म्हादईचे पाणी गोव्यात येणे बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 21:19 IST

म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटकने आपला डाव अखेर साधला असून गोवा सरकारला पूर्णपणे गाफील ठेवून म्हादई नदीच्या प्रवाहावर कर्नाटकने बांध बांधला आहे.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटकने आपला डाव अखेर साधला असून गोवा सरकारला पूर्णपणे गाफील ठेवून म्हादई नदीच्या प्रवाहावर कर्नाटकने बांध बांधला आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही ही अत्यंत धक्कादायक व गंभीर गोष्ट असल्याचे सांगून बांधाचे काम पूर्ण झाले तर, म्हादई नदीचे पाणी गोव्यात येऊच शकणार नाही, अशी भीती व्यक्त केली आहे.यापूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर आणि पाणी तंटा लवादासमोरही कर्नाटकने जी हमी दिली होती, त्या हमीचे पालन केलेले नाही. कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम कर्नाटकने नव्याने सुरू केले आहे. म्हादई नदीच्या प्रवाहावर कर्नाटकने बांध बांधला आहे. या बांधाचे काम जोरात सुरू आहे. गोवा सरकारच्या यंत्रणोला याविषयी कोणतीच माहिती नव्हती. अजूनही यंत्रणा थोडी आरामातच आहे. अन्यथा शुक्रवारी तातडीने मुख्य सचिव तसेच जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंते वगैरे कर्नाटकच्या सीमेवर जिथे काम सुरू आहे, तिथे जाऊन आले असते, अशी चर्चा गोव्यात सुरू आहे. खुद्द अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नाडकर्णी हेही खूप नाराज झाले आहेत.यंत्रणा जेवढ्या गतीने सक्रिय व्हायला हवी तेवढ्या गतीने ती होत नाही, याची कल्पना देणारा एसएमएस नाडकर्णी यांनी सरकारला पाठवला असल्याची माहिती मिळाली. नाडकर्णी यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलतानाही कर्नाटकने केलेला प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे व गोवा सरकारने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली म्हणून कर्नाटकचे कृत्य दिसून आले. अन्यथा ते देखील कळले नसते याची कल्पना सरकारमधील काही घटकांना आली आहे.जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर यांनी मडगावमधील अभियंत्यांचे एक पथक घटनास्थळी शुक्रवारी पाठवले. त्यांनी पाहणी केली व फोटोही आणले आहेत. राजेंद्र केरकर यांनीही लोकमतशी बोलताना सगळा प्रकार खूप गंभीर असल्याचे व जलसंसाधन खात्याची यंत्रणा अधिक सक्रिय होण्याची गरज व्यक्त केली. येत्या 15 रोजी म्हादई पाणी तंटा लवादासमोर गोव्याच्या वतीने लेखी स्वरुपात बाजू मांडली जाणार आहे. तथापि कर्नाटकने बांध उभारण्याचे चालविलेले काम पाहता 15 तारखेपर्यंत खूप वेळ झालेला असेल. आत्माराम नाडकर्णी यांनाही याची कल्पना आली आहे. यापूर्वीही एकदा असाच प्रकार कर्नाटकने केला होता तेव्हा आम्ही तातडीने बेळगाव व खानापुरच्या जिल्हाधिका-यांशी बोललो होतो व तातडीने काम बंद करून घेतले होते, असे नाडकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणी