शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

हे तर महासंकट, कर्नाटकने डाव साधला, म्हादईचे पाणी गोव्यात येणे बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 21:19 IST

म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटकने आपला डाव अखेर साधला असून गोवा सरकारला पूर्णपणे गाफील ठेवून म्हादई नदीच्या प्रवाहावर कर्नाटकने बांध बांधला आहे.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटकने आपला डाव अखेर साधला असून गोवा सरकारला पूर्णपणे गाफील ठेवून म्हादई नदीच्या प्रवाहावर कर्नाटकने बांध बांधला आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही ही अत्यंत धक्कादायक व गंभीर गोष्ट असल्याचे सांगून बांधाचे काम पूर्ण झाले तर, म्हादई नदीचे पाणी गोव्यात येऊच शकणार नाही, अशी भीती व्यक्त केली आहे.यापूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर आणि पाणी तंटा लवादासमोरही कर्नाटकने जी हमी दिली होती, त्या हमीचे पालन केलेले नाही. कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम कर्नाटकने नव्याने सुरू केले आहे. म्हादई नदीच्या प्रवाहावर कर्नाटकने बांध बांधला आहे. या बांधाचे काम जोरात सुरू आहे. गोवा सरकारच्या यंत्रणोला याविषयी कोणतीच माहिती नव्हती. अजूनही यंत्रणा थोडी आरामातच आहे. अन्यथा शुक्रवारी तातडीने मुख्य सचिव तसेच जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंते वगैरे कर्नाटकच्या सीमेवर जिथे काम सुरू आहे, तिथे जाऊन आले असते, अशी चर्चा गोव्यात सुरू आहे. खुद्द अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नाडकर्णी हेही खूप नाराज झाले आहेत.यंत्रणा जेवढ्या गतीने सक्रिय व्हायला हवी तेवढ्या गतीने ती होत नाही, याची कल्पना देणारा एसएमएस नाडकर्णी यांनी सरकारला पाठवला असल्याची माहिती मिळाली. नाडकर्णी यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलतानाही कर्नाटकने केलेला प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे व गोवा सरकारने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली म्हणून कर्नाटकचे कृत्य दिसून आले. अन्यथा ते देखील कळले नसते याची कल्पना सरकारमधील काही घटकांना आली आहे.जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर यांनी मडगावमधील अभियंत्यांचे एक पथक घटनास्थळी शुक्रवारी पाठवले. त्यांनी पाहणी केली व फोटोही आणले आहेत. राजेंद्र केरकर यांनीही लोकमतशी बोलताना सगळा प्रकार खूप गंभीर असल्याचे व जलसंसाधन खात्याची यंत्रणा अधिक सक्रिय होण्याची गरज व्यक्त केली. येत्या 15 रोजी म्हादई पाणी तंटा लवादासमोर गोव्याच्या वतीने लेखी स्वरुपात बाजू मांडली जाणार आहे. तथापि कर्नाटकने बांध उभारण्याचे चालविलेले काम पाहता 15 तारखेपर्यंत खूप वेळ झालेला असेल. आत्माराम नाडकर्णी यांनाही याची कल्पना आली आहे. यापूर्वीही एकदा असाच प्रकार कर्नाटकने केला होता तेव्हा आम्ही तातडीने बेळगाव व खानापुरच्या जिल्हाधिका-यांशी बोललो होतो व तातडीने काम बंद करून घेतले होते, असे नाडकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणी