शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ, आगे बढो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2025 09:24 IST

भाऊ प्रामाणिकपणे जुने गोवेच्या लोकांची साथ देत असतील तर स्वागतच करूया.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी अखेर गोव्याच्या एका तरी सामाजिक प्रश्नावर भाष्य केले हे चांगले झाले. बायंगिणी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला लोक विरोध करतात, त्यामुळे सरकारने तो अन्यत्र हलवावा, असे जाहीरपणे श्रीपादभाऊंनी काल सुचविले. श्रीपाद भाऊंच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल. कारण गोव्याचे लोक म्हणतात की, भाऊ गोमंतकीयांच्या समस्यांवर बोलत नाहीत. म्हादई पाणीप्रश्न, मयेचा कॉलेज प्रश्न, सत्तरीतील 'आयआयटी' विरोधातील आंदोलन, पिळगाव, मूळगावच्या लोकांची खाणप्रश्नी चाललेली आंदोलने, मांद्रेत जीत आरोलकर व इतरांनी 'टीसीपी'विरुद्ध केलेले आंदोलन असे अनेक प्रश्न गोव्यात वेळोवेळी उपस्थित झाले. मात्र, भाऊ त्याविषयी बोलणे टाळायचे. अर्थात दरवेळी बोलणे किंवा वादात भर टाकणे हा श्रीपाद नाईक यांचा स्वभाव नाही. ते तसे प्रेमळ, शांत, संयमी व सुस्वभावी म्हणून ओळखले जातात. मात्र, उत्तर गोव्यातील जनता आपल्याला वारंवार निवडून आणते, त्यामुळे आपण लोकांच्या प्रश्नावर कधी तरी भाष्य करायलाच हवे, असे भाऊंना वाटायला हवे. 

गोंयकारांची तेवढी अपेक्षा भाऊंकडून निश्चितच आहे. केंद्रात मंत्री असल्याने त्यांना संसदेत उभे राहून गोव्याचे प्रश्न मांडता येत नाहीत. कारण शेवटी मंत्री बोलू शकत नाहीत, खासदार बोलू शकतात. किंबहुना खासदारांनी प्रश्न मांडायचेच असतात. हे काम काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस बऱ्यापैकी करतात. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हे देखील गोव्याचे विषय मांडतात. श्रीपाद नाईक यांनी गोव्यात असताना गोव्याच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी. तसे केले म्हणून पंतप्रधान मोदी काही श्रीपाद नाईक यांना डच्चू देणार नाहीत. शेवटी राजकारणात असलेल्या नेत्यांनालोकांसोबत राहावे लागते, हे पंतप्रधानांनाही पूर्णपणे ठाऊक आहे.

बायंगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्पास विरोध करणाऱ्यांमध्ये काही बिल्डरदेखील आहेत. कदंब पठारावर अनेक धनिकांचे बडे प्रकल्प येत आहेत. काहीजण पंचतारांकित हॉटेल्स उभी करणार आहेत. एका मोठ्या खाण उद्योगपतीनेही पठारावर आलिशान हॉटेलसाठी बरीच मोठी जमीन घेतली आहे. हा खाण मालक कोण, हे कळंगुटचे आमदार मायकल लोबो सांगू शकतील. कारण लोबोंनीच एकदा कदंब पठारावर कचरा प्रकल्प व्हावा, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी काही हॉटेलवाले, बिल्डर चवताळले होते. लोकवस्ती सगळीकडेच वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. हा कचरा सरकारने कुठे नेऊन टाकावा? विल्हेवाट नेमकी कशी लावावी? पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी बायंगिणीचा विषय पुढे नेला होता. पणजी महापालिकेनेही आवश्यक प्रक्रिया केली होती. पर्रीकर यांनी बायंगिणी प्रकल्पासाठी आग्रह धरला होता, तेव्हा श्रीपाद नाईक यांनी कधीच आक्षेप घेतला नव्हता. आता प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत असताना त्यांनी विरोधाचा सूर आळवणे हे काही पटण्यासारखे नाही. कदाचित विद्यमान मुख्यमंत्री सावंत आता भाऊंवर नाराज होऊ शकतात. कारण परवाच मुख्यमंत्र्यांनी मये येथे बोलताना लोक कायदा महाविद्यालयाला विरोध करत असल्याने कडक भाषा वापरली. विकास प्रकल्पांना विरोध करण्याची मनोवृत्ती योग्य नव्हे, असे ते म्हणाले. 

मयेवासीयांची समस्या जमिनीशी निगडित आहे. गोवा राज्य लहान असून, येथील राज्यकर्ते केंद्राचे किंवा खासगी कंपन्यांचे मोठे प्रकल्प गोव्यावर लादू पाहतात. गोव्याची जमीन येथील राजकारणी केंद्रीय आस्थापनांना देऊ पाहतात. वास्तविक सर्व मंत्र्यांनी स्वतःची जमीन सरकारी प्रकल्पासाठी द्यायला हवी, असे कुणीही सुचवू शकतो. मयेतील विस्थापितांच्या जमिनीचा प्रश्न सुटलेला नाही. जमिनी आणि घरे खऱ्या अर्थाने लोकांच्या नावावर होत नसल्याने लोक संतापलेले आहेत. ग्रामस्थांचा विरोध विकासाला नाही. ग्रामस्थ जमिनीच्या मालकीसाठी लढत आहेत. श्रीपाद नाईक यांनी बायंगिणी प्रकल्पास केवळ लोक विरोध करतात की काही मठ किंवा चर्चवालेही विरोध करतात, याचा शोध घ्यावा. काहीही असो; भाऊ प्रामाणिकपणे जुने गोवेच्या लोकांची साथ देत असतील तर स्वागतच करूया. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा