शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:15 IST

AAP Chief Arvind Kejriwal Goa Visit: भाजपा आणि काँग्रेसमध्ये निश्चितपणे साटेलोटे असून, गोव्यातील जनतेची सर्रास फसवणूक केली जात आहे, अशी टीका अरविंद केजरीवालांनी केली.

AAP Chief Arvind Kejriwal Goa Visit: राज्यातील जनतेचा भाजपा आणि काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे. दोन्ही पक्षांकडून राज्यातील जनतेला अजिबात आशा राहिलेल्या नाहीत. केवळ आम आदमी पक्षाकडून त्यांना आशा आहेत, त्यामुळे २०२७ मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो, असे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यात आगमन होताच अरविंद केजरीवाल यांनी सदर दावा केला. यावेळी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली. केजरीवाल यांचा हा तीन दिवसांचा दौरा पक्षाच्या संघटनात्मक बैठका आणि नवीन कार्यालयाच्या उद्‌घाटनावर केंद्रीत असणार आहे. या तीन दिवसांच्या दौऱ्यात केजरीवाल हे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक तयारीचा आढावा घेणार आहेत. 

वरून विरोध, आतून मात्र संगनमत, ही व्यवस्था बदलण्याची गरज

अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपावर अत्यंत धारदार शब्दांत हल्ला चढवला. काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या खाण व्यवसायावरून त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांमध्ये साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप केला. गोव्यात खाण व्यवसाय मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय सुरू राहू शकत नाही. वरवर पाहता हे दोन पक्ष एकमेकांचे विरोधक असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात ते संगनमत करून काम करतात. ही व्यवस्था आता बदलण्याची गरज आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. हे दोघेही गोव्याच्या लोकांना मूर्ख बनवत आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये निश्चितपणे साटेलोटे असून, गोव्यातील जनतेची सर्रास फसवणूक केली जात आहे, अशी टीका केजरीवालांनी केली. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात हिंमत नाही

जमिनीचा मालकी हक्क लोकांना देण्यापासून रोखण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात हिंमत नाही. मयेत गेल्या २५ वर्षापासून भाजपाचा आमदार आहे. पण, भाजपाने तुम्हाला काय दिले? रस्त्यांची दुरावस्था झाली, रोजगार नाही, हॉस्पिटलची सुविधा नाही. काही दिवसांपूर्वी प्रमोद सावंत यांनी या जमिनींवर सरकारचा हक्क असल्याचे सांगून मालकी हक्क दिला जाणार नसल्याचे सांगितले. हा धोका आहे. नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क देण्याचे काम आम आदमी पक्ष करेल, त्यासाठी पक्ष लढेल. प्रमोद सावंतांनी हक्क रोखून दाखवावेत, असे झाल्यास आम आदमी पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा केजरीवालांनी दिला. 

दरम्यान, सरकारी कार्यालयांत अनेकदा लोकांना योग्य मदत मिळत नाही आणि त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. यावर उपाय म्हणून आम आदमी पक्ष लोकांच्या मदतीसाठी पुढे येणार आहे. तुम्ही आमच्या कार्यालयात या, आम्ही तुम्हाला सर्व कामांमध्ये विनामूल्य मदत करू. गोव्यातील लोकांसाठी अनेक सरकारी योजना आहेत, पण माहितीअभावी स्थानिकांचा गोंधळ होतो. आम्ही तुम्हाला प्रत्येक योजनेबद्दल मार्गदर्शन करू आणि तुम्हाला लाभ मिळेल याची खात्री करू, असा शब्द केजरीवाल यांनी गोवेकरांना दिला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : AAP Will Form Goa Government in 2027: Kejriwal Attacks BJP, Congress

Web Summary : Arvind Kejriwal claims AAP will form a government in Goa in 2027 due to public dissatisfaction with BJP and Congress. He criticizes their alleged collusion, promising to address land rights and provide free assistance with government schemes.
टॅग्स :goaगोवाAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण