शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
4
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
5
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
6
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
7
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
10
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
11
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
12
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
13
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
14
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
15
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
16
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
17
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
18
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
19
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
20
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?

पोलिसांपेक्षा दरोडेखोर हुशार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:37 IST

काही महिन्यांपूर्वी धेंपे कुटुंबाच्या दोनापावल येथील बंगल्यावर मोठा दरोडा पडला.

गोवा आता पूर्वीचा राहिलेला नाही. इथे दिवसाढवळ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर खुनी हल्ले होतात, डॉक्टरांच्या बंगल्यांवर दरोडे पडतात. लहानमोठ्या चोऱ्या तर सुरूच आहेत. मात्र, या दरोड्यांचादेखील पोलिस छडा लावू शकत नाहीत, हे आपल्या कायदा व सुव्यवस्थेचे दुर्दैव आहे. अलीकडे काही डॉक्टरांना व श्रीमंतांना दरोडेखोरांनी टार्गेट केले आहे. दोनापावल येथे २०२४ साली डॉक्टर खोपे यांच्या घरावर दरोडा पडला होता. ५० लाख रुपयांचे सोने त्यावेळी लुटले गेले. पोलिसांनी गंभीरपणे तपास केला असता, तर त्या दरोड्याचा छडा लागला असता. तो विषय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापर्यंतही पोहोचला होता. त्यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने गृहखात्याला तपासाची सूचना केली असेल, पण पोलिस छडा लावू शकले नाहीत. 

काही महिन्यांपूर्वी धेंपे कुटुंबाच्या दोनापावल येथील बंगल्यावर मोठा दरोडा पडला. त्यावेळीही पन्नास ते सत्तर लाखांचा ऐवज लुटला गेला. मध्यरात्रीनंतर बंगल्यात प्रवेश करायचा, घरातील लोकांना बांधून ठेवायचे आणि सुऱ्याचा धाक दाखवून सोने लुटायचे, अशी त्यांची पद्धत आहे. धंपे बंगल्यावर आणि परवा म्हापशात त्याचीच पुनरावृत्ती झाली. गोव्यात पोलिसांचा फौजफाटा मोठा आहे. आयपीएस अधिकाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पोलिस निरीक्षक, उपअधीक्षक आर्दीची संख्या मोठी आहे. दरोडेखोरांनी या सर्व शक्तीला आव्हान दिले आहे. दरोडेखोर सोने लुटून पळतात, पण पोलिसांना सापडत नाहीत. म्हणजे, आजच्या काळात चोरटे-दरोडेखोर पोलिसांपेक्षा जास्त हुशार बनले आहेत की काय?, सरकारचे पोलिस यंत्रणेवर नियंत्रण राहिलेले नाही, असे अनेकदा अनुभवास येते. 

पोलिस प्रमुखांसोबत मुख्यमंत्र्यांच्या सातत्याने बैठका व्हायला हव्यात. कायदा व सुव्यवस्थेचा सातत्याने आढावा घ्यायला हवा. पोलिस प्रमुख आणि उत्तर व दक्षिण गोव्याच्या अधीक्षकांनी वारंवार पोलिस स्थानकांना भेट द्यायला हवी. तशी सूचना मुख्यमंत्र्यांनाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना करावी लागेल. लोक अनेकदा काही विषयांवरून पोलिस स्थानकांवर मोर्चे काढतात. कधी देवस्थानच्या वादावरून तर कधी अन्य एखाद्या वादावरून पोलिस स्थानकांवर शेकडो लोक जमतात आणि पूर्ण यंत्रणेवर दबाव आणतात. तेव्हाच, पोलिस अधीक्षक जागे होतात. अन्यथा पोलिस स्थानकांमध्ये काय चाललेय, यावर कुणाचेच लक्ष असत नाही. 

किनारी भागातील पोलिस स्थानकांच्या हद्दीत, तर प्रचंड गोंधळ सुरू आहे. पर्यटकांना अडवून तालांव देणे हेच पोलिसांचे प्रमुख काम झालेले आहे. पोलिसांना कर्नाटक व महाराष्ट्रातून गोव्यात येणारे ट्रक अडवून चलन देण्यापलीकडे काही काम नाही. गोव्यात दरोडेखोरांची टोळी येते, आरामात बंगले फोडते आणि फिल्मी स्टाइलने बंगल्यातील व्यक्तींना बांधून सोने-नाणे, रोख रक्कम लंपास करून टॅक्सी करून आरामात बेळगावला निघून जाते. हे सगळे चाललेय तरी काय, असा प्रश्न सामान्य माणसाला पडलेला आहे. 

सगळे मंत्री आरामात आहेत आणि सामान्य माणूस मात्र भयावह जीवन जगतो आहे. गोंयकार असुरक्षित आहे. अलीकडे डॉक्टरांनाच टार्गेट करून लुटले जातेय हे पोलिसांना लक्षात घ्यावे लागेल. धंपे यांच्या बंगल्यावर दरोडा टाकणारे गुन्हेगार बांगलादेशातून गोव्यात आले होते काय, याचा शोध घ्यावा लागेल. पोलिसांना खरी माहिती जाहीर करावी लागेल. त्या दरोड्याचे तपासकाम कुठवर पोहोचले हे पोलिसांनी किंवा गृह खात्याने कधीच गोमंतकीयांना सांगितले नाही. गणेशपुरी-म्हापसा येथील दरोड्याचा तरी छडा लागू शकेल काय?

पोलिसांची पूर्वी खबऱ्या व्यवस्था असायची. संशयास्पद व्यक्ती किंवा टोळ्या याविषयी त्या खबऱ्यांमार्फत पोलिसांना थोडी तरी माहिती मिळायची. आता आंदोलक पणजीत येऊन रस्ता अडवतात आणि चक्क भाजपच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढतात, पण पोलिसांना आधी सुगावाही लागत नाही. मग विरोधी आमदारांवर एफआयआर वगैरे नोंद केले जातात. 

पूर्वी विविध वसाहतींच्या ठिकाणी, संवेदनशील परिसरात रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त असायची. शहरांत व कॉलनीमध्ये पोलिसांच्या गाड्या फिरायच्या. दुचाक्या घेऊनही पोलिस फिरायचे. कुणी संशयास्पद आढळला तर त्याला ताब्यात घ्यायचे. पण, आता ते सगळे बंद झाल्यासारखे दिसतेय. सरकार केवळ पोलिस दलात स्वतःच्या जवळच्या व्यक्तींची भरती करण्यात बिझी आहे. पोलिसांचे राजकीयीकरण झाल्याने दरोड्यांचा छडा लागत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Are robbers smarter than police? Goa's rising crime wave.

Web Summary : Goa faces rising robberies targeting wealthy residents. Police fail to solve cases, raising questions about law enforcement effectiveness. Citizens feel unsafe.
टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसPoliticsराजकारण