शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

गोव्यात 80 टक्के खाणी बंद, शुक्रवारपासून संपूर्ण बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 7:29 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर राज्यातील 80 टक्के खनिज खाणी या आतापर्यंत बंद झाल्या आहेत. त्यांचे पॅकिंग झाले आहे. येत्या शुक्रवारपासून संपूर्ण खनिज उत्खनन राज्यभर बंद होणार आहे.

पणजी : सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर राज्यातील 80 टक्के खनिज खाणी या आतापर्यंत बंद झाल्या आहेत. त्यांचे पॅकिंग झाले आहे. येत्या शुक्रवारपासून संपूर्ण खनिज उत्खनन राज्यभर बंद होणार आहे. गोव्यातील या स्थितीची कल्पना देण्यासाठी भाजपाचे गोव्यातील तिन्ही खासदार आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

सरकारच्या खाण खात्याने अगोदर खनिज खाण उत्पादन येत्या दि. 13 पासून बंद व्हायला हवे असा आदेश जारी केला होता. त्या आदेशानुसार आज मंगळवारी खनिज खाण व्यवसाय बंद होणार होता. मात्र बार्ज मालक संघटना तसेच खनिज खाणींशीनिगडीत अन्य खनिज व्यवसायिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर बोट ठेवले व दि. 13 ऐवजी दि. 16 मार्चपासून खनिज खाणी बंद व्हायला हव्यात असा मुद्दा सरकारकरडे मांडला. न्यायालयाने दि. 16 पासून खाणी बंद करण्याचा आदेश दिला आहे. खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांनी सोमवारी सुधारित आदेश जारी केला. येत्या दि. 15 पर्यंत खनिज खाणी सुरू राहतील असे जाहीर केले. मात्र 15 रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून खनिज वाहतूक राज्यभर पूर्णपणे बंद होईल, असे जाहीर केले आहे. एरव्हीही रोज सायंकाळी सात वाजता खनिज वाहतूक बंद होत असते. खनिज खाण बंदीवर खाण खात्यासह इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचेही यावर लक्ष असेल. लिज धारकांना दि. 15 मार्चर्पयत खाण व्यवसाय करता येईल. त्यानंतर करता येणार नाही. दि. 16 पासून खाणींवर शुकशुकाट असेल. जोपर्यंत नव्याने लिज आणि पर्यावरणविषयक दाखला (ईसी) मिळत नाही, तोर्पयत कुणालाच खाण व्यवसाय करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या दि. 7 फेब्रुवारीला दिलेल्या आदेशाप्रमाणो गोव्यातील सर्व 88 लिजेस रद्दबातल ठरली आहेत.

खनिज खाण बंद करण्यापूर्वी खाणीच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करावी, असे केंद्र सरकारच्या खाण सुरक्षा संचालनालयाने सर्व गोव्यातील लिजधारक, खाण मालक, एजंट्स व खाणींच्या व्यवस्थापकांना कळवले आहे. गोव्यातील लिजांचा लिलाव करावा की अन्य कोणती पाऊले उचलावीत हे राज्य सरकारने अजून ठरवलेले नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रीय माईन्स व मिनरल्स डेव्हलपमेन्ट अॅण्ड रेग्यूलेशन कायद्यानुसार लिजांचा लिलाव करावा लागेल याची कल्पना सरकारला आहे, असे सुत्रांनी सांगितले.

गोव्यातील खनिज खाणींनी पॅकिंग सुरू केले असून 80 टक्के खाणी बंद झाल्या आहेत. फक्त दोन-तीन खनिज खाणी सुरू आहेत, त्यांचे काम गुरुवारी सायंकाळर्पयत बंद होईल, असे संचालक प्रसन्ना आचार्य यांनी सोमवारी लोकमतला सांगितले. खाणी बंद झाल्यानेच सध्या रोजचे खनिज उत्पादन केवळ 27 हजार टनांर्पयत खाली आले आहे. गेल्या 9 रोजी हे प्रमाण 40 हजार टन एवढे होते. न्यायालयाने सर्व खाणींसाठी मिळून वार्षिक उत्पादन 20 दशलक्ष टन एवढी ठरवली आहे पण यावेळी फक्त 10.3 दशलक्ष टन एवढे उत्पादन झाले असल्याचे आचार्य यांनी स्पष्ट केले.

गोव्यातील खनिज खाण बंदीविषयी मी, नरेंद्र सावईकर व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक असे तिघेही मिळून आम्ही मंगळवारी सकाळी अकरा वाजता अमित शहा यांना दिल्लीत भेटणार आहोत. खाण बंदीमुळे गोव्यात निर्माण झालेली स्थिती आम्ही शहा यांच्यासमोर मांडू. ते आम्हाला जशी सूचना करतील, त्यानुसार आम्ही पुढील पाऊले उचलू. त्यांनी जर केंद्रीय खाण मंत्री तोमर यांना किंवा जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांना भेटा अशी सूचना केली तर आम्ही त्यानुसार भेटी घेऊ.

- विनय तेंडुलकर

टॅग्स :goaगोवा