शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

यंदा विवाह साेहळे झाले शाॅर्टकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 5:00 AM

२०० ते ३०० किंवा जास्तीत जास्त ४००  लाेकांच्या उपस्थितीत यावर्षी विवाह कार्य पार पाडण्यावर कुटुंबिय भर देणार आहेत. दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात एका मंगल कार्यालयाकडे २० ते २५ लग्न कार्यालयाच्या बुकींग राहत हाेत्या. मात्र यावर्षी त्याची संख्या निम्म्याच्या खाली आहे. लग्न कार्य म्हटले की, बॅन्ड, संदल, फेटे, घाेडा आदीसह विविध प्रकारचा तामझाम राहत असताे. सधन लाेक विवाह कार्यावर लाखाे रुपये खर्च करतात.

ठळक मुद्देअनेकांनी केली बुकींग : डिसेंबर व जानेवारीत माेठ्या प्रमाणात मुहूर्त

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना महामारीने शासकीय नाेकरदार वगळता इतर बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे जुळलेले उपवर-वधूचे विवाह साेहळे कमी लाेकांच्या उपस्थितीत शाॅर्ट बट स्विट पद्धतीने पार पडणार आहेत. तशी माहिती मंगल कार्यालयाचे संचालक व वर-वधू कुटुंबांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. २०० ते ३०० किंवा जास्तीत जास्त ४००  लाेकांच्या उपस्थितीत यावर्षी विवाह कार्य पार पाडण्यावर कुटुंबिय भर देणार आहेत. दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात एका मंगल कार्यालयाकडे २० ते २५ लग्न कार्यालयाच्या बुकींग राहत हाेत्या. मात्र यावर्षी त्याची संख्या निम्म्याच्या खाली आहे. लग्न कार्य म्हटले की, बॅन्ड, संदल, फेटे, घाेडा आदीसह विविध प्रकारचा तामझाम राहत असताे. सधन लाेक विवाह कार्यावर लाखाे रुपये खर्च करतात. आपल्या आर्थिक ऐपतीनुसार प्रत्येकजण लग्न साेहळे पार पाड पाडताे. मात्र यावर्षी काेराेना संसर्गामुळे श्रीमंत, गरीब, सामान्य व सर्वच कुटुंबांसाठी विवाह साेहळे मर्यादित स्वरूपाचे झाले आहेत. काेराेनामुळे या कार्यातील अनेकांचा राेजगार हिरावला आहे.  

तुळशी विवाहानंतर बार उडणार७ डिसेंबरपासून तुळशी विवाहास प्रारंभ हाेत आहे. साधारणत: तुळशी विवाहानंतरच उपवर-वधूवरांचे विवाह कार्य संपन्न करण्यावर कुटुंबिय भर देतात. नाेव्हेंबर महिन्यात फारसे विवाह साेहळे पार पडणार नाहीत. मात्र (तुळशी विवाह)  डिसेंबर महिन्यापासून लग्न कार्याला वेग येणार आहे. मर्यादित लाेकांच्या उपस्थितीत लग्न साेहळे पार पडणार आहेत. 

एप्रिल, मे मध्ये सर्वाधिक मुहूर्तसन २०२१ मध्ये नवीन वर्षात विवाहासाठीचे सर्वाधिक मुहूर्त एप्रिल व मे महिन्यात आहे. एप्रिल महिन्यातील विवाहासाठी मुहूर्ताच्या तारखा २२, २४, २६, २७, २८, २९, ३० अशा आहेत. एप्रिल महिन्यात सात तारखा आहेत. मे महिन्यात १६ मुहूर्त आहेत. यामध्ये १, २, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २६, २८, २९, ३० या तारखा आहेत. मे महिन्यात विवाह साेहळ्याचा हंगाम जाेमात राहणार आहे. अनेक जाेडपी याच महिन्यात विवाह करतात. 

काेराेना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रम व लग्न समारंभावर बंदी आली. परिणामी मार्चपासून ऑक्टाेबरपर्यंत आम्हा व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. आता अनलाॅक झाल्यापासून शासनाने लग्न समारंभ व कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. मात्र दरवर्षीपेक्षा यंदा निम्म्याच्या खाली मंगल कार्यालयासाठी बुकींग  झाली आहे. काेराेना संसर्गाबाबत मंगल कार्यालयात सॅनिटायझर, मास्कचा वापर करून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. यावर्षी काेराेनामुळे बरेच लाेक मंगल कार्यालयांमध्ये सवलत मागत आहेत. व्यवसाय घसरला आहे. -सुनील पाेरेड्डीवार, सभागृह व मंगल कार्यालय, संचालक, गडचिराेली

 

टॅग्स :marriageलग्न