शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

महिलांनी आत्मनिर्भर होऊन प्रगती साधावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:13 IST

कौटुंबिक जीवन जगताना महिलांनी केवळ चूल व मूल यात गुरफटून न राहता विविध क्षेत्रात आत्मनिर्भर व स्वावलंबी होऊन स्वत:सह कुटुंबाची तसेच समाजाची प्रगती साधावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.

ठळक मुद्देनामदेव उसेंडी यांचे प्रतिपादन : चांदाळा येथील मेळाव्यात महिलांनी दाखविले कलाकौशल्य

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कौटुंबिक जीवन जगताना महिलांनी केवळ चूल व मूल यात गुरफटून न राहता विविध क्षेत्रात आत्मनिर्भर व स्वावलंबी होऊन स्वत:सह कुटुंबाची तसेच समाजाची प्रगती साधावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.तालुक्यातील चांदाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सोमवारला महिला मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती दुर्लभा बांबोळे, पं.स. सदस्य जान्हवी भोयर, शिक्षिका वंदना मुनघाटे, प्राचार्य सविता गोविंदवार, सरपंच राजेंद्र मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. बुरांडे, हरीश सिडाम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम भर्रे, केंद्रप्रमुख दुष्यांत तुरे, अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी, तंमुस अध्यक्ष सुरेश बांबोळे, हिरापूरचे उपसरपंच निसार, ग्रा.पं. सदस्य उषा गावडे, कोराम, यादव गोमस्कर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुखरू डोंगरे, पोलीस पाटील धनिका मेश्राम, वि.दा. सावरकर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मुळे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक जी.टी. कड्यामी, रानभूमी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक दरडे, रानमूल शाळेचे मुख्याध्यापक मनोज नाईक उपस्थित होते.पुढे बोलताना माजी आमदार डॉ. उसेंडी म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. महिलांना स्वातंत्र्यही नव्हते. त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड करून महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे भारत देशातील महिला ह्या राष्टÑपती, लोकसभा अध्यक्ष व पंतप्रधान पदापर्यंत पोहोचल्या. मात्र सध्याच्या काळात पुन्हा शिक्षण क्षेत्रात तशी परिस्थिती आणण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे महिलांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच राजेंद्र मेश्राम यानी केले तर संचालन प्रभाकर साखरे तर आभार नरूले यांनी मानले. यावेळी जि.प. प्राथमिक शाळा चांदाळा, वि.दा. सावरकर आश्रमशाळा, अनुदानित माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला चांदाळा, चांदाळा टोला, रानभूमी, रानमूल, कुंभी, विहिरगाव, आदी गावातील महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महिलांनी स्पर्धांमधून विविध प्रकारचे कलाकौशल्य दाखविले.कबड्डी स्पर्धेत चांदाळा टोलाच्या संघाने मारली बाजीसदर मेळाव्यात महिलांकरिता, कबड्डी, रांगोळी, रस्सीखेच, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या. कबड्डी स्पर्धेत चांदाळा टोला येथील महिलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर चांदाळाचा संघ दुसºया स्थानावर राहिला.विजेत्या संघांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र मेश्राम, सुरेश बांबोळे, मुकेश डोंगरे, डॉ. बुरांडे, प्रभाकर साखरे, दुष्यांत तुरे, जी. टी. कड्यामी व वर्षा रायसिडाम यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापकांनाही सन्मानित करण्यात आले.