शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

ग्रामीण भागातील महिला सरपणाच्या शोधात पुन्हा दाहीदिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 19:55 IST

गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने पुन्हा ग्रामीण भागात धूर निघणार काय, असाही प्रश्न पडला आहे. धूर मुक्त गाव योजनेचा खेळखंडोबा झाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

ठळक मुद्देगॅस महागल्याचा परिणामसर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांत शासनाच्या योजनेतून गॅस वितरण करण्यात आले. विविध योजनेतून गॅस वितरण केले, पण आता गॅस महागल्याने पैसे आणायचे कुठून? घरोघरी मातीच्या चुली, अशी म्हण पुन्हा दिसू लागली आहे. सिलिंडरमुळे नवीन पिढीला चुलीचा विसर पडला होता. मात्र, गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने पुन्हा ग्रामीण भागात धूर निघणार काय, असाही प्रश्न पडला आहे. धूर मुक्त गाव योजनेचा खेळखंडोबा झाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. (Women in rural areas turn right again in search of firewood)ग्रामीण भागात गॅस सिलिंडरचा वापर वाढला होता. घरोघरी चुली पेटविल्या जात नाहीत, तर काही घरी चुली हद्दपार झाल्या होत्या. ग्रामीण भागात महिला व पुरुष वर्षभरापासून परिसरातून सरपण जमा करत होते. गॅस मिळाल्याने तेही बंद झाले, पण पुन्हा अजून सरपण गोळा करण्याची वेळ आली आहे. स्वयंपाक गॅसवर, तर अंघोळीकरिता लागणारे गरम पाणी गॅसवरच गरम करण्यात येत होते. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर कुटुंबीयांचे आर्थिक बजेट, वीज बिल आणि सिलिंडरमुळे पूर्णत: गरिबांचे बजेट कोलमडले आहे.सततची नापिकी व कोरोनामुळे अनेक कुटुंबांना रोजगारापासून दूर राहावे लागत आहे. रोजगारासाठी भटकंती, साहित्यामध्ये दरवाढ, तर कामामध्ये मात्र वेतन कमी असल्याने नागरिकांना महागडा गॅस परवडणार काय? महागाई गगनाला भिडत आहे. त्यामुळे सिलिंडर घेणे अनेक कुटुंबीयांना अशक्य झाले आहे. येत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावर सरपणाची मोळी दिसणार आहे. महिलांसोबत पुरुषही परिसरातून सरपण गोळा करून सायकलद्वारे आणत असल्याचे चित्र लवकरच दिसून येणार आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास