शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
4
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
5
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
6
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
7
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
8
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
11
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
12
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
13
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
14
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
15
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
16
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
17
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
18
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
19
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
20
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Daily Top 2Weekly Top 5

विजेचे बिल भरूनही नागरिकांना अंधारात का राहावे लागते ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:49 IST

उन्हाळ्यात वाढले विजेचे ब्रेकडाऊन : नियोजनाचा दिसतोय अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली असताना शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरण दरमहा ग्राहकांना वीज बिल पाठविते, तसेच वीज बिलाचा भरणा वेळेत न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असले तर आम्ही वीज बिल का भरावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दुरुस्तीसाठी ग्रामीण भागात नागरिकांची गैरसोय

  • ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास दुरुस्तीसाठी महावितरण कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे अनेक गावात वीज कर्मचारी वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही.
  • परिणामी दुसऱ्या गावात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वीज दुरुस्तीची कामे करावी लागत असल्याचे वास्तव आहे. प्रत्येक गावात महावितरण कर्मचारी नेमावे.

विजेची मागणी वाढली किती पुरवठा किती?विजेची मागणी उन्हाळ्यात अधिक असते. त्यामुळे महावितरणने उन्हाळा लागण्यापूर्वीच नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र दरवर्षी उन्हाळा आणि विजेची लपंडाव हे समीकरणच तयार झाले आहे. विजेच्या मागणीनुसार पुरवठा होत नाही. परिणामी वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ग्रामीण भागात सुरू झाले भारनियमनग्रामीण भागात तर विजेसंबंधी विविध समस्या आहेत. कधी वीज येते, आणि कधी जाते. हे ग्रामीण भागातील नागरिकांना समजायला मार्ग नाही. एक प्रकारे ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरू असल्याची ओरड ग्रामीण भागातील वीज ग्राहकांची आहे.

विजेच्या लपंडावाची काय आहेत कारणे ?

  • मेंटेनन्सची कामे : महावितरण मेंटेनन्सची कामे सुरू आहेत, असे सांगून विविध भागांतील वीजपुरवठा तासनतास बंद ठेवत आहेत.
  • ब्रेकडाऊनचा प्रकार : महावितरणचे ब्रेकडाऊन तर पाचवीलाच पुजले आहे. ब्रेकडाऊननंतर वीजपुरवठा बंद होत असून, अंधाराचा सामना नागरिकांना करावा लागतो.
  • मागणी जास्त पुरवठा कमी : यावर्षी मार्च महिन्यापासूनच ऊन तापले. एप्रिल तर हीट ठरला आहे. अशा वेळी दिवसभरात अनेकदा वीजपुरवठा बंद केला जात असल्याने रोष व्यक्त होत आहे.

शहरातही लपंडावशहरातही विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. कधी सकाळीच तर कधी रात्री अचानक वीज गुल होत आहे. भर उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित राहत आहे. रात्रीही अनेकवेळा वीज खंडित होत असल्याने झोपमोड होत आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीelectricityवीज