शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

विजेचे बिल भरूनही नागरिकांना अंधारात का राहावे लागते ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:49 IST

उन्हाळ्यात वाढले विजेचे ब्रेकडाऊन : नियोजनाचा दिसतोय अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली असताना शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरण दरमहा ग्राहकांना वीज बिल पाठविते, तसेच वीज बिलाचा भरणा वेळेत न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असले तर आम्ही वीज बिल का भरावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दुरुस्तीसाठी ग्रामीण भागात नागरिकांची गैरसोय

  • ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास दुरुस्तीसाठी महावितरण कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे अनेक गावात वीज कर्मचारी वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही.
  • परिणामी दुसऱ्या गावात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वीज दुरुस्तीची कामे करावी लागत असल्याचे वास्तव आहे. प्रत्येक गावात महावितरण कर्मचारी नेमावे.

विजेची मागणी वाढली किती पुरवठा किती?विजेची मागणी उन्हाळ्यात अधिक असते. त्यामुळे महावितरणने उन्हाळा लागण्यापूर्वीच नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र दरवर्षी उन्हाळा आणि विजेची लपंडाव हे समीकरणच तयार झाले आहे. विजेच्या मागणीनुसार पुरवठा होत नाही. परिणामी वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ग्रामीण भागात सुरू झाले भारनियमनग्रामीण भागात तर विजेसंबंधी विविध समस्या आहेत. कधी वीज येते, आणि कधी जाते. हे ग्रामीण भागातील नागरिकांना समजायला मार्ग नाही. एक प्रकारे ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरू असल्याची ओरड ग्रामीण भागातील वीज ग्राहकांची आहे.

विजेच्या लपंडावाची काय आहेत कारणे ?

  • मेंटेनन्सची कामे : महावितरण मेंटेनन्सची कामे सुरू आहेत, असे सांगून विविध भागांतील वीजपुरवठा तासनतास बंद ठेवत आहेत.
  • ब्रेकडाऊनचा प्रकार : महावितरणचे ब्रेकडाऊन तर पाचवीलाच पुजले आहे. ब्रेकडाऊननंतर वीजपुरवठा बंद होत असून, अंधाराचा सामना नागरिकांना करावा लागतो.
  • मागणी जास्त पुरवठा कमी : यावर्षी मार्च महिन्यापासूनच ऊन तापले. एप्रिल तर हीट ठरला आहे. अशा वेळी दिवसभरात अनेकदा वीजपुरवठा बंद केला जात असल्याने रोष व्यक्त होत आहे.

शहरातही लपंडावशहरातही विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. कधी सकाळीच तर कधी रात्री अचानक वीज गुल होत आहे. भर उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित राहत आहे. रात्रीही अनेकवेळा वीज खंडित होत असल्याने झोपमोड होत आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीelectricityवीज