शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पाणीटंचाईची समस्या सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:50 AM

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेकडून जलस्वराज्य व भारत निर्माण योजनेंतर्गत २००७-०८ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी योजना मंजूर करण्यात आल्या. याकरिता २ कोटी २९ लाख ९७ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला होता.

ठळक मुद्देझिंगानूर परिसर : १३ ग्राम पंचायतींतर्गत करण्यात आलेली उपाययोजना कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेकडून जलस्वराज्य व भारत निर्माण योजनेंतर्गत २००७-०८ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी योजना मंजूर करण्यात आल्या. याकरिता २ कोटी २९ लाख ९७ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु १० ते १२ वर्षांचा कालावधी उलटूनही तालुक्यातील झिंगानूर परिसरातील पाणी टंचाईची समस्या सुटली नाही. ही समस्या सुटणार कधी? याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींपैैकी १३ ग्राम पंचायतींना संलग्न असलेल्या १७ ठिकाणी पाणी टंचाई निवारणासाठी कुपनलिका हातपंपासह जोडण्यात आल्या. झिंगानूर ग्रा. पं. ला समाविष्ट झिंगानूर माल, चक नं. १, चक नं. २ व पुल्लीगुंडम या चार ठिकाणी सदर कामासाठी एकूण ५७ लाख ४४ हजार रूपये निधी मंजूर होता. त्यापैैकी २००७-०८ मध्ये पहिल्या टप्प्यात ३७ लाख ९४ हजारांची मागणी होती. तथापि १२ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही त्या भागातील आदिवासींना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पुल्लीगुंडम येथे आनंदराव लच्चा मडावी यांच्या घरामागील कुपनलिकेला पाणी नाही. समय्या रामा मडावी यांच्या घरासमोरील कुपनलिकेची स्थितीही समाधानकारक नाही. गावाच्या नाल्याजवळील वीरय्या सूरय्या मडावी यांच्या घरामागे तसेच जि. प. शाळेलगत मदनय्या बकय्या तोरेमच्या घरापुढे अशा स्वतंत्र दोन कुपनलिका आहेत. मात्र पाणी नियमित येत नाही. राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी ५ एप्रिल २०१३ रोजी झिंगानूरला भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी येथून ४ किमी अंतरावरील मंगिगुडम येथील हातपंपाचे व विद्युत जनित्राची कळ दाबून वीज व पाण्याची समस्या निकाली काढली. याच कार्यक्रमात पुल्लीगुंडमच्या नागरिकांनी भेट देऊन पाणी समस्या मांडली. तालुक्यातील मेडारम चकसाठी १६ लाख ५० हजार , गुमलकोंडा रयतवारी ५० लाख, पोचमपल्ली कोटासाठी १८ लाख मद्दीकुंटा २२ लाख, सिरकोंडा माल. २१ लाख, सिरकोंडा टोला १.५० लाख आदीमुत्तापूर १६ लाख ५० हजार, गर्कापेटा ग्रा. पं. च्या कोटामालसाठी १९ लाख ५० हजार, जानमपल्ली अंतर्गतच्या वेस्टलँडसाठी २४ लाख व चकसाठी १.५० लाख असे २५ लाख ५० हजार रूपये निधी पाणी टंचाई निवारणासाठी मंजूर झाले. चिंतरेवलुलासाठी ४ लाख ३ हजार खर्ची पडले तर उर्वरित मुत्तापूरचक, आयपेठा रयत या गावांसाठी प्रत्येकी १.५० प्रमाणे ३ लाख रूपये खर्च करण्यात आले. सदर १३ ग्राम पंचायतीसह इतर २८ ग्राम पंचायतींना समाविष्ट असलेल्या गावातील पाणी समस्या पूर्णत: सुटलेली नाही. बहुसंख्य नागरिक खासगी बोरिंगच्या माध्यमातून पाण्याची अडचण दूर करीत असल्याचे वास्तव आहे.कोप्पेला येथील ‘लोह निवारक सयंत्र’ निकामीमोठा गाजावाजा करून ९ वर्र्षांपूर्वी कोप्पेला येथे बसविलेले आयर्न रिमुव्हल कंटेनर १ वर्षाच्या आतच उद्ध्वस्त झाले. जिल्ह्यातील एकमेव सुविधा असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. जिल्हा परिषद गडचिरोली व विभागीय आयुक्त कार्यालयाचा भारत निर्माण कक्ष यांच्या संयुक्त समन्वयातून ही योजना अंमलात आली होती. मात्र आजही कोप्पेलाचे नागरिक अशुद्ध पाणीच वापरत आहेत. गावालगतच्या नाल्यात झरे खोदून तहान भागवत आहेत. ही स्थिती आजही कायम आहे. योग्य हेतूने कार्यान्वित केलेली यंत्रणा कुचकामी ठरत आहे. या सयंत्रावर झालेला खर्चही पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई