शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पंधरवड्यापासून काेरचीच्या वाॅर्डातील नळ याेजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:35 IST

काेरची शहरातील वाॅर्ड क्रमांक १४ मध्ये साैरऊर्जेवर चालणारी नळ याेजना आहे. या वाॅर्डात ३० ते ४० घरे आहेत. २००च्या ...

काेरची शहरातील वाॅर्ड क्रमांक १४ मध्ये साैरऊर्जेवर चालणारी नळ याेजना आहे. या वाॅर्डात ३० ते ४० घरे आहेत. २००च्या आसपास येथे लाेकसंख्या आहे. येथील नागरिक नळाच्याच पाण्याचा वापर करीत हाेते. परंतु नळयाेजना बंद पडल्याने पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत वॉर्डातील नागरिकांनी २३ फेब्रुवारीला नगर पंचायतीला निवेदन दिले होते. परंतु अजूनही या निवेदनाची दखल संबंधित विभागाने घेतली नाही. सध्या उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. नळ याेजना बंद पडल्याने सध्या नागरिक विहिरीचे पाणी वापरत आहेत. परंतु येथील पाणी वापरण्यायाेग्य नाही. विहीर परिसरात घाण पसरलेली दिसून येते. या ठिकाणी ब्लिचिंग पावडरसुद्धा टाकण्यात आलेले नाही. नागरिक दूषित पाण्याचा वापर करीत असल्याने त्यांचे आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता आहे. नगरपंचायत प्रशासनाने वाॅर्ड क्रमांक १४ मधील साैरऊर्जा नळयाेजनेतील बिघाड लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी धनराज मडावी, धरमसाय नैताम, श्रीराम नैताम, रणजीत कुमरे, महेश पोरेटी, संजय काटेंगे, दुःखू पुडो, अनिल उईके, झाडुराम पोरेटी, परसराम पोरेटी, दुर्गासाय नैताम, रमेश पोरेटी, मीना काटेंगे, अमायबाई पोरेटी, बाबुराव पोरेटी, रामू दर्रो, वंदना दर्रो, उर्मिला नैताम, सुलताना पोरेटी, शारदा नैताम, ललिता दर्रो आदी नागरिकांनी केली आहे.

काेट

काेरची शहरातील वाॅर्ड क्रमांक १४ मधील बिघडलेल्या साैरऊर्जा नळ याेजनेची चौकशी केली जाईल. किरकाेळ बिघाड असल्यास असल्यास लगेच दुरुस्ती केली जाईल. मोठा बिघाड असल्यास त्यासाठी पाठपुरावा करून दुरुस्ती केली जाईल.

डॉ. कुलभूषण रामटेके,

मुख्याधिकारी

नगर पंचायत, कोरची