शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

पाच तालुक्यांची भूजल पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:24 IST

आॅगस्ट महिन्यातच पावसाने उसंत घेतल्याने पाच तालुक्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या अगदी वेळेवर आगमन झाले.

ठळक मुद्देकमी पावसाचा परिणाम : भूजल सर्वेक्षण विभागाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅगस्ट महिन्यातच पावसाने उसंत घेतल्याने पाच तालुक्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या अगदी वेळेवर आगमन झाले. सुरूवातीचे काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतीची कामे अगदी वेळेवर उरकली होती. असाच पाऊस सुरू राहिल्यास यावर्षी सरासरी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने कायमची उसंत घेतली. तेव्हापासून अजूनपर्यंत पाऊस पडला नाही. पाऊस कमी झाल्याने याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यांची पाणी पातळी घटली आहे.पाणी पातळीचे निरिक्षण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११२ निरिक्षण विहिरी आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी या विहिरींच्या पाण्याची पातळी मोजतात. त्यावरून भूजल पातळीचा अंदाज वर्तविला जातो. विशेष म्हणजे, जलयुक्त शिवार अभियानमुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी हा दावा प्रत्यक्षात उतरला नसल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांची भूजल पातळी सरासरीच्या तुलनेत घटली असली तरी पाण्याचा उपसा कमी असल्याने एप्रिल महिन्यापर्यंत पाणी टंचाई निर्माण होत नाही, असा सर्वसाधारण दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र दिवसेंदिवस बोअरवेल, विहिरी यांची संख्या वाढत चालली असल्याने भूजलाचा उपसाही वाढला आहे. परिणामी भूजल पातळीत घट होत आहे. भविष्यात पाण्याची चिंता निर्माण होणार आहे.सात तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊसयावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या १.८८ टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी अत्यंत विषम प्रमाणात पाऊस झाला. दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले होते. तर दुसरीकडे गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. गडचिरोली तालुक्यात सरासरीपेक्षा १५ टक्के, आरमोरी तालुक्यात सरासरीपेक्षा १८ टक्के, देसाईगंज ११ टक्के, कुरखेडा २२ टक्के, कोरची २३ टक्के, धानोरा १६ टक्के, चामोर्शी १५ टक्के कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. तर मुलचेरा तालुक्यात ९ टक्के, अहेरी २७ टक्के, एटापल्ली ५ टक्के, भामरागड २७ टक्के व सिरोंचा तालुक्यात सुमारे ४२ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई