शहरं
Join us  
Trending Stories
1
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
2
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
3
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
4
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
5
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
6
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
7
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
8
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
9
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
10
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
11
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
12
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
13
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
14
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
15
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
16
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
17
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
18
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
19
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
20
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."

पाच तालुक्यांची भूजल पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:24 IST

आॅगस्ट महिन्यातच पावसाने उसंत घेतल्याने पाच तालुक्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या अगदी वेळेवर आगमन झाले.

ठळक मुद्देकमी पावसाचा परिणाम : भूजल सर्वेक्षण विभागाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅगस्ट महिन्यातच पावसाने उसंत घेतल्याने पाच तालुक्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या अगदी वेळेवर आगमन झाले. सुरूवातीचे काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतीची कामे अगदी वेळेवर उरकली होती. असाच पाऊस सुरू राहिल्यास यावर्षी सरासरी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने कायमची उसंत घेतली. तेव्हापासून अजूनपर्यंत पाऊस पडला नाही. पाऊस कमी झाल्याने याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यांची पाणी पातळी घटली आहे.पाणी पातळीचे निरिक्षण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११२ निरिक्षण विहिरी आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी या विहिरींच्या पाण्याची पातळी मोजतात. त्यावरून भूजल पातळीचा अंदाज वर्तविला जातो. विशेष म्हणजे, जलयुक्त शिवार अभियानमुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी हा दावा प्रत्यक्षात उतरला नसल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांची भूजल पातळी सरासरीच्या तुलनेत घटली असली तरी पाण्याचा उपसा कमी असल्याने एप्रिल महिन्यापर्यंत पाणी टंचाई निर्माण होत नाही, असा सर्वसाधारण दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र दिवसेंदिवस बोअरवेल, विहिरी यांची संख्या वाढत चालली असल्याने भूजलाचा उपसाही वाढला आहे. परिणामी भूजल पातळीत घट होत आहे. भविष्यात पाण्याची चिंता निर्माण होणार आहे.सात तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊसयावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या १.८८ टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी अत्यंत विषम प्रमाणात पाऊस झाला. दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले होते. तर दुसरीकडे गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. गडचिरोली तालुक्यात सरासरीपेक्षा १५ टक्के, आरमोरी तालुक्यात सरासरीपेक्षा १८ टक्के, देसाईगंज ११ टक्के, कुरखेडा २२ टक्के, कोरची २३ टक्के, धानोरा १६ टक्के, चामोर्शी १५ टक्के कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. तर मुलचेरा तालुक्यात ९ टक्के, अहेरी २७ टक्के, एटापल्ली ५ टक्के, भामरागड २७ टक्के व सिरोंचा तालुक्यात सुमारे ४२ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई