शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

येथे कंबरभर पाण्यातून वाट काढत बजावावे लागते कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 21:56 IST

अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील जंगलात सेवा देण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या भागात पक्के रस्ते नाही. अनेक ठिकाणी नदी, नाले पडतात. पुलांचा अभाव असल्याने पाण्यातूनच पावसाळ्यात वाट काढत कर्तव्यावर पोहोचावे लागते.

ठळक मुद्देआव्हाने स्वीकारून वनसंरक्षणासोबतच पार पाडावी लागतात विविध कामेपती-पत्नी देताहेत दुर्गम भागात वनसेवा

उमेश पेंड्याला ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सुगम क्षेत्रात व शहरी भागात शासकीय सेवा देताना फारशी कसरत करावी लागत नाही. मात्र आदिवासीबहुल दुर्गम भागात सेवा देताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच अशी सेवा बजावताना जीवाची पर्वा न करता अनेक कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. कमलापूर भागात वनविभागाच्या सेवेत कार्यरत असलेले पती-पत्नी व इतर कर्मचाऱ्यांना कंबरभर पाण्यातून पावसाळ्यात वाट काढावी लागते.

वनविभागाची सेवा म्हटले की, जंगलात जाऊन काम करणे आले. जंगलाचे संरक्षण, वनतस्करी रोखणे, वन्यप्राण्यांची शिकार थांबविणे यासह नवीन रोपवन लावून पर्यावरणाचा संतुलन ठेवणे आदी कामे प्रामुख्याने करावी लागतात. अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील जंगलात सेवा देण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या भागात पक्के रस्ते नाही. अनेक ठिकाणी नदी, नाले पडतात. पुलांचा अभाव असल्याने पाण्यातूनच पावसाळ्यात वाट काढत कर्तव्यावर पोहोचावे लागते. अशाप्रकारे अनेक संकटांचा सामना करत कमलापूर भागात वनरक्षक दाम्पत्य गेल्या चार-पाच वर्षांपासून सेवा देत आहेत.

सिरोंचा वनविभागाअंतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र राजाराम भागात मागील चार महिन्यांपासून वनरक्षक रंजीता गोविंदा दुगा व सी.डब्ल्यू.कांदो सेवा देत आहेत. राजाराम परिसरात रोपवनाची कामे सुरू आहेत. राजाराम येथून सहा किमी अंतरावर सूर्यापल्ली गावाच्या पलिकडे नाला आहे. या भागात राखीव जंगलात रोवन तयार करण्यात आले असून निंदणाचे काम सुरू आहे. या कामावर वनरक्षक चरणदास कांदो यांना लक्ष ठेवावे लागते. रंजिता दुग्गा (कांदो) या तिमरम नियतक्षेत्रात तर त्यांचे पती चरणदास कांदो हे राजाराम नियतक्षेत्रात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी हे दाम्पत्य आलापल्ली वनविभागात कार्यरत होते. त्याठिकाणी त्यांनी आठ वर्ष सेवा दिली. गेल्या १३ वर्षांपासून हे दाम्पत्य दुर्गम भागात वनविभागात सेवा देत आहेत.

पावसाळ्यात हा अनुभव नित्याचावनरक्षक चरणदास कांदो व रंजीता दुग्गा (कांदो) हे इतर कर्मचाऱ्यांसह २५ सप्टेंबर रोजी शुक्रवारला सूर्यापल्ली गावानजीकच्या कक्ष क्र.१४२ रोपवनक्षेत्रात सकाळी गेले होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पायी जावे लागते. राजाराम येथून ६ किमी अंतरावर हे रोपवन आहे. त्या ठिकाणी १८ मजुरांमार्फत निंदणाचे काम सुरू होते. कामाची पाहणी करून सायंकाळी ५.३० वाजता परत येताना अचानक जोरदार पाऊस आला. या पावसाने सूर्यापल्ली गावानजीकच्या नाल्याला पाणी चढले. मोठी हिंमत ठेवून या पाण्यातून वाट काढावी लागली, असे रंजिता दुग्गा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरवर्षीच्या पावसाळ्यात हा अनुभव आमच्यासाठी नेहमीचाच आहे, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Waterपाणी