शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

येथे कंबरभर पाण्यातून वाट काढत बजावावे लागते कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 21:56 IST

अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील जंगलात सेवा देण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या भागात पक्के रस्ते नाही. अनेक ठिकाणी नदी, नाले पडतात. पुलांचा अभाव असल्याने पाण्यातूनच पावसाळ्यात वाट काढत कर्तव्यावर पोहोचावे लागते.

ठळक मुद्देआव्हाने स्वीकारून वनसंरक्षणासोबतच पार पाडावी लागतात विविध कामेपती-पत्नी देताहेत दुर्गम भागात वनसेवा

उमेश पेंड्याला ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सुगम क्षेत्रात व शहरी भागात शासकीय सेवा देताना फारशी कसरत करावी लागत नाही. मात्र आदिवासीबहुल दुर्गम भागात सेवा देताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच अशी सेवा बजावताना जीवाची पर्वा न करता अनेक कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. कमलापूर भागात वनविभागाच्या सेवेत कार्यरत असलेले पती-पत्नी व इतर कर्मचाऱ्यांना कंबरभर पाण्यातून पावसाळ्यात वाट काढावी लागते.

वनविभागाची सेवा म्हटले की, जंगलात जाऊन काम करणे आले. जंगलाचे संरक्षण, वनतस्करी रोखणे, वन्यप्राण्यांची शिकार थांबविणे यासह नवीन रोपवन लावून पर्यावरणाचा संतुलन ठेवणे आदी कामे प्रामुख्याने करावी लागतात. अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील जंगलात सेवा देण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या भागात पक्के रस्ते नाही. अनेक ठिकाणी नदी, नाले पडतात. पुलांचा अभाव असल्याने पाण्यातूनच पावसाळ्यात वाट काढत कर्तव्यावर पोहोचावे लागते. अशाप्रकारे अनेक संकटांचा सामना करत कमलापूर भागात वनरक्षक दाम्पत्य गेल्या चार-पाच वर्षांपासून सेवा देत आहेत.

सिरोंचा वनविभागाअंतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र राजाराम भागात मागील चार महिन्यांपासून वनरक्षक रंजीता गोविंदा दुगा व सी.डब्ल्यू.कांदो सेवा देत आहेत. राजाराम परिसरात रोपवनाची कामे सुरू आहेत. राजाराम येथून सहा किमी अंतरावर सूर्यापल्ली गावाच्या पलिकडे नाला आहे. या भागात राखीव जंगलात रोवन तयार करण्यात आले असून निंदणाचे काम सुरू आहे. या कामावर वनरक्षक चरणदास कांदो यांना लक्ष ठेवावे लागते. रंजिता दुग्गा (कांदो) या तिमरम नियतक्षेत्रात तर त्यांचे पती चरणदास कांदो हे राजाराम नियतक्षेत्रात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी हे दाम्पत्य आलापल्ली वनविभागात कार्यरत होते. त्याठिकाणी त्यांनी आठ वर्ष सेवा दिली. गेल्या १३ वर्षांपासून हे दाम्पत्य दुर्गम भागात वनविभागात सेवा देत आहेत.

पावसाळ्यात हा अनुभव नित्याचावनरक्षक चरणदास कांदो व रंजीता दुग्गा (कांदो) हे इतर कर्मचाऱ्यांसह २५ सप्टेंबर रोजी शुक्रवारला सूर्यापल्ली गावानजीकच्या कक्ष क्र.१४२ रोपवनक्षेत्रात सकाळी गेले होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पायी जावे लागते. राजाराम येथून ६ किमी अंतरावर हे रोपवन आहे. त्या ठिकाणी १८ मजुरांमार्फत निंदणाचे काम सुरू होते. कामाची पाहणी करून सायंकाळी ५.३० वाजता परत येताना अचानक जोरदार पाऊस आला. या पावसाने सूर्यापल्ली गावानजीकच्या नाल्याला पाणी चढले. मोठी हिंमत ठेवून या पाण्यातून वाट काढावी लागली, असे रंजिता दुग्गा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरवर्षीच्या पावसाळ्यात हा अनुभव आमच्यासाठी नेहमीचाच आहे, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Waterपाणी