शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

येथे कंबरभर पाण्यातून वाट काढत बजावावे लागते कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 21:56 IST

अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील जंगलात सेवा देण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या भागात पक्के रस्ते नाही. अनेक ठिकाणी नदी, नाले पडतात. पुलांचा अभाव असल्याने पाण्यातूनच पावसाळ्यात वाट काढत कर्तव्यावर पोहोचावे लागते.

ठळक मुद्देआव्हाने स्वीकारून वनसंरक्षणासोबतच पार पाडावी लागतात विविध कामेपती-पत्नी देताहेत दुर्गम भागात वनसेवा

उमेश पेंड्याला ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सुगम क्षेत्रात व शहरी भागात शासकीय सेवा देताना फारशी कसरत करावी लागत नाही. मात्र आदिवासीबहुल दुर्गम भागात सेवा देताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच अशी सेवा बजावताना जीवाची पर्वा न करता अनेक कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. कमलापूर भागात वनविभागाच्या सेवेत कार्यरत असलेले पती-पत्नी व इतर कर्मचाऱ्यांना कंबरभर पाण्यातून पावसाळ्यात वाट काढावी लागते.

वनविभागाची सेवा म्हटले की, जंगलात जाऊन काम करणे आले. जंगलाचे संरक्षण, वनतस्करी रोखणे, वन्यप्राण्यांची शिकार थांबविणे यासह नवीन रोपवन लावून पर्यावरणाचा संतुलन ठेवणे आदी कामे प्रामुख्याने करावी लागतात. अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील जंगलात सेवा देण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या भागात पक्के रस्ते नाही. अनेक ठिकाणी नदी, नाले पडतात. पुलांचा अभाव असल्याने पाण्यातूनच पावसाळ्यात वाट काढत कर्तव्यावर पोहोचावे लागते. अशाप्रकारे अनेक संकटांचा सामना करत कमलापूर भागात वनरक्षक दाम्पत्य गेल्या चार-पाच वर्षांपासून सेवा देत आहेत.

सिरोंचा वनविभागाअंतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र राजाराम भागात मागील चार महिन्यांपासून वनरक्षक रंजीता गोविंदा दुगा व सी.डब्ल्यू.कांदो सेवा देत आहेत. राजाराम परिसरात रोपवनाची कामे सुरू आहेत. राजाराम येथून सहा किमी अंतरावर सूर्यापल्ली गावाच्या पलिकडे नाला आहे. या भागात राखीव जंगलात रोवन तयार करण्यात आले असून निंदणाचे काम सुरू आहे. या कामावर वनरक्षक चरणदास कांदो यांना लक्ष ठेवावे लागते. रंजिता दुग्गा (कांदो) या तिमरम नियतक्षेत्रात तर त्यांचे पती चरणदास कांदो हे राजाराम नियतक्षेत्रात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी हे दाम्पत्य आलापल्ली वनविभागात कार्यरत होते. त्याठिकाणी त्यांनी आठ वर्ष सेवा दिली. गेल्या १३ वर्षांपासून हे दाम्पत्य दुर्गम भागात वनविभागात सेवा देत आहेत.

पावसाळ्यात हा अनुभव नित्याचावनरक्षक चरणदास कांदो व रंजीता दुग्गा (कांदो) हे इतर कर्मचाऱ्यांसह २५ सप्टेंबर रोजी शुक्रवारला सूर्यापल्ली गावानजीकच्या कक्ष क्र.१४२ रोपवनक्षेत्रात सकाळी गेले होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पायी जावे लागते. राजाराम येथून ६ किमी अंतरावर हे रोपवन आहे. त्या ठिकाणी १८ मजुरांमार्फत निंदणाचे काम सुरू होते. कामाची पाहणी करून सायंकाळी ५.३० वाजता परत येताना अचानक जोरदार पाऊस आला. या पावसाने सूर्यापल्ली गावानजीकच्या नाल्याला पाणी चढले. मोठी हिंमत ठेवून या पाण्यातून वाट काढावी लागली, असे रंजिता दुग्गा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरवर्षीच्या पावसाळ्यात हा अनुभव आमच्यासाठी नेहमीचाच आहे, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Waterपाणी