शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

शेतकऱ्यांना ३४.५५ कोटी मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:49 IST

केवळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळलेल्या मंडळांतील पीकांसाठी नुकसानभरपाई देण्याचा २३ फेब्रुवारीचा तुघलकी निर्णय मागे घेण्याची घोषणा महसूलमंत्र्यांनी विधीमंडळात केली.

ठळक मुद्देमावा-तुडतुडे व बोंडअळीने नुकसान : २३ फेब्रुवारीचा शासन निर्णय मागे घेण्याच्या घोषणेने दिलासा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : केवळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळलेल्या मंडळांतील पीकांसाठी नुकसानभरपाई देण्याचा २३ फेब्रुवारीचा तुघलकी निर्णय मागे घेण्याची घोषणा महसूलमंत्र्यांनी विधीमंडळात केली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असला तरी आधीच्या निकषानुसार दिली जाणारी ३४ कोटी ५५ लाखांची मदत केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.यावर्षी खरीप हंगामात पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस आणि धानावर रोगांचा प्रादुर्भाव झाला. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने रोगांनी ग्रस्त कापूस व धानाच्या पिकांसाठी ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी शासन निर्णय काढून अहवालसुद्धा शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र यादरम्यान २३ फेब्रुवारी २०१८ रोजी काढलेल्या शासन निर्णयात शासनाच्या मदतीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अट घालण्यात आली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात केवळ चामोर्शी, मुलचेरा व भामरागड या तीनच तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरले होते. मात्र यामुळे विदर्भात नुकसानग्रस्त बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्यामुळे विरोधी आणि काही सत्ताधारी आमदारांनीही तो निर्णय मागे घेऊन जुन्या निकषांप्रमाणेच मदत द्यावी अशी मागणी केली. त्यानुसार २३ फेब्रुवारीचा निर्णय मागे घेण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात विधीमंडळात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीच्या आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यात ६९ हजार ५१५ शेतकरी ३४ कोटी ५५ लाख रुपयांच्या मदतीसाठी पात्र आहेत. मात्र सरकारकडे ही मदत देण्यासाठी पैसेच नाहीत. त्यामुळे या मदतीसाठी केंद्र सरकारपुढे हात पसरण्यात आले असले तरी केंद्राने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकार मदतीचा वाटा उचलणार नाही तोपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही का? असा शंकात्मक प्रश्न शेतकरी करीत आहेत. शेतकºयांना जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. ही मदत प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर जमा होण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.पाठपुराव्याला यश२३ फेब्रुवारीचा जीआर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ देण्यापासून वंचित ठेवणारा होता. त्यामुळे तो जीआर रद्द करावा. यासाठी आम्ही केलेल्या पाठपुराव्याला यश आले. लवकरच सर्व शेतकºयांना मदत मिळावी यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.- कृष्णा गजबे, आमदार, आरमोरी