शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ३४.५५ कोटी मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:49 IST

केवळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळलेल्या मंडळांतील पीकांसाठी नुकसानभरपाई देण्याचा २३ फेब्रुवारीचा तुघलकी निर्णय मागे घेण्याची घोषणा महसूलमंत्र्यांनी विधीमंडळात केली.

ठळक मुद्देमावा-तुडतुडे व बोंडअळीने नुकसान : २३ फेब्रुवारीचा शासन निर्णय मागे घेण्याच्या घोषणेने दिलासा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : केवळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळलेल्या मंडळांतील पीकांसाठी नुकसानभरपाई देण्याचा २३ फेब्रुवारीचा तुघलकी निर्णय मागे घेण्याची घोषणा महसूलमंत्र्यांनी विधीमंडळात केली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असला तरी आधीच्या निकषानुसार दिली जाणारी ३४ कोटी ५५ लाखांची मदत केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.यावर्षी खरीप हंगामात पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस आणि धानावर रोगांचा प्रादुर्भाव झाला. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने रोगांनी ग्रस्त कापूस व धानाच्या पिकांसाठी ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी शासन निर्णय काढून अहवालसुद्धा शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र यादरम्यान २३ फेब्रुवारी २०१८ रोजी काढलेल्या शासन निर्णयात शासनाच्या मदतीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अट घालण्यात आली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात केवळ चामोर्शी, मुलचेरा व भामरागड या तीनच तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरले होते. मात्र यामुळे विदर्भात नुकसानग्रस्त बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्यामुळे विरोधी आणि काही सत्ताधारी आमदारांनीही तो निर्णय मागे घेऊन जुन्या निकषांप्रमाणेच मदत द्यावी अशी मागणी केली. त्यानुसार २३ फेब्रुवारीचा निर्णय मागे घेण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात विधीमंडळात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीच्या आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यात ६९ हजार ५१५ शेतकरी ३४ कोटी ५५ लाख रुपयांच्या मदतीसाठी पात्र आहेत. मात्र सरकारकडे ही मदत देण्यासाठी पैसेच नाहीत. त्यामुळे या मदतीसाठी केंद्र सरकारपुढे हात पसरण्यात आले असले तरी केंद्राने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकार मदतीचा वाटा उचलणार नाही तोपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही का? असा शंकात्मक प्रश्न शेतकरी करीत आहेत. शेतकºयांना जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. ही मदत प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर जमा होण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.पाठपुराव्याला यश२३ फेब्रुवारीचा जीआर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ देण्यापासून वंचित ठेवणारा होता. त्यामुळे तो जीआर रद्द करावा. यासाठी आम्ही केलेल्या पाठपुराव्याला यश आले. लवकरच सर्व शेतकºयांना मदत मिळावी यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.- कृष्णा गजबे, आमदार, आरमोरी