शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी ठोकलेले कुलूप तोडले

By admin | Updated: November 8, 2015 01:31 IST

स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेत पारित करण्यात आलेल्या विविध ठरावांची अंमलबजावणी ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी न केल्यामुळे ....

इल्लूर येथील प्रकार : स्वातंत्र्य दिनाच्या ठरावावर कार्यवाही न झाल्याने संतप्त; प्रशासनाच्या पुढाकाराने
आष्टी : स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेत पारित करण्यात आलेल्या विविध ठरावांची अंमलबजावणी ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी न केल्यामुळे संतप्त झालेल्या चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथील ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी ८ वाजता ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले. मात्र काही ग्रा. पं. पदाधिकारी व सचिव यांनी पंचायत समिती व पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पुन्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ग्राम पंचायतीला ठोकलेले कुलूप पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आले.
१५ आॅगस्ट रोजी इल्लूर ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत विविध ठराव पारित करण्यात आले. परंतु दीर्घ कालावधी उलटूनही या ठरावांची अंमलबजावणी ग्राम पंचायतीने केली नाही. त्यानंतर संतप्त झालेल्या काही ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २७ आॅक्टोबर रोजी निवेदन देऊन ग्राम पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी ८ वाजता ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले. सदर बाब ग्राम पंचायतीचे काही पदाधिकारी व सचिव यांना लक्षात येताच त्यांनी आष्टी पोलीस ठाणे व चामोर्शीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेत पोलीस कुमक बोलावून सर्व ग्रा. पं. सदस्यासमक्ष शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता कुलूप तोडले.
ठरावात घेतलेल्या विषय क्रमांक ७ नुसार, अतिक्रमण हटविण्याबाबत कारवाई सुरू करण्यात आली असून विषय क्र. ८ मधील - रंगमंचाला दिलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर रंगमंच’ या नावाला काही ग्रामस्थांचा विरोध होता. त्यामुळे जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले असता, त्यांनी जि. प. अंतर्गत केलेल्या कामांना मान्यवरांचे नाव देता येत नाही, याबाबत जीआर ग्राम पंचायतीला पाठविण्यात आला आहे, असे सांगितले, असे ग्राम पंचायत कमिटीचे मत आहे. तेव्हा ग्राम पंचायतीने मान्यवर व थोर पुरूष यामधील फरक काय, यावर मार्गदर्शन मागितले आहे, असे ग्राम पंचायतीद्वारा सांगण्यात आले आहे.
कुलूप तोडताना संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी, विस्तार अधिकारी भोगे, पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, पोलीस उपनिरीक्षक नितेश गोहणे, सहाय्यक ुफौजदार संघरक्षित फुलझेले, सरपंच निरंजना मडावी, उपसरपंच रामचंद्र बामणकर, सचिव बारसागडे, ग्राम पंचायत सदस्य व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

या कारणांसाठी ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
स्वातंत्र्यदिनी इल्लूर ग्राम पंचायतीत पारित झालेल्या विषयांमध्ये शिवाजी चौकातील अतिक्रमण हटविणे, स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविणे, नवीन बांधकाम करण्यात आलेल्या रंगमंचास देण्यात आलेले नाव बदलविणे आदींचा समावेश होता. सदर ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राजेंद्र शिवराम पातर, विकास बोरकुटे, बंडू बामणकर, सुरेश शेंडे, शंकर चिताडे, गिरीधर बामणकर, गणेश येलेकार, विलास नागपुरे, मंगेश खोबरे, उदयराज गुप्ता, गणेश गुडेकर, विजय बोरकुटे, विलास लांबाळे, राजकुमार बोरकुटे, प्रदीप पातर, शालीक खोबरे यांनी वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. परंतु मागणीच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी संतप्त होऊन इल्लूर ग्राम पंचायतीला कुलूप ठोकले.